ETV Bharat / health-and-lifestyle

जगातील 828 दशलक्ष लोक राहतात दररोज उपाशी.... जाणून घ्या 'जागतिक भूक दिना'चं महत्त्व - world hunger day 2024

WORLD HUNGER DAY 24 : हवामानाची परिस्थिती, युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती अशा विविध कारणांमुळे जगभरातील पीक उत्पादनावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत जगातील जनतेला उपासमारीपासून वाचवणं मोठं आव्हान आहे. वाचा पूर्ण बातमी..

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 10:05 AM IST

जागतिक भूक दिवस 2024
WORLD HUNGER DAY 24 (ETV Bharat)

हैदराबाद - WORLD HUNGER DAY 24: मनुष्याच्या जीवनात अन्न महत्वाची भूमिका बजावते. मुलभूत गरजाच्या घटकामध्ये अन्न प्रथमस्थांनी आहे. परंतू, मनुष्य प्रत्येक दिवशी अन्नाची नासाडी करतो. दुसरीकडे जगातील 828 दशलक्ष लोक दररोज उपाशी असतात. भारतात अन्नाची नासाडी आणि कुपोषण या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. एकीकडे श्रीमंत व्यक्ती अन्नावर भरपूर खर्च करतो. परंतू काहींच्या नशीबी एका वेळेचं जेवण मिळत सुद्धा नाही. परिणामी कुपोषणाचं प्रमाण वाढतंय. त्यामुळं उपासमारीचे संकट आणि कुपोषणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी 28 मे रोजी जागतिक भूक दिवस साजरा करण्यात येतो.

यावर्षीची थीम: 'संपन्न माता, भरभराटीचे जग' ही जागतिक भूक दिन 2024 ची थीम आहे.

जागतिक भूक दिनाचा इतिहास: 2011 मध्ये हा दिवस सुरु करण्यात आला. उपासमारीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत उपक्रमांद्वारे समस्या सोडवण्याच्या उद्देशानं 'द हंगर प्रोजेक्ट'नं हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून 28 मे रोजी जागितक भूक दिवस साजरा करण्यात येतो.

जागतिक स्तरावरीव तथ्य

  1. जगात 8 अब्ज लोकांच पोट भरेल एवढ अन्न आहे. तरीही जगातील 828 दशलक्ष लोक दररोज उपाशी असतात.
  2. जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण राज्य (SOFI) 2023 रिपोर्ट जगतिक स्तरावर 42 टक्के लोक निरोग आहार घेऊ शकत नाहीत.
  3. युनिसेफच्या 23 च्या आकडेवारी जागतिक स्तरावर 1 अब्ज मुली आणि महिलांना कुपोषणाचा सामना करावा लागतो.
  4. डब्लूएचओ 2023 रिपोर्टनुसार 5 वर्षांखालील 149 दशलक्ष मुलांची वाढ झाली नाही.
  5. जागतिक लोकसंख्येच्या 29.6 टक्के लोकांना पुरेशा प्रमाणात अन्न मिळत नाही.
  6. दरवर्षी नऊ दशलक्ष लोक उपासमारी संबंधित कारणांमुळं मरतात. यात 5 वर्षाखालील मुलांची संख्या जास्त आहे.
  7. 2022 मध्ये, युक्रेनमधील संघर्षामुळे तीव्र उपासमारीला सामोरं जाणाऱ्या लोकांची संख्या तीन महिन्यांत 25 टक्क्यांनी वाढली.
  8. 2030 शून्य उपासमारीचे उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रांच आहे. या दशकाच्या शेवटी 670 दशलक्ष लोक अजूनही उपासमारीला सामोरं जातील असा त्यांचा अंदाज आहे.

अन्नाची नासाडी : संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमच्या फुड वेस्ट इंडेक्स रिपोर्ट 2024 नुसार 1.5 अब्ज टन अन्नाची नासाडी करण्यात आल्याचं निदर्शनात आलं. घरगुती, रेस्टॉरेंट आणि खाद्यपदार्थ्यांच्या इतर घटकांमुळं 19 टक्के अन्नाची नासाडी होत आहे. युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) च्या अंदाजानुसार हे पुरवठा साखळीतील अंदाजे 13 टक्के अन्न आहे. अन्नाच्या नासाडीचं सर्वात मुख्य स्त्रोत घर आहे. प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी 79 टक्के अन्नचा अपव्यय करतो.

भारतातील उपासमारीची प्रमुख तथ्ये

  1. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 रिपोर्टनुसार 125 देशांच्या ग्लोबल इंडेक्समध्ये भारत 111 व्या क्रमांकावर आहे.
  2. बालकांच्या मृत्यूचे प्रमाण आणि बालकांच्या कुपोषणातही भारत आघाडीवर आहे. जे फार गंभीर आहे.
  3. निर्देशांकानुसार, भारतात कुपोषण दर 16.6 टक्के आहे. यात पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर 3.1 टक्के आहे
  4. अहवालात असंही म्हटलं आहे की, 15 ते 24 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण 58.1 टक्के आहे.

भारतातील अन्नाची नासाडी: यूएनईपी अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2021 नुसार दरवर्षी एक व्यक्ती 50 किलो अन्न अपव्यय करतो. दक्षिण आशियाई देशांमध्ये अफगाणिस्तानात सर्वाधिक अन्नाची नासाडी होते. नेपाळमध्ये 79 किलो, श्रीलंकेत 76 किलो, पाकिस्तानमध्ये 74 किलो आणि बांगलादेशमध्ये 65 किलो वजन आहे.

