ETV Bharat / politics

"माझ्या नादी लागू नका, तुम्हीच खाक व्हाल..."; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्लावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Raj Thackeray Tweet

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 6:16 PM IST

Raj Thackeray : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शेण, बांगड्या आणि नारळ फेकलं. या घटनेवर राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या आणि मनसैनिकांच्या नादाला लागू नका." असा मनसे अध्यक्षांनी सोशल मीडियात पोस्ट करत इशारा दिलाय.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
राज ठाकरे, उद्धव ठाकरे (Source - Etv Bharat)

मुंबई Raj Thackeray On Thane MNS Attack : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या. त्याला प्रत्युत्तर देत मनसैनिकांनी ठाण्यात शनिवारी रात्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला केला. मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, टोमॅटो, बांगड्या आणि नारळ फेकले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय.

ठाण्यातील राड्यानंतर आता राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफार्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देता येतं. आमच्या नादाला लागू नका," असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला अप्रत्यक्षपणं इशारा दिला.

राज ठाकरे काय म्हणाले? : राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी निदर्शनं केली. ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती. माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरू झाले. धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले हे दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता. ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते. या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या आहेत."

माझ्या नादाला लागू नका- "बीडमध्ये तर उघडपणे उबाठा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला. त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं. या संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक सावध राहिला. तसं त्यानं यापुढेदेखील रहावं. मी कालच्या पत्रकार परिषदेतदेखील सांगितलं होतं की, माझ्या नादाला लागू नका. कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल, हे तुम्हाला कळणार नाही. त्याची प्रचिती कालच आली," असं राज ठाकरे यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले.

मी खपवून घेणार नाही : "मुळात आपण महाराष्ट्रात आहोत. हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं आहे. राजकारण म्हटलं की मुद्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हे देखील होणार. पण कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामधे विघ्न निर्माण करणं थांबविलं पाहिजे. टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्यांना, माध्यमांनी पण उचकवणं थांबवलं पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल, अशी कोणीतही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार, अगदी पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र सैनिकांनी कधी केले नाहीत आणि चुकून त्यांनी केले तरी ते मी खपवून घेणार नाही. याची त्यांनाही जाणीव आहे," असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं.

उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक दाखवली : "महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांसाठी, माता, भगिनींसाठी आम्ही याआधी गुद्दे दिले. यापुढे देणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत येऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी वेळेस दोन ठोसे हाणायाची वेळ आली तर ते पण करू. कारण ती शक्ती लोकांसांठी वापरली जाणार आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी असल्या सुमार लोकांसाठी तुमची शक्ती वाया घालवू नये. फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत. ती पुरेशी आहे. त्यामुळं तुम्ही हे सगळं थांबवा असं माझं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे," अशी पोस्ट करत मनसैनिकांना शांततेचा सल्लादेखील ठाकरेंनी दिला आहे.

त्यांचं काय करायचं ते पाहू : आपण नेहमी महाराष्ट्राला राजकीय संस्कृती असल्याचं म्हणतो. यावरदेखील राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, "महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत. ही संस्कृती किमान आपल्याकडून पुसली जाणार नाही, हे आपण पाहूया. पण हे करताना तुमच्या नावावर खपवून, परस्पर पक्षाला बदनाम करण्याचे प्रकार कुठे घडत नाहीत ना याकडे पण लक्ष ठेवा. महाराष्ट्रात शांतता नांदेल. इथल्या निवडणुका शांततेत पार पडतील हे किमान आपण तरी नक्की पाहूया. तरीही नतद्रष्ट सुधारणार नसतील, तर त्यांचं काय करायचं ते नंतर पाहू."

विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी : "समाजात कसा द्वेष पसरवता येईल, एखाद्याचं प्रतिमाहनन कसं होईल हे पाहत आहेत. तुम्ही ते आर्थिक लाभासाठी करताय की अजून कशासाठी करताय, याच्याशी मला देणंघेणं नाही. मूठभर राजकीय नेते आणि मूठभर पत्रकार यांचे आर्थिक हितसंबंध त्यांना लखलाभ. पण जे तुम्ही करताय ते दुधारी शस्त्र आहे. त्यातून जो वणवा पेटतोय, त्यात तुम्हीच खाक व्हाल हे विसरू नका. जाता जाता इतकंच सांगतो की, या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका. मी मागे पण बोललो आहे. काल देखीलबोललो आहे. तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे, हे विसरू नका. हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा," असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून दिला आहे.

हेही वाचा

  1. "महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी दिल्लीतील 'अब्दाली'नं..."; संजय राऊतांचा प्रहार - Sanjay Raut MNS Supari
  2. "आम्ही संजय राऊतांसारखे पळकुटे..."; ठाण्यातील राड्यानंतर संदीप देशपांडेंचा इशारा - Sandeep Deshpande On Sanjay Raut
  3. "घरात घुसून मारल्याशिवाय..."; मनसेचा ठाकरे गटाला इशारा, जितेंद्र आव्हाड म्हणाले... - Uddhav Thackeray Convoy Attacked
  4. उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत मनसैनिकांचा राडा; गाडीवर फेकल्या बांगड्या आणि शेण - Thackeray Group VS MNS

मुंबई Raj Thackeray On Thane MNS Attack : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या. त्याला प्रत्युत्तर देत मनसैनिकांनी ठाण्यात शनिवारी रात्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला केला. मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण, टोमॅटो, बांगड्या आणि नारळ फेकले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय.

