ETV Bharat / politics

"ट्रिपल इंजिन सरकार केवळ जागावाटप आणि...", बारामतीतील पाणी प्रश्नावरुन सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं - Supriya Sule News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 10:47 PM IST

Supriya Sule News : बारामतीतील पाण्याच्या समस्येकडे सरकारनं लक्ष द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

Supriya Sule Criticized Government over water problem in Baramati
शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना पाणी प्रश्नावर भाष्य केलं

पुणे Supriya Sule News : राज्यात एकीकडं लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. तर दुसरीकडं राज्यातील काही भागांमध्ये पाण्याची समस्या भयावह झाली असल्याचं पाहायला मिळतंय. यासंदर्भात बोलत असताना 'बारामतीत देखील दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून आता खासगी टँकर सुरू झाले आहेत', त्यामुळं याकडं सरकारनं लक्ष घालावं', अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : आज (30 मार्च) पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पाण्याच्या समस्येसंदर्भात बोसत असताना त्या म्हणाल्या की, "बारामतीत हळू हळू दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या कामांसाठी प्रायव्हेट टँकर लागत असतील त मग सरकार काय करतंय? माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी इतकं असंवेदनशील होऊ नये. तसंच दुष्काळासंदर्भात मी सातत्यानं ट्विट करत आली आहे. मी संविधानाच्या चौकटीत राहणारी प्रतिनिधी आहे. आचारसंहिता भंग होणार नाही याची मी नेहमी काळजी घेते. माझी नैतिक जबाबदारी आहे की, पाण्याचा प्रश्न सोडवावा. पण दुष्काळाच्या परिस्थितीत ट्रिपल इंजिन सरकार केवळ जागावाटप आणि त्यांच्या वादात व्यस्त आहे", असा आरोपही त्यांनी केला.

विजय शिवतारेंबद्दल काय म्हणाल्या? : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बदला घ्यायचा म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपण बारामतीतून लोकसभा लढवणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध शिवतारे वाद पाहायला मिळाला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आता शिवतारे यांनी माघार घेतली आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, "याबाबत मला काहीही माहीत नाही. निकाल लागल्यावर पहा काय फरक पडतोय."

हेही वाचा -

  1. काँग्रेस नसती तर तुमचं काय झालं असतं? चर्चा करायला कधीही तयार... सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला
  2. Supriya Sule On Vijay Shivtare : विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवणार; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकशाही..."
  3. "अजित दादांनी भाषणातून मान्य केलं की, आमच्या पक्षात..."; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना पाणी प्रश्नावर भाष्य केलं

पुणे Supriya Sule News : राज्यात एकीकडं लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. तर दुसरीकडं राज्यातील काही भागांमध्ये पाण्याची समस्या भयावह झाली असल्याचं पाहायला मिळतंय. यासंदर्भात बोलत असताना 'बारामतीत देखील दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून आता खासगी टँकर सुरू झाले आहेत', त्यामुळं याकडं सरकारनं लक्ष घालावं', अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : आज (30 मार्च) पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पाण्याच्या समस्येसंदर्भात बोसत असताना त्या म्हणाल्या की, "बारामतीत हळू हळू दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या कामांसाठी प्रायव्हेट टँकर लागत असतील त मग सरकार काय करतंय? माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी इतकं असंवेदनशील होऊ नये. तसंच दुष्काळासंदर्भात मी सातत्यानं ट्विट करत आली आहे. मी संविधानाच्या चौकटीत राहणारी प्रतिनिधी आहे. आचारसंहिता भंग होणार नाही याची मी नेहमी काळजी घेते. माझी नैतिक जबाबदारी आहे की, पाण्याचा प्रश्न सोडवावा. पण दुष्काळाच्या परिस्थितीत ट्रिपल इंजिन सरकार केवळ जागावाटप आणि त्यांच्या वादात व्यस्त आहे", असा आरोपही त्यांनी केला.

विजय शिवतारेंबद्दल काय म्हणाल्या? : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बदला घ्यायचा म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपण बारामतीतून लोकसभा लढवणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध शिवतारे वाद पाहायला मिळाला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आता शिवतारे यांनी माघार घेतली आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, "याबाबत मला काहीही माहीत नाही. निकाल लागल्यावर पहा काय फरक पडतोय."

हेही वाचा -

  1. काँग्रेस नसती तर तुमचं काय झालं असतं? चर्चा करायला कधीही तयार... सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला
  2. Supriya Sule On Vijay Shivtare : विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवणार; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकशाही..."
  3. "अजित दादांनी भाषणातून मान्य केलं की, आमच्या पक्षात..."; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.