ETV Bharat / sukhibhava

अन्न पचण्यासाठी अन् निरोगी राहण्यासाठी ‘हे’ करणे आवश्यक - जेवण करण्याची आरोग्यदायी पद्धत

जमिनीवर मांडी घालून बसत जेवण करणे ही अतिशय चांगली आणि आरोग्यदायी सवय आहे. मात्र, आधुनिककरणाकडे झुकलेल्या समाजात सध्या जमिनीवर बसून जेवण करणे कमीपणाचे मानले जाते. याबाबत ईटीव्ही भारत सुखी भव्ं ने न्यूट्रिशनिस्ट डॉ. संगीता मालू यांच्याकडून अधिक माहिती घेतली.

Food
जेवण
author img

By

Published : Dec 17, 2020, 6:26 AM IST

हैदराबाद - जमिनीवर बसून जेवणे ही भारतीयांची जुनी परंपरा आहे. अजूनही भारतात अनेक प्रांतात अशा पद्धतीने अन्न ग्रहण करतात. तुम्ही ऐकले असेल तुमचे आजी-आजोबा तुम्हाला जमिनीवर बसून शांत मनाने जेवण करा, असे सांगायचे. त्याने शरीराला पोषक आहार मिळतो, असे ते म्हणायचे. डॉक्टरांचाही यावर विश्वास आहे. मात्र, आधुनिकतेमुळे लोक परंपरा मानत नाहीत आणि पाळतही नाहीत. इंदौरच्या एमजीएम मेडिकल कॉलेज आणि नेहरू चिल्ड्रन्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील न्यूट्रिशनिस्ट डॉ. संगीता मालू यांच्या म्हणण्यानुसार आपण काय खातो, कसे खातो आणि त्यावेळी आपली मन:स्थिती कशी आहे, याचा परिणाम पचन क्रियेवर होत असतो. पण फक्त त्यावरच नाही तर पूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.

तुम्ही उभे राहून जेवलात तर पचन क्रियेत येतो अडथळा -

उभे राहण्यापेक्षा बसणे कधीही आरामदायी असते. आपले शरीर आणि मन शांत राहते. म्हणूनच बसून खाल्ले तर अन्नपदार्थ तुमच्या सर्व पचनक्रियेतून जाते. यामुळे पचन चांगले होते. आणि पचन यंत्रणेवर जास्त जोरही येत नाही, असे डॉ. संगीता मालू सांगतात. दुसरीकडे, जर आपण उभे राहून अन्न खाल्ले तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे अन्न शरीरात सर्व पाचन अवयवांमधून वेगाने जाते. अशा परिस्थितीत एकतर अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही किंवा यामुळे आपल्या पचन यंत्रणेवरचा भार वाढतो. आपले शरीर आवश्यक पोषक घटकांपासून वंचित राहते. यामुळे परिणामी काही रोग देखील उद्भवू शकतात.

खाताना बसण्याचा योग्य मार्ग -

आजकाल बहुतेक लोक जेवणाच्या टेबलाजवळ बसून खाणे पसंत करतात. जे उभे राहून खाण्यापेक्षा चांगले आहे. परंतु अन्नाचे योग्य वेळी पचन व्हावे आणि आपण जे काही खातोय त्यापासून पोषक द्रव्य मिळवण्यासाठी सुखासनात किंवा पद्मासनात बसणे चांगले. या स्थितीत बसल्याने आपल्या पचन प्रक्रियेवर गुरुत्वाकर्षणाचाही प्रभाव पडत नाही, असे डॉ. संगीता सांगतात.

जमिनीवर बसून अन्न ग्रहण करणे का आहे चांगले -

तुमचे हृदय निरोगी राहते -

जमिनीवर बसून अन्नपदार्थांचे सेवन केले तर तुमच्या शरीरात रक्तप्रवाह चांगला खेळतो आणि हृदय चांगले काम करते.

स्नायूंना ताण मिळाल्याने तुमची पचन यंत्रणा चांगली होते. -

जेव्हा आपण सुखासनात किंवा पद्मासनात बसतो तेव्हा आपण खाण्यासाठी नैसर्गिकरित्या खाली झुकतो आणि अन्न गिळण्यासाठी आपल्या परत मागील स्थितीत येतो. अशा प्रकारे पुढे आणि मागे वाकल्याने आपल्या ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात आणि त्यांच्यावर ताण येतो, यामुळे आपली पचन यंत्रणा अधिक चांगले कार्य करण्यास सक्षम होते आणि निरोगी देखील राहते.

सांधे चांगले राहतात -

पद्मासन आणि सुखासनात बसल्याने फक्त पचन यंत्रणाच चांगली होत नाही तर, तुमचे सांधे लवचिक राहायलाही मदत मिळते. या लवचिकतेमुळे हालचाली सोप्या होतात. आणि जमिनीवरही तुम्ही वेदनांशिवाय बसू शकता. शिवाय त्या व्यक्तीला संधीवात आणि ऑस्टिओपोरोसिस होत नाही.

वजन नियंत्रणात राहते -

सुखासन किंवा पद्मासनात बसल्याने मज्जातंतू प्रभावित होतात आणि मन शांत होते. म्हणूनच ध्यान करताना लोक या आसनात बसणे पसंत करतात. या स्थितीत बसून जेवण व्यवस्थित पचत असल्याने, लोक आवश्यकतेपेक्षा जास्त खात नाहीत. त्यामुळे अति खाणे आणि वजन वाढणे या गोष्टी टाळल्या जातात.

