ETV Bharat / politics

देवेंद्र फडणवीसांकडं अधिकार म्हणजे 'मविआ'साठी शुभसंकेत, संजय राऊतांची खोचक टीका - Sanjay Raut News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 6:14 PM IST

Sanjay Raut On Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारुन सरकारमधून बाहेर पडत पक्ष संघटनेसाठी काम करण्याची विनंती देवेंद्र फडणवीसांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडं केली होती. मात्र, फडणवीसांच्या मागणीकडं दुर्लक्ष करत केंद्रीय नेतृत्वानं पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी, सर्वाधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय घेतलाय. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शेलकी टीका केलीय.

Sanjay Raut reaction on BJP gives major responsibility to Devendra Fadnavis for Assembly Election
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Sanjay Raut On Devendra Fadnavis : लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं मोठा निर्णय घेतलाय. पक्षाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजपा उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेत. रविवारी झालेल्या भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. तर या मुद्द्यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केलीय.

संजय राऊत पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले संजय राऊत : यासंदर्भात आज (13 ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना संजय राऊत म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना देण्यात येणार असून त्यांच्याकडं हा अधिकार असणं महाविकास आघाडीसाठी शुभसंकेत आहेत. मोदी आणि शाह यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्यात. ज्यामुळं आमच्या किमान 25 जागा अजून वाढतील." तसंच राज्यात ठाकरे 2 सरकार अस्तित्वात येईल. लोकांच्या मनातील चेहरा मी सांगितला. काँग्रेस आणि नाना पटोले यांच्याकडं दुसरा चेहरा असेल तर त्यांनी सांगावा. निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, असं मत देखील संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केलं.


लाडक्या बहिणी लाचार नाहीत : पुढं ते म्हणाले, "रवी राणा म्हणतात निवडणुकीत पराभव झाला तर पैसे परत घेऊ. लाडकी बहीण ही योजना बहिणींसाठी नाही तर मतदानासाठी आहे. पैसे सरकारचे आहेत तुम्ही परत घेणारे कोण? या आमदाराची पत्नी लोकसभेत पडली, आता हे पण पडणार आहेत. त्यांची मानसिकता खराब आहे. मतदान केलं नाही तर पैसे परत घेऊ, पैसे काय तुमच्या घरचे आहेत का? अजित पवार यांच्या लाडक्या बहिणी त्यांचा बारामतीत पराभव करतील. कारण, या लाडक्या बहिणी लाचार नाहीत. आमचं सरकार आल्यास आम्ही त्यात पैसे वाढवू", असं आश्वासनही त्यांनी दिलं.

आम्हाला सर्वेक्षणाची गरज नाही : न्यायालयात तारखा घेऊन घटनाबाह्य सरकार चालवलं जातय. लोकसभेला मोदी आणि शाह यांच्या सभा घेता याव्यात म्हणून तारखा आपल्यानुसार घेण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत केलेलं सर्वेक्षण त्यांना प्रतिकूल नव्हतं आणि आजही नाही. आम्हाला या सर्वेक्षणाची गरज नाही. मात्र, आता निवडणुका वेळेवर घ्या आणि निकाल पण वेळेवर लावा, अशी मागणी देखील संजय राऊतांनी यावेळी केली.

हेही वाचा -

  1. देवेंद्र फडणवीस होणार श्रेय-अपश्रेयाचे धनी; भाजपाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सर्वाधिकार फडणवीसांकडे - Devendra Fadnavis

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Sanjay Raut On Devendra Fadnavis : लोकसभेत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं मोठा निर्णय घेतलाय. पक्षाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजपा उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेत. रविवारी झालेल्या भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. तर या मुद्द्यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केलीय.

संजय राऊत पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले संजय राऊत : यासंदर्भात आज (13 ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना संजय राऊत म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना देण्यात येणार असून त्यांच्याकडं हा अधिकार असणं महाविकास आघाडीसाठी शुभसंकेत आहेत. मोदी आणि शाह यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्यात. ज्यामुळं आमच्या किमान 25 जागा अजून वाढतील." तसंच राज्यात ठाकरे 2 सरकार अस्तित्वात येईल. लोकांच्या मनातील चेहरा मी सांगितला. काँग्रेस आणि नाना पटोले यांच्याकडं दुसरा चेहरा असेल तर त्यांनी सांगावा. निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, असं मत देखील संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केलं.


लाडक्या बहिणी लाचार नाहीत : पुढं ते म्हणाले, "रवी राणा म्हणतात निवडणुकीत पराभव झाला तर पैसे परत घेऊ. लाडकी बहीण ही योजना बहिणींसाठी नाही तर मतदानासाठी आहे. पैसे सरकारचे आहेत तुम्ही परत घेणारे कोण? या आमदाराची पत्नी लोकसभेत पडली, आता हे पण पडणार आहेत. त्यांची मानसिकता खराब आहे. मतदान केलं नाही तर पैसे परत घेऊ, पैसे काय तुमच्या घरचे आहेत का? अजित पवार यांच्या लाडक्या बहिणी त्यांचा बारामतीत पराभव करतील. कारण, या लाडक्या बहिणी लाचार नाहीत. आमचं सरकार आल्यास आम्ही त्यात पैसे वाढवू", असं आश्वासनही त्यांनी दिलं.

आम्हाला सर्वेक्षणाची गरज नाही : न्यायालयात तारखा घेऊन घटनाबाह्य सरकार चालवलं जातय. लोकसभेला मोदी आणि शाह यांच्या सभा घेता याव्यात म्हणून तारखा आपल्यानुसार घेण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत केलेलं सर्वेक्षण त्यांना प्रतिकूल नव्हतं आणि आजही नाही. आम्हाला या सर्वेक्षणाची गरज नाही. मात्र, आता निवडणुका वेळेवर घ्या आणि निकाल पण वेळेवर लावा, अशी मागणी देखील संजय राऊतांनी यावेळी केली.

हेही वाचा -

  1. देवेंद्र फडणवीस होणार श्रेय-अपश्रेयाचे धनी; भाजपाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सर्वाधिकार फडणवीसांकडे - Devendra Fadnavis
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.