ठाण्यातील राड्यानंतर आता राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफार्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देता येतं. आमच्या नादाला लागू नका," असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला अप्रत्यक्षपणं इशारा दिला.

राज ठाकरे काय म्हणाले? : राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यासमोर माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी निदर्शनं केली. ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती. माझ्या नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान काही विघ्न उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरू झाले. धाराशिवमध्ये निदर्शनाला आलेले हे दाखवायला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता. ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते. या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या आहेत."

माझ्या नादाला लागू नका- "बीडमध्ये तर उघडपणे उबाठा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला. त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं ते केलं. या संपूर्ण काळात महाराष्ट्र सैनिक सावध राहिला. तसं त्यानं यापुढेदेखील रहावं. मी कालच्या पत्रकार परिषदेतदेखील सांगितलं होतं की, माझ्या नादाला लागू नका. कारण माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल, हे तुम्हाला कळणार नाही. त्याची प्रचिती कालच आली," असं राज ठाकरे यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले.

मी खपवून घेणार नाही : "मुळात आपण महाराष्ट्रात आहोत. हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचं कमी होऊ लागलं आहे. राजकारण म्हटलं की मुद्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हे देखील होणार. पण कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामधे विघ्न निर्माण करणं थांबविलं पाहिजे. टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्यांना, माध्यमांनी पण उचकवणं थांबवलं पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल, अशी कोणीतही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार, अगदी पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र सैनिकांनी कधी केले नाहीत आणि चुकून त्यांनी केले तरी ते मी खपवून घेणार नाही. याची त्यांनाही जाणीव आहे," असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं.

उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक दाखवली : "महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांसाठी, माता, भगिनींसाठी आम्ही याआधी गुद्दे दिले. यापुढे देणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत येऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी वेळेस दोन ठोसे हाणायाची वेळ आली तर ते पण करू. कारण ती शक्ती लोकांसांठी वापरली जाणार आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी असल्या सुमार लोकांसाठी तुमची शक्ती वाया घालवू नये. फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत. ती पुरेशी आहे. त्यामुळं तुम्ही हे सगळं थांबवा असं माझं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे," अशी पोस्ट करत मनसैनिकांना शांततेचा सल्लादेखील ठाकरेंनी दिला आहे.

त्यांचं काय करायचं ते पाहू : आपण नेहमी महाराष्ट्राला राजकीय संस्कृती असल्याचं म्हणतो. यावरदेखील राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, "महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत. ही संस्कृती किमान आपल्याकडून पुसली जाणार नाही, हे आपण पाहूया. पण हे करताना तुमच्या नावावर खपवून, परस्पर पक्षाला बदनाम करण्याचे प्रकार कुठे घडत नाहीत ना याकडे पण लक्ष ठेवा. महाराष्ट्रात शांतता नांदेल. इथल्या निवडणुका शांततेत पार पडतील हे किमान आपण तरी नक्की पाहूया. तरीही नतद्रष्ट सुधारणार नसतील, तर त्यांचं काय करायचं ते नंतर पाहू."

विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी : "समाजात कसा द्वेष पसरवता येईल, एखाद्याचं प्रतिमाहनन कसं होईल हे पाहत आहेत. तुम्ही ते आर्थिक लाभासाठी करताय की अजून कशासाठी करताय, याच्याशी मला देणंघेणं नाही. मूठभर राजकीय नेते आणि मूठभर पत्रकार यांचे आर्थिक हितसंबंध त्यांना लखलाभ. पण जे तुम्ही करताय ते दुधारी शस्त्र आहे. त्यातून जो वणवा पेटतोय, त्यात तुम्हीच खाक व्हाल हे विसरू नका. जाता जाता इतकंच सांगतो की, या राज ठाकरेच्या आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका. मी मागे पण बोललो आहे. काल देखीलबोललो आहे. तुम्ही प्रस्थापित असाल पण विस्थापितांची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे, हे विसरू नका. हे तुमच्या काळजीपोटी सांगतोय असं समजा," असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून दिला आहे.

हेही वाचा

  1. "महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी दिल्लीतील 'अब्दाली'नं..."; संजय राऊतांचा प्रहार - Sanjay Raut MNS Supari
  2. "आम्ही संजय राऊतांसारखे पळकुटे..."; ठाण्यातील राड्यानंतर संदीप देशपांडेंचा इशारा - Sandeep Deshpande On Sanjay Raut
  3. "घरात घुसून मारल्याशिवाय..."; मनसेचा ठाकरे गटाला इशारा, जितेंद्र आव्हाड म्हणाले... - Uddhav Thackeray Convoy Attacked
  4. उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत मनसैनिकांचा राडा; गाडीवर फेकल्या बांगड्या आणि शेण - Thackeray Group VS MNS
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.