ETV Bharat / entertainment

विहीर चोरीला गेली, मकरंद अनासपुरेंनी केली पोलखोल : जाऊ तिथं खाऊ

Jau Tith Khau : चोरीच्या अनेक तक्रारी पोलिसात दाखल होत असतात, पंरतु शेतातील विहीर चोरीला गेल्याची पोलखोल मकरंद अनासपुरेंनी 'जाऊ तिथं खाऊ'मध्ये केली होती.

Marathi movie 'Jau Tith Khau'
"जाऊ तिथं खाऊ" ('Jau Tith Khau' movie poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 2 hours ago

मुंबई - सरकारी यंत्रणा भ्रष्टाचारानं पोखरल्याची टीका अनेक वेळा ऐकू येते. कितीही आंदोलनं झाली असली तरी भ्रष्टाचाराला आळा काही बसलेला नाही. सातत्यानं नवनवीन धक्कादायक प्रकरणं उघडकीस येतात आणि झाल्या प्रकारानं जनता आश्चर्य चकित होते. हा कारभार बेमालुमपणे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या-क्लृपत्या वापरल्या जातात. सरकारी योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्याच्या अंमलबजावणीत भरपूर त्रुटी असतात. याचा उपयोग करुन भ्रष्टाचाऱ्यांचंही फावतं. खऱ्या अर्थानं या योजनांचा लाभ लोकापर्यंत पोहोचतच नाही. अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं तर 'लाडकी बहिण' योजना उत्तम असली तरी या योजनेसाठी लागणारी खोटी कागदपत्रं तयार करुन एकाच व्यक्तीनं अनेक नावावर अर्ज केले आणि सरकारचे पैसे उकळल्याचं उघड झालं होतं. माजी पंतप्रधान राजीव गांधीनींही भ्रष्टाचाराच्या विषयावर एकदा भाष्य करताना सरकारनं 100 रुपये देऊ केले तर जनतेपर्यंत केवळ 15 रुपये पोहोचतात आणि बाकीचा मलिदा मधल्या मध्ये दलाल खातात असा दावा केला होता. भ्रष्टाचाराचा विषय सार्वत्रिक आहे. आपल्या देशाला हा फार मोठा शाप असल्यामुळंच देशात अनेक आंदोलनंही झाली. दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेलं अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनंही ऐतिहासिक ठरलं होतं.

'जाऊ तिथं खाऊ' चा हिंदीतही रिमेक - सामान्य जनता भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. या समस्येच्या विरोधातली लढाई करण्याची शक्ती हरवत चालली आहे. हाच विषय घेऊन आजवर अनेक कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटही बनले आहेत. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात विहीर चोरीला गेल्याचं प्रकरण गाजलं होतं. असं असलं तरी अजूनही अधून मधून अशी प्रकरणं पुन्हा घडतातच. याच्या बातम्याही वर्तमानपत्रात आणि टीव्हीवरुन झळकतात. विहीर चोरीला गेल्याच्या प्रकरणावरुन यापूर्वी असे अनेक चित्रपट तयार झाले आहेत. 'वेल डन अब्बा' हा हिंदी भाषेतील चित्रपट 2010 मध्ये बनला होता. यामध्ये अभिनेता बोमन इराणी यानं मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट मकरंद अनासपुरे यांची भूमिका असलेल्या 'जाऊ तिथं खाऊ' या चित्रपटावर आधारित होता.

'जाऊ तिथं खाऊ' ची रंजक कथा - 'जाऊ तिथं खाऊ' या चित्रपटाची कथा अशीच रंजक होती. मुकुंद ( मकरंद अनासपुरे ) या कष्टाळू सुशिक्षित बेरोजगार तरुणाला लाचखोर अधिकाऱ्यांचा सामना करावा लागतो. सरकारी, निमसरकारी अशा प्रत्येक ठिकाणी भेटणारे सार्वजनिक अधिकारी त्याच्याकडे काम करण्यासाठी लाच मागतात. या वर्तनामुळे आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्थेमुळे संतप्त होऊन तो व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतो. यासाठी त्याची मैत्रीण त्याला मदत करते. तो शेतामध्ये शासकीय योजनेतून विहिर मंजुरीसाठी अर्ज करतो. यासाठी त्याला पदोपदी पैसे द्यावे लागतात. तो शेतातली विहीर खोदण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच देऊन तो विहीर न खोदताच कर्ज मंजूर करून घेतो.

