ETV Bharat / sports

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं झिम्बाब्वेत फडकवला तिरंगा; शेवटच्या सामन्यातही दणदणीत विजय मिळवत 4-1 नं मालिका खिशात - ZIM vs IND 5th T20I

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 4:18 PM IST

Updated : Jul 14, 2024, 8:06 PM IST

ZIM vs IND 5th T20I : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं झिम्बाब्वेविरुद्धच्या 5 सामन्यांची टी 20 मालिका 4-1नं जिंकली आहे. आज झालेला शेवटचा सामना भारतीय संघानं 42 धावांनी जिंकला.

ZIM vs IND 5th T20I
भारतीय संघ (BCCI)

हरारे ZIM vs IND 5th T20I : भारतीय संघ आणि झिम्बाब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील शेवटचा सामना सामना हरारे स्पोर्ट्स इथं झाला. या सामन्यात यजमान झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 125 धावांत सर्वबाद झाला. भारतानं शेवटचा सामना 42 धावांनी जिंकत पाच टी 20 सामन्यांची मालिका 4-1 नं जिंकली आहे.

भारतीय गोलंदाजांची कसून गोलंदाजी : नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 168 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 18.3 षटकात केवळ 125 धावाच करु शकला आणि सामना गमावला. संघाकडून डिऑन मायर्सनं सर्वाधिक 34 धावा केल्या. तर तदिवनाशे मारुमणी आणि फराज अक्रम यांनी प्रत्येकी 27 धावा केल्या. तर भारतीय संघाकडून धारदार गोलंदाजी होती. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारनं जबरदस्त गोलंदाजी करत 22 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याच्याशिवाय शिवम दुबेला 2 विकेट मिळाल्या. तुषार देशपांडे, अभिषेक शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही 1-1 बळी घेतला.

संजूचं दुसरं टी 20 अर्धशतक : नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 20 षटकांत 6 गडी गमावून 167 धावा केल्या. एकवेळ संघानं 40 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी 56 चेंडूत 65 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. संजूनं 45 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली, ज्यात त्यानं 4 षटकार आणि 1 चौकार लगावला. तर रीयननं 22 धावा केल्या. शेवटी शिवम दुबेनं 12 चेंडूत 22 धावा केल्या. दुसरीकडे, झिम्बाब्वेसाठी ब्लेसिंग मुझाराबानीनं शानदार गोलंदाजी करत 2 बळी घेतले. कर्णधार सिकंदर रझा, रिचर्ड नगारवा आणि ब्रेंडन मावुता यांना 1-1 विकेट मिळाली.

भारतीय संघात दोन बदल : भारतीय संघानं ही मालिका आधीच जिंकली असल्यानं शुभमन गिलनं शेवटच्या सामन्यात संघात बदल केले. मुकेश कुमार आणि रियान पराग यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आलं. तसंच गेल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तुषार देशपांडेला आणखी एक संधी देण्यात आली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

  • भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि मुकेश कुमार.
  • झिम्बाब्वे : वेस्ली माधवेरे, तदिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), फराज अक्रम, रिचर्ड नगारवा, आशीर्वाद मुझाराबानी आणि ब्रैंडन मावुता.

हेही वाचा :

चौथ्या टी 20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय; 'यशस्वी' विजयासह मालिका खिशात - ZIM vs IND 4th T20I

हरारे ZIM vs IND 5th T20I : भारतीय संघ आणि झिम्बाब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील शेवटचा सामना सामना हरारे स्पोर्ट्स इथं झाला. या सामन्यात यजमान झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 125 धावांत सर्वबाद झाला. भारतानं शेवटचा सामना 42 धावांनी जिंकत पाच टी 20 सामन्यांची मालिका 4-1 नं जिंकली आहे.

भारतीय गोलंदाजांची कसून गोलंदाजी : नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 168 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 18.3 षटकात केवळ 125 धावाच करु शकला आणि सामना गमावला. संघाकडून डिऑन मायर्सनं सर्वाधिक 34 धावा केल्या. तर तदिवनाशे मारुमणी आणि फराज अक्रम यांनी प्रत्येकी 27 धावा केल्या. तर भारतीय संघाकडून धारदार गोलंदाजी होती. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारनं जबरदस्त गोलंदाजी करत 22 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याच्याशिवाय शिवम दुबेला 2 विकेट मिळाल्या. तुषार देशपांडे, अभिषेक शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही 1-1 बळी घेतला.

संजूचं दुसरं टी 20 अर्धशतक : नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 20 षटकांत 6 गडी गमावून 167 धावा केल्या. एकवेळ संघानं 40 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी 56 चेंडूत 65 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. संजूनं 45 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली, ज्यात त्यानं 4 षटकार आणि 1 चौकार लगावला. तर रीयननं 22 धावा केल्या. शेवटी शिवम दुबेनं 12 चेंडूत 22 धावा केल्या. दुसरीकडे, झिम्बाब्वेसाठी ब्लेसिंग मुझाराबानीनं शानदार गोलंदाजी करत 2 बळी घेतले. कर्णधार सिकंदर रझा, रिचर्ड नगारवा आणि ब्रेंडन मावुता यांना 1-1 विकेट मिळाली.

भारतीय संघात दोन बदल : भारतीय संघानं ही मालिका आधीच जिंकली असल्यानं शुभमन गिलनं शेवटच्या सामन्यात संघात बदल केले. मुकेश कुमार आणि रियान पराग यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आलं. तसंच गेल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तुषार देशपांडेला आणखी एक संधी देण्यात आली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

  • भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि मुकेश कुमार.
  • झिम्बाब्वे : वेस्ली माधवेरे, तदिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), फराज अक्रम, रिचर्ड नगारवा, आशीर्वाद मुझाराबानी आणि ब्रैंडन मावुता.

हेही वाचा :

चौथ्या टी 20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय; 'यशस्वी' विजयासह मालिका खिशात - ZIM vs IND 4th T20I

Last Updated : Jul 14, 2024, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.