ETV Bharat / bharat

नेपाळ बस अपघात : मायभूमीत परतताच भाविकांचा सुटला बांध; नातेवाईकांच्या आठवणीनं कोसळलं रडू - Nepal Bus Accident

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 4:44 PM IST

Nepal Bus Accident : नेपाळ इथं बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात जळगाव जिल्ह्यातील 27 भाविकांचा मृत्यू झाला. या भाविकांचे मृतदेह जळगावात दाखल झाले आहेत. त्यासह नेपाळमध्ये अडकलेल्या भाविकांना गोरखपूर इथून विशेष रेल्वेनं महाराष्ट्रात पाठवण्यात आलं आहे. यावेळी गोरखपूरला पोहोचल्यानंतर या भाविकांना अश्रू अनावर झाले.

Nepal Bus Accident
नेपाळ बस अपघातातील परतलेले भाविक (ETV Bharat)
मायभूमीत परतताच भाविकांचा सुटला बांध; नातेवाईकांच्या आठवणीनं कोसळलं रडू (ETV Bharat)

गोरखपूर Nepal Bus Accident : नेपाळ बस अपघघातात जळगाव जिल्ह्यातील तब्बल 27 भाविकांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या नागरिकांचे मृतदेह नेपाळहून महाराष्ट्रात आणले आहेत. दुसरीकडं उत्तर प्रदेश सरकारनं अन्य दोन बसमधील 48 प्रवाशांना गोरखपूरला आणून भुसावळमार्गे मुंबईला रेल्वेनं पाठवलं आहे. शनिवारी रात्री हे भाविक रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांच्या भावनेचा बांध तुटला. आपल्या मृत झालेल्या नातेवाईकांच्या आठवणीनं त्यांना रडू कोसळलं. या अपघातात परेशच्या मोठ्या भावासह पाच नातावाईकांचा मृत्यू झाला आहे.

Nepal Bus Accident
नेपाळ बस अपघातातील परतलेले भाविक (ETV Bharat)

नेपाळ बस अपघातात तब्बल 27 भाविकांचा मृत्यू : नेपाळ बस अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरी सोडण्यात येत आहे. गोरखपूरच्या केसरवाणी ट्रॅव्हलच्या तीन बस पोखराहून काठमांडूकडं जात होत्या. यामध्ये 110 प्रवासी होते. बस तनहुन इथल्या अंबुखारेणी इथं पोहोचताच खराब हवामानामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे बस नदीत कोसळून हा भीषण अपघात घडला. यामध्ये 28 जणांचा जागीच मृत्यू झाला. काही जखमींवर काठमांडूमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात बसचा चालक मुस्तफा आणि गोरखपूर इथला रहिवासी असलेल्या हेल्परचाही मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह त्याच्या घरी पोहोचवण्यात आला आहे.

Nepal Bus Accident
भाविकांची बस (ETV Bharat)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार आणलं गोरखपूरला : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार बचावलेल्या रेल्वे प्रवाशांना गोरखपूर आणि महाराजगंज जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं गोरखपूरला आणण्यात आलं. इथं जिल्हा प्रशासन आणि भाजपाच्या प्रतिनिधींनी प्रवाशांशी चर्चा करुन त्यांची प्रकृती जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाकडून प्रवाशांच्या खाण्यापिण्याची आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रशासनानं महाराष्ट्रात जाणाऱ्या ट्रेनमध्ये विशेष बोगीत बसवून या भाविकांना महाराष्ट्रात पाठवलं.

Nepal Bus Accident
भाविकांची बस (ETV Bharat)

सरकारनं आम्हाला खूप मदत केली : यावेळी अपघाताची माहिती देताना भाविकांनी सांगितलं की, नेपाळ सरकार, भारत सरकार आणि राज्य सरकारनं आम्हाला खूप मदत केली आहे. यादरम्यान अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विनीत कुमार सिंह म्हणाले की, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार नेपाळ बस अपघातातील भाविकांना गोरखपूरला आणण्यात आलं आहे. गोरखपूरहून महाराष्ट्रात रेल्वेनं या भाविकांना पाठवण्यात येत आहे."

सरकारकडून करण्यात आली सर्व व्यवस्था : भाजपाचे आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्र सिंह म्हणाले की, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या सूचनेनुसार भाविकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात पोहोचता यावं, यासाठी आम्ही इथं आलो आहोत. राज्य सरकारकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना महाराष्ट्रात पोहोचताना कोणतीही अडचण येणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत."