न्यायदानावर मार्मिक भाष्य - शेवटच्या क्षणी तो त्याची विहीर चोरीला गेल्याबद्दल पोलीस स्टेशन आणि कोर्टात केस दाखल करतो. सुरुवातीला त्याला वेड्यात काढलं जातं. पण तो विहीर खोदल्याबाबतचे पुरावे कागदावर सादर करतो. न्यायालयालाही त्याचे पुरावे ग्राह्य धरून विहीर खरोखरच चोरीला गेली असल्याचे जाहीर करावे लागते. नंतर मात्र मुकुंद स्वत:हून निर्णय नाकारतो आणि लोकांना खरी परिस्थिती समजावून सांगतो आणि देशातील भ्रष्टाचाराच्या सद्यस्थितीबद्दल भाष्य करतो. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा अधोरेखीत करताना एक महत्त्वाचा सामाजिक संदेश हा चित्रपट देऊन जातो.

कन्नड चित्रपट निर्मात्यांनीही केला रिमेक - मेघराज राजेभोसले निर्मित आणि अभय कीर्ती दिग्दर्शित या चित्रपटात मकरंद अनासपुरे, कुलदीप पवार, चेतन दळवी, दीपाली सय्यद यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट हिंदीमध्ये 'वेल डन अब्बा' बनल्यानंतर कन्नड भाषेतही याचे रुपांतर झाले. 'सरकारी केलासा देवरा केलासा' असं शीर्षक असलेला हा चित्रपट समीक्षकांना आणि प्रेक्षकांनाही आवडला होता. यामध्ये कन्नडमधील लोकप्रिय अभिनेता रवीशंकर गौडा, सम्युक्ता होर्नाड, आशिष विद्यार्थी, रंगयाण्णा रघु, राजू तालिकोटे यांनी भूमिका केल्या होत्या.

मुंबई - सरकारी यंत्रणा भ्रष्टाचारानं पोखरल्याची टीका अनेक वेळा ऐकू येते. कितीही आंदोलनं झाली असली तरी भ्रष्टाचाराला आळा काही बसलेला नाही. सातत्यानं नवनवीन धक्कादायक प्रकरणं उघडकीस येतात आणि झाल्या प्रकारानं जनता आश्चर्य चकित होते. हा कारभार बेमालुमपणे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या-क्लृपत्या वापरल्या जातात. सरकारी योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्याच्या अंमलबजावणीत भरपूर त्रुटी असतात. याचा उपयोग करुन भ्रष्टाचाऱ्यांचंही फावतं. खऱ्या अर्थानं या योजनांचा लाभ लोकापर्यंत पोहोचतच नाही. अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं तर 'लाडकी बहिण' योजना उत्तम असली तरी या योजनेसाठी लागणारी खोटी कागदपत्रं तयार करुन एकाच व्यक्तीनं अनेक नावावर अर्ज केले आणि सरकारचे पैसे उकळल्याचं उघड झालं होतं. माजी पंतप्रधान राजीव गांधीनींही भ्रष्टाचाराच्या विषयावर एकदा भाष्य करताना सरकारनं 100 रुपये देऊ केले तर जनतेपर्यंत केवळ 15 रुपये पोहोचतात आणि बाकीचा मलिदा मधल्या मध्ये दलाल खातात असा दावा केला होता. भ्रष्टाचाराचा विषय सार्वत्रिक आहे. आपल्या देशाला हा फार मोठा शाप असल्यामुळंच देशात अनेक आंदोलनंही झाली. दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेलं अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनंही ऐतिहासिक ठरलं होतं.

