यवतमाळमधील बोरला येथे उकळते पाणी; भूकंपाचा धक्का असल्याचा अंदाज
यवतमाळ - चार दिवसांपूर्वी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात ४.४ रिस्टर स्केलचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र महागाव तालुक्यातील साधुनगर हे होते. आंबोडा येथील माधव भोयर यांच्या राहत्या घरी विहिरीतून अचानक गरम पाणी येत असल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. हा भूकंपाचा परिणाम असून, भूगर्भातून गरम पाणी येत असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.