ETV Bharat / sports

रक्तरंजित कसोटी सामना... अवघ्या 62 चेंडूत संपला इतिहासातील सर्वात लहान सामना, स्वतःचा जीव वाचवत होते खेळाडू - Shortest Test Cricket Match

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 16, 2024, 4:55 PM IST

Shortest Test Cricket Match : येत्या 19 सप्टेंबरपासून भारतीय क्रिकेट संघ शेजारी बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक सामना असा होता जो अवघ्या 66 मिनिटं आणि 62 चेंडूत संपला. वाचा या सामन्याची

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

मुंबई Shortest Test Cricket Match : क्रिकेटच्या मैदानावरील खेळपट्टी घातक ठरु शकते का? फक्त 66 मिनिटं आणि 62 चेंडूत पाच दिवस चालणारा कसोटी सामना पूर्ण होऊ शकतो का? सामन्यात चेंडू बॅटशी नाही तर फलंदाजाच्या हाडांशी स्पर्धा करु शकतो का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं होय असंच येतील. कारण 1998 साली झालेल्या एका सामन्यात असंच पाहायला मिळालं. ही खेळपट्टी जमैकाच्या सबीना पार्क मैदानाची होती. या ऐतिहासिकदृष्ट्या धोकादायक सामन्यात भाग घेणारे संघ होते वेस्ट इंडिज आणि इंग्लंड. तथापि, खराब खेळपट्टीमुळं सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती किंवा शेवटचीही नव्हती. पण 29 जानेवारी 1998 रोजी झालेल्या या सामन्यात जे घडलं ते क्वचितच पाहायला मिळालं असेल.

फलंदाज मैदान सोडून जाण्याच्या तयारित : वास्तविक, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार माईक अर्थ्टननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अर्थटनला सलामीला यावं लागलं आणि त्याच्यासोबत यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक स्टीवर्टही मैदानात उतरला. पण खेळपट्टीवर पोहोचल्यानंतर खरी लढाई सुरु व्हायची होती. जिथं कर्टली ॲम्ब्रोस आणि कोर्टनी वॉल्श ही जोडी हातात चेंडू घेऊन तयार होती. मात्र सामना सुरु झाल्यावर चेंडू खेळपट्टीवर आदळू लागला की, फलंदाज मैदान सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते. कारण या खेळपट्टीवरुन तुफानी वेगानं येणारे चेंडू हाडे मोडण्यास कारणीभूत ठरत होते.

फलंदाजांचं शरीर जखमांनी भरलेलं : हा सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात होता. पण त्याचा भारताशीही संबंध होता. कारण गोलंदाजांची दहशत आणि फलंदाजांच्या वेदना असह्य होत असताना वेस्ट इंडिजचे पंच स्टीव्ह बकनर आणि भारतीय पंच श्रीनिवास वेंकटराघवन यांनी सामना संपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. पंचांच्या हस्तक्षेपानंतर 62 हाडे मोडणाऱ्या चेंडूंचा क्रम थांबला तेव्हा अर्थटन आणि स्टीवर्ट तसंच इतर फलंदाजांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. अनेक ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या दिसत होत्या. या 62 चेंडूत 3 गडी गमावून इंग्लंडनं 17 धावा केल्या होत्या. या काळात फिजिओला डझनभर वेळा मैदानात येऊन फलंदाजांची तपासणी करावी लागली. अर्थटन, मार्क बुचर आणि नासिर हुसेन हे फलंदाज बाद झाले होते. तर सलामीवीर स्टीवर्टसह ग्रॅहम थॉर्प नाबाद राहिला.

हेही वाचा :

  1. भारत-बांगलादेश मालिकेत 'हा' स्टार खेळाडू राहणार खेळापासून दूर; BCCI घेणार मोठा निर्णय, कारण काय? - IND vs BAN T20I Series
  2. फक्त एक विजय अन् भारतीय संघ करणार ऐतिहासिक विक्रम; 92 वर्षांच्या इतिहासात 'असं' पहिल्यांदाच होणार - IND vs BAN Test Series

मुंबई Shortest Test Cricket Match : क्रिकेटच्या मैदानावरील खेळपट्टी घातक ठरु शकते का? फक्त 66 मिनिटं आणि 62 चेंडूत पाच दिवस चालणारा कसोटी सामना पूर्ण होऊ शकतो का? सामन्यात चेंडू बॅटशी नाही तर फलंदाजाच्या हाडांशी स्पर्धा करु शकतो का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं होय असंच येतील. कारण 1998 साली झालेल्या एका सामन्यात असंच पाहायला मिळालं. ही खेळपट्टी जमैकाच्या सबीना पार्क मैदानाची होती. या ऐतिहासिकदृष्ट्या धोकादायक सामन्यात भाग घेणारे संघ होते वेस्ट इंडिज आणि इंग्लंड. तथापि, खराब खेळपट्टीमुळं सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती किंवा शेवटचीही नव्हती. पण 29 जानेवारी 1998 रोजी झालेल्या या सामन्यात जे घडलं ते क्वचितच पाहायला मिळालं असेल.

फलंदाज मैदान सोडून जाण्याच्या तयारित : वास्तविक, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार माईक अर्थ्टननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अर्थटनला सलामीला यावं लागलं आणि त्याच्यासोबत यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक स्टीवर्टही मैदानात उतरला. पण खेळपट्टीवर पोहोचल्यानंतर खरी लढाई सुरु व्हायची होती. जिथं कर्टली ॲम्ब्रोस आणि कोर्टनी वॉल्श ही जोडी हातात चेंडू घेऊन तयार होती. मात्र सामना सुरु झाल्यावर चेंडू खेळपट्टीवर आदळू लागला की, फलंदाज मैदान सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते. कारण या खेळपट्टीवरुन तुफानी वेगानं येणारे चेंडू हाडे मोडण्यास कारणीभूत ठरत होते.

फलंदाजांचं शरीर जखमांनी भरलेलं : हा सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात होता. पण त्याचा भारताशीही संबंध होता. कारण गोलंदाजांची दहशत आणि फलंदाजांच्या वेदना असह्य होत असताना वेस्ट इंडिजचे पंच स्टीव्ह बकनर आणि भारतीय पंच श्रीनिवास वेंकटराघवन यांनी सामना संपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. पंचांच्या हस्तक्षेपानंतर 62 हाडे मोडणाऱ्या चेंडूंचा क्रम थांबला तेव्हा अर्थटन आणि स्टीवर्ट तसंच इतर फलंदाजांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. अनेक ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या दिसत होत्या. या 62 चेंडूत 3 गडी गमावून इंग्लंडनं 17 धावा केल्या होत्या. या काळात फिजिओला डझनभर वेळा मैदानात येऊन फलंदाजांची तपासणी करावी लागली. अर्थटन, मार्क बुचर आणि नासिर हुसेन हे फलंदाज बाद झाले होते. तर सलामीवीर स्टीवर्टसह ग्रॅहम थॉर्प नाबाद राहिला.

हेही वाचा :

  1. भारत-बांगलादेश मालिकेत 'हा' स्टार खेळाडू राहणार खेळापासून दूर; BCCI घेणार मोठा निर्णय, कारण काय? - IND vs BAN T20I Series
  2. फक्त एक विजय अन् भारतीय संघ करणार ऐतिहासिक विक्रम; 92 वर्षांच्या इतिहासात 'असं' पहिल्यांदाच होणार - IND vs BAN Test Series
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.