'जाऊ तिथं खाऊ' चा हिंदीतही रिमेक - सामान्य जनता भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. या समस्येच्या विरोधातली लढाई करण्याची शक्ती हरवत चालली आहे. हाच विषय घेऊन आजवर अनेक कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटही बनले आहेत. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात विहीर चोरीला गेल्याचं प्रकरण गाजलं होतं. असं असलं तरी अजूनही अधून मधून अशी प्रकरणं पुन्हा घडतातच. याच्या बातम्याही वर्तमानपत्रात आणि टीव्हीवरुन झळकतात. विहीर चोरीला गेल्याच्या प्रकरणावरुन यापूर्वी असे अनेक चित्रपट तयार झाले आहेत. 'वेल डन अब्बा' हा हिंदी भाषेतील चित्रपट 2010 मध्ये बनला होता. यामध्ये अभिनेता बोमन इराणी यानं मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट मकरंद अनासपुरे यांची भूमिका असलेल्या 'जाऊ तिथं खाऊ' या चित्रपटावर आधारित होता.

'जाऊ तिथं खाऊ' ची रंजक कथा - 'जाऊ तिथं खाऊ' या चित्रपटाची कथा अशीच रंजक होती. मुकुंद ( मकरंद अनासपुरे ) या कष्टाळू सुशिक्षित बेरोजगार तरुणाला लाचखोर अधिकाऱ्यांचा सामना करावा लागतो. सरकारी, निमसरकारी अशा प्रत्येक ठिकाणी भेटणारे सार्वजनिक अधिकारी त्याच्याकडे काम करण्यासाठी लाच मागतात. या वर्तनामुळे आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्थेमुळे संतप्त होऊन तो व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतो. यासाठी त्याची मैत्रीण त्याला मदत करते. तो शेतामध्ये शासकीय योजनेतून विहिर मंजुरीसाठी अर्ज करतो. यासाठी त्याला पदोपदी पैसे द्यावे लागतात. तो शेतातली विहीर खोदण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच देऊन तो विहीर न खोदताच कर्ज मंजूर करून घेतो.

न्यायदानावर मार्मिक भाष्य - शेवटच्या क्षणी तो त्याची विहीर चोरीला गेल्याबद्दल पोलीस स्टेशन आणि कोर्टात केस दाखल करतो. सुरुवातीला त्याला वेड्यात काढलं जातं. पण तो विहीर खोदल्याबाबतचे पुरावे कागदावर सादर करतो. न्यायालयालाही त्याचे पुरावे ग्राह्य धरून विहीर खरोखरच चोरीला गेली असल्याचे जाहीर करावे लागते. नंतर मात्र मुकुंद स्वत:हून निर्णय नाकारतो आणि लोकांना खरी परिस्थिती समजावून सांगतो आणि देशातील भ्रष्टाचाराच्या सद्यस्थितीबद्दल भाष्य करतो. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा अधोरेखीत करताना एक महत्त्वाचा सामाजिक संदेश हा चित्रपट देऊन जातो.

कन्नड चित्रपट निर्मात्यांनीही केला रिमेक - मेघराज राजेभोसले निर्मित आणि अभय कीर्ती दिग्दर्शित या चित्रपटात मकरंद अनासपुरे, कुलदीप पवार, चेतन दळवी, दीपाली सय्यद यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट हिंदीमध्ये 'वेल डन अब्बा' बनल्यानंतर कन्नड भाषेतही याचे रुपांतर झाले. 'सरकारी केलासा देवरा केलासा' असं शीर्षक असलेला हा चित्रपट समीक्षकांना आणि प्रेक्षकांनाही आवडला होता. यामध्ये कन्नडमधील लोकप्रिय अभिनेता रवीशंकर गौडा, सम्युक्ता होर्नाड, आशिष विद्यार्थी, रंगयाण्णा रघु, राजू तालिकोटे यांनी भूमिका केल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.