ETV Bharat / sports

रोहित-विराट होते शाळेत तर उपकर्णधाराचा झाला नव्हता जन्म..! श्रीलंकेनं भारताविरुद्ध कधी जिंकली होती शेवटची वनडे मालिका? - IND vs SL ODI

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 3, 2024, 12:39 PM IST

IND vs SL ODI : भारतीय क्रिकेट संघ सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी टाय झाल्यानंतर आता उर्वरित दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.

India vd sri lanka
भारतीय क्रिकेट संघ (AP Photo)

कोलंबो IND vs SL ODI : भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यात सध्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी कोलंबो इथं झाला. हा सामना अतिशय रोमांचकरित्या टाय झाला. यानंतर आता मालिकेतील उर्वरित दोन सामने जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. पण श्रीलंकेनं भारताविरुद्ध शेवटची द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकून आता तिन दशकं होत आहेत. विशेष म्हणजे त्यावेळी भारतीय संघाचा सध्याचा उपकर्णधार शुभमन गिलचा जन्म देखील झाला नव्हता, तर कर्णधार रोहित आणि विराट शाळेत जात होते.

27 वर्षांपूर्वी जिंकली होती मालिका : श्रीलंकेनं भारताविरुद्ध शेवटची एकदिवसीय मालिका तब्बल 27 वर्षांपूर्वी म्हणजेच 1997 मध्ये जिंकली होती. तेव्हापासून श्रीलंकेचा संघ भारताला एकाही एकदिवसीय मालिकेत पराभूत करु शकलेला नाही. भारत आणि श्रींलकेत 1997 मध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेत श्रीलंकेनं भारताला परीभूत केलं होतं. त्या मालिकेनंतर भारत आणि श्रीलंकेत आतापर्यंत एकूण 10 एकदिवसीय मालिका खेळण्यात आल्या, मात्र श्रीलंकेचा संघ एकाही मालिकेत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला नाही.

रोहित-विराट जात होते शाळेत : तसंच शेवटच्या वेळी जेव्हा श्रीलंकेनं भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली होती. तेव्हा 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरचे केवळ 25 शतकं झाले होते. त्यावेळी साौरव गांगुलीनं कर्णधार म्हणून पदार्पणही केलं नव्हतं. तसंच रोहित शर्मा आणि विराट कोहली तर तेव्हा शाळेत होते, आणि सध्याचा उपकर्णधार शुभमन गिलचा जन्मही झाला नव्हता.

टी 20 मालिकेत भारताचा विजय : ही एकदिवसीय मालिका सुरु होण्यपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेत भारतानं 3-0 असा निर्भेळ विजय मिळवला होता. त्यानंतर आता या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना टाय झाला असून दुसरा सामना रविवार 4 ऑगस्ट रोजी तर तिसरा आणि शेवटचा सामना 7 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. त्यामुळं उर्वरित दोन्ही सामने जिंकत 27 वर्षांनंतर श्रीलंका भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकणार की भारतीय संघ आपलं निर्विवाद वर्चस्व राखणार हे पाहावं लागेल.

हेही वाचा :

  1. 'टाय' होऊनही 'सुपर ओव्हर' का नाही झाली? आतापर्यंत किती सामने टाय झाले? जाणून घ्या.... - IND vs SL 1st ODI Match Tie

कोलंबो IND vs SL ODI : भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यात सध्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी कोलंबो इथं झाला. हा सामना अतिशय रोमांचकरित्या टाय झाला. यानंतर आता मालिकेतील उर्वरित दोन सामने जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. पण श्रीलंकेनं भारताविरुद्ध शेवटची द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकून आता तिन दशकं होत आहेत. विशेष म्हणजे त्यावेळी भारतीय संघाचा सध्याचा उपकर्णधार शुभमन गिलचा जन्म देखील झाला नव्हता, तर कर्णधार रोहित आणि विराट शाळेत जात होते.

27 वर्षांपूर्वी जिंकली होती मालिका : श्रीलंकेनं भारताविरुद्ध शेवटची एकदिवसीय मालिका तब्बल 27 वर्षांपूर्वी म्हणजेच 1997 मध्ये जिंकली होती. तेव्हापासून श्रीलंकेचा संघ भारताला एकाही एकदिवसीय मालिकेत पराभूत करु शकलेला नाही. भारत आणि श्रींलकेत 1997 मध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेत श्रीलंकेनं भारताला परीभूत केलं होतं. त्या मालिकेनंतर भारत आणि श्रीलंकेत आतापर्यंत एकूण 10 एकदिवसीय मालिका खेळण्यात आल्या, मात्र श्रीलंकेचा संघ एकाही मालिकेत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला नाही.

रोहित-विराट जात होते शाळेत : तसंच शेवटच्या वेळी जेव्हा श्रीलंकेनं भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली होती. तेव्हा 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरचे केवळ 25 शतकं झाले होते. त्यावेळी साौरव गांगुलीनं कर्णधार म्हणून पदार्पणही केलं नव्हतं. तसंच रोहित शर्मा आणि विराट कोहली तर तेव्हा शाळेत होते, आणि सध्याचा उपकर्णधार शुभमन गिलचा जन्मही झाला नव्हता.

टी 20 मालिकेत भारताचा विजय : ही एकदिवसीय मालिका सुरु होण्यपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेत भारतानं 3-0 असा निर्भेळ विजय मिळवला होता. त्यानंतर आता या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना टाय झाला असून दुसरा सामना रविवार 4 ऑगस्ट रोजी तर तिसरा आणि शेवटचा सामना 7 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. त्यामुळं उर्वरित दोन्ही सामने जिंकत 27 वर्षांनंतर श्रीलंका भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकणार की भारतीय संघ आपलं निर्विवाद वर्चस्व राखणार हे पाहावं लागेल.

हेही वाचा :

  1. 'टाय' होऊनही 'सुपर ओव्हर' का नाही झाली? आतापर्यंत किती सामने टाय झाले? जाणून घ्या.... - IND vs SL 1st ODI Match Tie
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.