पाठीच्या कण्याच्या समस्या निर्माण होत नाहीत -

अशा पारंपरिक पद्धतीने जेवल्याने तुमची पाठ आणि कणा यांच्या समस्या उद्भवत नाहीत. चुकीच्या पद्धतीने बसल्याने ज्यांना हा त्रास होत आहे, तोही अशा पद्धतीने जेवायला बसल्याने संपतो.

हैदराबाद - जमिनीवर बसून जेवणे ही भारतीयांची जुनी परंपरा आहे. अजूनही भारतात अनेक प्रांतात अशा पद्धतीने अन्न ग्रहण करतात. तुम्ही ऐकले असेल तुमचे आजी-आजोबा तुम्हाला जमिनीवर बसून शांत मनाने जेवण करा, असे सांगायचे. त्याने शरीराला पोषक आहार मिळतो, असे ते म्हणायचे. डॉक्टरांचाही यावर विश्वास आहे. मात्र, आधुनिकतेमुळे लोक परंपरा मानत नाहीत आणि पाळतही नाहीत. इंदौरच्या एमजीएम मेडिकल कॉलेज आणि नेहरू चिल्ड्रन्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील न्यूट्रिशनिस्ट डॉ. संगीता मालू यांच्या म्हणण्यानुसार आपण काय खातो, कसे खातो आणि त्यावेळी आपली मन:स्थिती कशी आहे, याचा परिणाम पचन क्रियेवर होत असतो. पण फक्त त्यावरच नाही तर पूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.

तुम्ही उभे राहून जेवलात तर पचन क्रियेत येतो अडथळा -

उभे राहण्यापेक्षा बसणे कधीही आरामदायी असते. आपले शरीर आणि मन शांत राहते. म्हणूनच बसून खाल्ले तर अन्नपदार्थ तुमच्या सर्व पचनक्रियेतून जाते. यामुळे पचन चांगले होते. आणि पचन यंत्रणेवर जास्त जोरही येत नाही, असे डॉ. संगीता मालू सांगतात. दुसरीकडे, जर आपण उभे राहून अन्न खाल्ले तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे अन्न शरीरात सर्व पाचन अवयवांमधून वेगाने जाते. अशा परिस्थितीत एकतर अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही किंवा यामुळे आपल्या पचन यंत्रणेवरचा भार वाढतो. आपले शरीर आवश्यक पोषक घटकांपासून वंचित राहते. यामुळे परिणामी काही रोग देखील उद्भवू शकतात.

खाताना बसण्याचा योग्य मार्ग -

आजकाल बहुतेक लोक जेवणाच्या टेबलाजवळ बसून खाणे पसंत करतात. जे उभे राहून खाण्यापेक्षा चांगले आहे. परंतु अन्नाचे योग्य वेळी पचन व्हावे आणि आपण जे काही खातोय त्यापासून पोषक द्रव्य मिळवण्यासाठी सुखासनात किंवा पद्मासनात बसणे चांगले. या स्थितीत बसल्याने आपल्या पचन प्रक्रियेवर गुरुत्वाकर्षणाचाही प्रभाव पडत नाही, असे डॉ. संगीता सांगतात.

जमिनीवर बसून अन्न ग्रहण करणे का आहे चांगले -

तुमचे हृदय निरोगी राहते -

जमिनीवर बसून अन्नपदार्थांचे सेवन केले तर तुमच्या शरीरात रक्तप्रवाह चांगला खेळतो आणि हृदय चांगले काम करते.

स्नायूंना ताण मिळाल्याने तुमची पचन यंत्रणा चांगली होते. -

जेव्हा आपण सुखासनात किंवा पद्मासनात बसतो तेव्हा आपण खाण्यासाठी नैसर्गिकरित्या खाली झुकतो आणि अन्न गिळण्यासाठी आपल्या परत मागील स्थितीत येतो. अशा प्रकारे पुढे आणि मागे वाकल्याने आपल्या ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात आणि त्यांच्यावर ताण येतो, यामुळे आपली पचन यंत्रणा अधिक चांगले कार्य करण्यास सक्षम होते आणि निरोगी देखील राहते.

सांधे चांगले राहतात -

पद्मासन आणि सुखासनात बसल्याने फक्त पचन यंत्रणाच चांगली होत नाही तर, तुमचे सांधे लवचिक राहायलाही मदत मिळते. या लवचिकतेमुळे हालचाली सोप्या होतात. आणि जमिनीवरही तुम्ही वेदनांशिवाय बसू शकता. शिवाय त्या व्यक्तीला संधीवात आणि ऑस्टिओपोरोसिस होत नाही.

वजन नियंत्रणात राहते -

सुखासन किंवा पद्मासनात बसल्याने मज्जातंतू प्रभावित होतात आणि मन शांत होते. म्हणूनच ध्यान करताना लोक या आसनात बसणे पसंत करतात. या स्थितीत बसून जेवण व्यवस्थित पचत असल्याने, लोक आवश्यकतेपेक्षा जास्त खात नाहीत. त्यामुळे अति खाणे आणि वजन वाढणे या गोष्टी टाळल्या जातात.

पाठीच्या कण्याच्या समस्या निर्माण होत नाहीत -

अशा पारंपरिक पद्धतीने जेवल्याने तुमची पाठ आणि कणा यांच्या समस्या उद्भवत नाहीत. चुकीच्या पद्धतीने बसल्याने ज्यांना हा त्रास होत आहे, तोही अशा पद्धतीने जेवायला बसल्याने संपतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.