ETV Bharat / entertainment

सेलिब्रिटींकडून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव, पहा कोण काय म्हणाले? - INDIA T20 WORLD CUP WIN

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 10:53 AM IST

T20 world cup : भारतीय संघानं टी 20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर आता अनेकजण आनंद व्यक्त करत आहेत. या विजयामुळे बॉलिवूडमधील सेलिब्रिटीदेखील खुश आहेत. आता काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियात पोस्ट करून भारतीय संघाचे अभिनंदन केलं आहे.

T20 world cup
टी 20 विश्वचषक (IANS/Instagram)

मुंबई - T20 world cup : भारतानं 17 वर्षांनंतर टी 20 विश्वचषक 2024 जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडियानं फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सनं पराभूत करून ट्रॉफी जिंकली आहे. भारतानं दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी भारतीय संघानं 2007 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. यावेळी महेंद्र सिंग धोनी संघाचा कॅप्टन होता. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येकजण भारतीय संघाचा विजय साजरा करत आहे. या प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटीही या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त करत आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा : अनिल कपूरनं टीम इंडियाच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारी पोस्ट शेअर करत लिहिलं, "सर्व भारतीय यावेळी आनंदाची भावना अनुभवत आहेत. असली चॅम्पियन्स." यानंतर या ऐतिहासिक विजयावर अमिताभ बच्चन यांनीही आनंद व्यक्त करत लिहिलं, "अश्रू वाहत आहेत...वर्ल्ड चॅम्पियन्स. जय हिंद." चॅम्पियन्स ट्रॉफीचा फोटो शेअर करताना सलमान खान पोस्टवर लिहिलं, "टीम इंडियाचे अभिनंदन!" तसेच कार्तिक आर्यन आपली खुशी व्यक्त करत लिहिलं, "टीम इंडियानं आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. आजचा विश्वचषक नाही, पण कायमची मनं जिंकली, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय." अभिषेक बच्चननेही पोस्ट शेअर करून या शानदार विजयावर आनंद व्यक्त केला आहे.

सेलिब्रिटींनी केला आनंद व्यक्त : एक्सवर अजय देवगणनं विजयाबद्दल अभिनंदन करताना लिहिलं, "आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही! अभिनंदन टीम इंडिया, तुम्ही इतिहास रचला आहे. हा विजय आपल्या कानात घुमत आहे." अर्जुन रामपालनं या विजयाबद्दल लिहिलं, "उफ्फफ्फ, अखेर आम्ही फायनल जिंकली. माझ्यासाठी जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द टूर्नामेंट आहे. सूर्यकुमार यादव, तो सर्वोत्तम होता. हार्दिक पांड्या कामगिरी जोरदार होती. अखेरच्या षटकात त्यानं संयम राखला. विराट कोहलीदेखील छान खेळला. रोहित शर्माचा ड्राय रन तोडणे हे माझ्यासाठी केकवरचे आइसिंग आहे. एक उत्तम खेळ आणि सर्वांनी चांगलं प्रदर्शन केलं. खूप खूप शुभेच्छा.' आता अनेकजण या विजयामुळे आनंदी आहेत.

हेही वाचा :

  1. 'कल्की 2898 एडी'च्या भाग 2ची शूटिंग 60 टक्के पूर्ण, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लॉक - kalki 2898 ad part 2
  2. मुकेश आणि नीता अंबानी यांनी वंचित जोडप्यांसाठी आयोजित केला सामूहिक विवाह सोहळा - Mukesh and Nita Ambani
  3. हनु-मॅन फेम अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारननं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लग्नासाठी केलं आमंत्रित, फोटो व्हायरल - Varalaxmi Sarathkumar

मुंबई - T20 world cup : भारतानं 17 वर्षांनंतर टी 20 विश्वचषक 2024 जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडियानं फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सनं पराभूत करून ट्रॉफी जिंकली आहे. भारतानं दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी भारतीय संघानं 2007 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. यावेळी महेंद्र सिंग धोनी संघाचा कॅप्टन होता. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येकजण भारतीय संघाचा विजय साजरा करत आहे. या प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटीही या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त करत आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा : अनिल कपूरनं टीम इंडियाच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारी पोस्ट शेअर करत लिहिलं, "सर्व भारतीय यावेळी आनंदाची भावना अनुभवत आहेत. असली चॅम्पियन्स." यानंतर या ऐतिहासिक विजयावर अमिताभ बच्चन यांनीही आनंद व्यक्त करत लिहिलं, "अश्रू वाहत आहेत...वर्ल्ड चॅम्पियन्स. जय हिंद." चॅम्पियन्स ट्रॉफीचा फोटो शेअर करताना सलमान खान पोस्टवर लिहिलं, "टीम इंडियाचे अभिनंदन!" तसेच कार्तिक आर्यन आपली खुशी व्यक्त करत लिहिलं, "टीम इंडियानं आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. आजचा विश्वचषक नाही, पण कायमची मनं जिंकली, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय." अभिषेक बच्चननेही पोस्ट शेअर करून या शानदार विजयावर आनंद व्यक्त केला आहे.

सेलिब्रिटींनी केला आनंद व्यक्त : एक्सवर अजय देवगणनं विजयाबद्दल अभिनंदन करताना लिहिलं, "आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही! अभिनंदन टीम इंडिया, तुम्ही इतिहास रचला आहे. हा विजय आपल्या कानात घुमत आहे." अर्जुन रामपालनं या विजयाबद्दल लिहिलं, "उफ्फफ्फ, अखेर आम्ही फायनल जिंकली. माझ्यासाठी जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द टूर्नामेंट आहे. सूर्यकुमार यादव, तो सर्वोत्तम होता. हार्दिक पांड्या कामगिरी जोरदार होती. अखेरच्या षटकात त्यानं संयम राखला. विराट कोहलीदेखील छान खेळला. रोहित शर्माचा ड्राय रन तोडणे हे माझ्यासाठी केकवरचे आइसिंग आहे. एक उत्तम खेळ आणि सर्वांनी चांगलं प्रदर्शन केलं. खूप खूप शुभेच्छा.' आता अनेकजण या विजयामुळे आनंदी आहेत.

हेही वाचा :

  1. 'कल्की 2898 एडी'च्या भाग 2ची शूटिंग 60 टक्के पूर्ण, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लॉक - kalki 2898 ad part 2
  2. मुकेश आणि नीता अंबानी यांनी वंचित जोडप्यांसाठी आयोजित केला सामूहिक विवाह सोहळा - Mukesh and Nita Ambani
  3. हनु-मॅन फेम अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारननं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लग्नासाठी केलं आमंत्रित, फोटो व्हायरल - Varalaxmi Sarathkumar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.