हेही वाचा

  1. काय सांगता! डाएट न करता वजन होतो कमी - weight loss
  2. चेहरा तजेलदार होण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी नियमित करा 'ही' योगासनं - YOGASAN

हैदराबाद - WORLD HUNGER DAY 24: मनुष्याच्या जीवनात अन्न महत्वाची भूमिका बजावते. मुलभूत गरजाच्या घटकामध्ये अन्न प्रथमस्थांनी आहे. परंतू, मनुष्य प्रत्येक दिवशी अन्नाची नासाडी करतो. दुसरीकडे जगातील 828 दशलक्ष लोक दररोज उपाशी असतात. भारतात अन्नाची नासाडी आणि कुपोषण या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. एकीकडे श्रीमंत व्यक्ती अन्नावर भरपूर खर्च करतो. परंतू काहींच्या नशीबी एका वेळेचं जेवण मिळत सुद्धा नाही. परिणामी कुपोषणाचं प्रमाण वाढतंय. त्यामुळं उपासमारीचे संकट आणि कुपोषणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी 28 मे रोजी जागतिक भूक दिवस साजरा करण्यात येतो.

यावर्षीची थीम: 'संपन्न माता, भरभराटीचे जग' ही जागतिक भूक दिन 2024 ची थीम आहे.

जागतिक भूक दिनाचा इतिहास: 2011 मध्ये हा दिवस सुरु करण्यात आला. उपासमारीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत उपक्रमांद्वारे समस्या सोडवण्याच्या उद्देशानं 'द हंगर प्रोजेक्ट'नं हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून 28 मे रोजी जागितक भूक दिवस साजरा करण्यात येतो.

जागतिक स्तरावरीव तथ्य

  1. जगात 8 अब्ज लोकांच पोट भरेल एवढ अन्न आहे. तरीही जगातील 828 दशलक्ष लोक दररोज उपाशी असतात.
  2. जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण राज्य (SOFI) 2023 रिपोर्ट जगतिक स्तरावर 42 टक्के लोक निरोग आहार घेऊ शकत नाहीत.
  3. युनिसेफच्या 23 च्या आकडेवारी जागतिक स्तरावर 1 अब्ज मुली आणि महिलांना कुपोषणाचा सामना करावा लागतो.
  4. डब्लूएचओ 2023 रिपोर्टनुसार 5 वर्षांखालील 149 दशलक्ष मुलांची वाढ झाली नाही.
  5. जागतिक लोकसंख्येच्या 29.6 टक्के लोकांना पुरेशा प्रमाणात अन्न मिळत नाही.
  6. दरवर्षी नऊ दशलक्ष लोक उपासमारी संबंधित कारणांमुळं मरतात. यात 5 वर्षाखालील मुलांची संख्या जास्त आहे.
  7. 2022 मध्ये, युक्रेनमधील संघर्षामुळे तीव्र उपासमारीला सामोरं जाणाऱ्या लोकांची संख्या तीन महिन्यांत 25 टक्क्यांनी वाढली.
  8. 2030 शून्य उपासमारीचे उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रांच आहे. या दशकाच्या शेवटी 670 दशलक्ष लोक अजूनही उपासमारीला सामोरं जातील असा त्यांचा अंदाज आहे.

अन्नाची नासाडी : संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमच्या फुड वेस्ट इंडेक्स रिपोर्ट 2024 नुसार 1.5 अब्ज टन अन्नाची नासाडी करण्यात आल्याचं निदर्शनात आलं. घरगुती, रेस्टॉरेंट आणि खाद्यपदार्थ्यांच्या इतर घटकांमुळं 19 टक्के अन्नाची नासाडी होत आहे. युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) च्या अंदाजानुसार हे पुरवठा साखळीतील अंदाजे 13 टक्के अन्न आहे. अन्नाच्या नासाडीचं सर्वात मुख्य स्त्रोत घर आहे. प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी 79 टक्के अन्नचा अपव्यय करतो.

भारतातील उपासमारीची प्रमुख तथ्ये

  1. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 रिपोर्टनुसार 125 देशांच्या ग्लोबल इंडेक्समध्ये भारत 111 व्या क्रमांकावर आहे.
  2. बालकांच्या मृत्यूचे प्रमाण आणि बालकांच्या कुपोषणातही भारत आघाडीवर आहे. जे फार गंभीर आहे.
  3. निर्देशांकानुसार, भारतात कुपोषण दर 16.6 टक्के आहे. यात पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर 3.1 टक्के आहे
  4. अहवालात असंही म्हटलं आहे की, 15 ते 24 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण 58.1 टक्के आहे.

भारतातील अन्नाची नासाडी: यूएनईपी अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2021 नुसार दरवर्षी एक व्यक्ती 50 किलो अन्न अपव्यय करतो. दक्षिण आशियाई देशांमध्ये अफगाणिस्तानात सर्वाधिक अन्नाची नासाडी होते. नेपाळमध्ये 79 किलो, श्रीलंकेत 76 किलो, पाकिस्तानमध्ये 74 किलो आणि बांगलादेशमध्ये 65 किलो वजन आहे.

हेही वाचा

  1. काय सांगता! डाएट न करता वजन होतो कमी - weight loss
  2. चेहरा तजेलदार होण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी नियमित करा 'ही' योगासनं - YOGASAN
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.