आम्ही महाराष्ट्रात सुखी! आम्हाला चांगल वाटते महाराष्ट्रात, कानडी लोकांनी व्यक्त केली भावना
पुणे कर्नाटकामध्ये महाराष्ट्रातील गावे सामील करून घेण्याचा निर्णयावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सातत्याने वक्तव्य करत असताना त्याचबरोबर महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना कर्नाटकामध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आल्यानंतर सीमा प्रश्न चांगलाच तापलेला आहे. काल कन्नड वेदिका रक्षिता संघटनेकडून सीमा भागामध्ये महाराष्ट्राच्या 6 ट्रक्सवर दगडफेक करण्यात आली. आणि यानंतर याप्रकरणी काल पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले असून पुण्यात कर्नाटकच्या गाड्यांवर काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला. आणि आज या प्रकरणावर पुण्यात राहत असलेल्या कन्नडी लोकांनी एकत्र येत आम्हाला महाराष्ट्रात राहायला खूप चांगल वाटत असून आमच्या 2-2 पिढ्या या ठिकाणी राहत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST