नवी दिल्ली Arvind Kejriwal on CAA : केंद्र सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच (CAA) लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केलीय. यासोबतच आता देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झालाय. यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलंय. केंद्र सरकारच्या या निर्णयावरही टीका होतेय. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर (CAA) पत्रकार परिषद घेतली. हा व्होट बँक निर्माण करण्याचा खेळ असून भाजपा व्होट बँकेचं राजकारण करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
भाजपा आपली व्होट बॅंक तयार करत आहे : भाजपावर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, "की," भाजपानं 10 वर्षात काम केलं असते तर त्यांना निवडणुकीपूर्वी CAA आणण्याची गरज भासली नसती. CAA अंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सुमारे 2.5 कोटी ते 3 कोटी अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिलं जाईल. मोदी सरकार देशाचा हक्क पाकिस्तानींना देत आहेत. CAA मुळं ईशान्येकडील राज्यांचं अधिक नुकसान होणार आहे. इतर देश बाहेरच्या लोकांना येण्यापासून रोखतात. भाजपानं निवडणूक फायद्यासाठी CAA आणलाय. CAA मागं घ्यावा अशी देशाची मागणी आहे. देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. भाजपानं 10 वर्षात काम केलं असते तर त्यांना निवडणुकीपूर्वी CAA आणण्याची गरज भासली नसती. CAA अंतर्गत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सुमारे 2.5 कोटी ते 3 कोटी अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिलं जाईल. भारतातील महागाईनं कंबरडं मोडलंय. बेरोजगारीचं प्रमाण शिगेला पोहोचलय. तरुणांना नोकऱ्यांसाठी दारोदारी पायपीट करावी लागत आहे."
-
CAA क़ानून देश के हित में नहीं है। कैसे? इस वीडियो को ज़रूर देखें और ज़्यादा से ज़्यादा लोगों को दिखाएं … pic.twitter.com/j0QKKQEK8m
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 13, 2024