हेही वाचा :

  1. नेपाळ बस अपघात : 24 जणांच्या मृत्यूनं वरणगावावर शोककळा, भावासोबतचा 'तो' व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा; रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल - Nepal Bus Accident
  2. नेपाळ बस दुर्घटना : रक्षा खडसे यांनी घेतली अपघातग्रस्तांची भेट; पाहा व्हिडिओ - Nepal Bus Accident
  3. हुंदके अन्‌ मन हेलावणारा आक्रोश; नेपाळ बस दुर्घटनेतील 27 जणांचे मृतदेह जळगावात दाखल - Nepal Bus Accident

मायभूमीत परतताच भाविकांचा सुटला बांध; नातेवाईकांच्या आठवणीनं कोसळलं रडू (ETV Bharat)

गोरखपूर Nepal Bus Accident : नेपाळ बस अपघघातात जळगाव जिल्ह्यातील तब्बल 27 भाविकांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या नागरिकांचे मृतदेह नेपाळहून महाराष्ट्रात आणले आहेत. दुसरीकडं उत्तर प्रदेश सरकारनं अन्य दोन बसमधील 48 प्रवाशांना गोरखपूरला आणून भुसावळमार्गे मुंबईला रेल्वेनं पाठवलं आहे. शनिवारी रात्री हे भाविक रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांच्या भावनेचा बांध तुटला. आपल्या मृत झालेल्या नातेवाईकांच्या आठवणीनं त्यांना रडू कोसळलं. या अपघातात परेशच्या मोठ्या भावासह पाच नातावाईकांचा मृत्यू झाला आहे.

Nepal Bus Accident
नेपाळ बस अपघातातील परतलेले भाविक (ETV Bharat)

नेपाळ बस अपघातात तब्बल 27 भाविकांचा मृत्यू : नेपाळ बस अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरी सोडण्यात येत आहे. गोरखपूरच्या केसरवाणी ट्रॅव्हलच्या तीन बस पोखराहून काठमांडूकडं जात होत्या. यामध्ये 110 प्रवासी होते. बस तनहुन इथल्या अंबुखारेणी इथं पोहोचताच खराब हवामानामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे बस नदीत कोसळून हा भीषण अपघात घडला. यामध्ये 28 जणांचा जागीच मृत्यू झाला. काही जखमींवर काठमांडूमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात बसचा चालक मुस्तफा आणि गोरखपूर इथला रहिवासी असलेल्या हेल्परचाही मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह त्याच्या घरी पोहोचवण्यात आला आहे.

Nepal Bus Accident
भाविकांची बस (ETV Bharat)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार आणलं गोरखपूरला : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार बचावलेल्या रेल्वे प्रवाशांना गोरखपूर आणि महाराजगंज जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं गोरखपूरला आणण्यात आलं. इथं जिल्हा प्रशासन आणि भाजपाच्या प्रतिनिधींनी प्रवाशांशी चर्चा करुन त्यांची प्रकृती जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाकडून प्रवाशांच्या खाण्यापिण्याची आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रशासनानं महाराष्ट्रात जाणाऱ्या ट्रेनमध्ये विशेष बोगीत बसवून या भाविकांना महाराष्ट्रात पाठवलं.

Nepal Bus Accident
भाविकांची बस (ETV Bharat)

सरकारनं आम्हाला खूप मदत केली : यावेळी अपघाताची माहिती देताना भाविकांनी सांगितलं की, नेपाळ सरकार, भारत सरकार आणि राज्य सरकारनं आम्हाला खूप मदत केली आहे. यादरम्यान अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विनीत कुमार सिंह म्हणाले की, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार नेपाळ बस अपघातातील भाविकांना गोरखपूरला आणण्यात आलं आहे. गोरखपूरहून महाराष्ट्रात रेल्वेनं या भाविकांना पाठवण्यात येत आहे."

सरकारकडून करण्यात आली सर्व व्यवस्था : भाजपाचे आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्र सिंह म्हणाले की, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या सूचनेनुसार भाविकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात पोहोचता यावं, यासाठी आम्ही इथं आलो आहोत. राज्य सरकारकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना महाराष्ट्रात पोहोचताना कोणतीही अडचण येणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत."

हेही वाचा :

  1. नेपाळ बस अपघात : 24 जणांच्या मृत्यूनं वरणगावावर शोककळा, भावासोबतचा 'तो' व्हिडिओ कॉल ठरला शेवटचा; रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल - Nepal Bus Accident
  2. नेपाळ बस दुर्घटना : रक्षा खडसे यांनी घेतली अपघातग्रस्तांची भेट; पाहा व्हिडिओ - Nepal Bus Accident
  3. हुंदके अन्‌ मन हेलावणारा आक्रोश; नेपाळ बस दुर्घटनेतील 27 जणांचे मृतदेह जळगावात दाखल - Nepal Bus Accident
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.