ETV Bharat / sukhibhava

सकाळी रिकाम्या पोटी चहा - कॉफी ऐवजी 'हे' प्या, तज्ज्ञांचा सल्ला

author img

By

Published : Sep 29, 2021, 7:05 PM IST

बहुतांश भारतीयांना सकाळची सुरुवात चहा आणि भरपूर नाश्त्याने करणे आवडते. मात्र, ही निरोगी सवय नाही. दिवसाच्या चांगल्या आणि निरोगी सुरुवातीसाठी योग्य आहार योग्य प्रमाणात घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याची माहिती देखील आपणास असणे गरजेचे आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

बहुतांश भारतीयांची सकाळची सुरुवात ही चहाने होते, मात्र तज्ज्ञांचे असे मत आहे की, सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे हे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. केवळ चहाच नव्हे तर, अनेक आहार आणि पेय पदार्थ असतात ज्यांच्या रिकाम्या पोटी सेवनाने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, सामान्यत: लोक याबाबत माहिती घेत नाहीत. या पार्श्वभूमीवर सकाळी उठल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन फायद्याचे आहे आणि कोणते पदार्थ नुकसान पोहोचवतात, याबाबत अधिक माहितीसाठी 'ईटीव्ही भारत सुखीभवने' उत्तराखंडच्या पोषण तज्ज्ञ डॉ. मिताली चंद यांच्याशी बातचीत केली.

सकाळी उठल्याबरोबर चहा - कॉफी टाळा

डॉ. मिताली सांगतात की, सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन पोटात जळजळ किंवा अ‍ॅसिडचे कारण ठरू शकते. यांपेक्षा ग्रीन टी किंवा गरम पाण्यात एक चम्मच सहद टाकून त्याचे सेवन करणे फायदेशीर असते, कारण त्यांच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात, त्याचबरोबर ते इम्युनिटीला मजबूत ठेवण्यासोबतच पाचन क्रिया देखील चांगली करतात. इतकेच नव्हे तर, सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी किंवा गरम दुधाचे सेवन देखील शरीरासाठी फायदेशीर असते. परंतु, जर कोणाला सर्दी किंवा कफची समस्या असेल तर, रिकाम्या पोटी दूध घेणे टाळले पाहिजे. या व्यतिरिक्त इतरही काही पदार्थ आहेत ज्यांचे चहाच्या ऐवजी सेवन शरीराला फायदा पोहोचवू शकतात.

सकाळी चहा ऐवजी गव्हाच्या गवताचे पावडर (व्हीट ग्रास) मिसळलेल्या पाण्याने पाचन तंत्राला खूप लाभ मिळतो आणि बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळते. गव्हाच्या गवताच्या पावडरमध्ये अँटी - ऑक्सिडेंट्स व फ्री रॅडिकल्स असतात जे शरीराची सुरक्षा करतात.

रिकाम्या पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन देखील फायद्याचे असते. कोमट पाण्यात एक किंवा दोन चम्मच आवळ्याचे रस मिसळून पिल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

रिकाम्या पोटी अ‍ॅलोव्हेराचे ज्यूस पाण्यात मिसळून पिणे देखील आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. अ‍ॅलोव्हेरामध्ये प्रोटीन आणि विटामिन मोठ्या प्रमाणात असतात जे शरीराला बळकट बनवून ठेवण्यासाठी मदत करतात. ते शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात.

सकाळी रिकाम्या पोटी ठंड कोल्ड्रिंक, दारू किंवा अन्य ठंड पेय पदार्थ घेऊ नये, असा सल्ला डॉ. मिताली यांनी दिला.

सकाळचा नाश्ता कसा असावा?

डॉ. मिताली सांगतात की, आपल्या दिवसाचा पहिला आहार हा नाश्ता आहे. सकाळी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. सकाळी दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी बदाम घेऊन केली जाऊ शकते. कारण, भिजलेल्या बदाममध्ये भरपूर पोषक तत्व आणि विटामिन असतात जे शरीराला बळकट ठेवतात. त्याचबरोबर सकाळी नाश्त्यात दलियाचे सेवन सर्वोत्तम मानले जाते. दलियामध्ये विद्रव्य फाइबर असतात जे बद्धकोष्ठता सारख्या समस्या होण्यास टाळतात. ते कोलेस्टेरॉल देखील कमी करण्यात मदत करते. या व्यतिरिक्त रिकाम्या पोटी सकाळी अंड खाणे देखील शरीरासाठी फायदेशीर असते. रिकाम्या पोटी अंड्याचे सेवन केल्याने पूर्ण दिवस पोट भरल्यासारखे वाटते. अंड्यात कमी प्रमाणात कॅलरी असते जी वजन घटवण्यात मदत करते.

सकाळी रिकाम्या पोटी तेलकट आणि मसालेदार नाश्ता देखील टाळला पाहिजे, कारण त्याने पूर्ण दिवस पोटात अ‍ॅसिडची समस्या, अपचन किंवा छातीत जळजळ आणि पोटात वेदना होऊ शकतात. नाशत्यात सफरचंद, केळी, डाळिंब, संत्री इत्यादी फळांचे सेवन खूप फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त नाश्त्यात या फळांची स्मुदी देखील फायद्याची मानली जाते. यामध्ये फळांबरोबरच सुखा मेवा देखील मिसळता येऊ शकतो.

नाश्त्यात ब्रेड जॅमसोबत पीनट बटर, ओट्स, उपमा, पोहा, व्हेजिटेबल ज्यूस आणि इतर लो कॅलरी आहाराचे सेवन देखील आरोग्यासाठी चांगले असते.

हेही वाचा - मुलांना कोरोना होण्याची भीती वाटतंय? रिसर्च म्हणते...

बहुतांश भारतीयांची सकाळची सुरुवात ही चहाने होते, मात्र तज्ज्ञांचे असे मत आहे की, सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे हे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. केवळ चहाच नव्हे तर, अनेक आहार आणि पेय पदार्थ असतात ज्यांच्या रिकाम्या पोटी सेवनाने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, सामान्यत: लोक याबाबत माहिती घेत नाहीत. या पार्श्वभूमीवर सकाळी उठल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन फायद्याचे आहे आणि कोणते पदार्थ नुकसान पोहोचवतात, याबाबत अधिक माहितीसाठी 'ईटीव्ही भारत सुखीभवने' उत्तराखंडच्या पोषण तज्ज्ञ डॉ. मिताली चंद यांच्याशी बातचीत केली.

सकाळी उठल्याबरोबर चहा - कॉफी टाळा

डॉ. मिताली सांगतात की, सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन पोटात जळजळ किंवा अ‍ॅसिडचे कारण ठरू शकते. यांपेक्षा ग्रीन टी किंवा गरम पाण्यात एक चम्मच सहद टाकून त्याचे सेवन करणे फायदेशीर असते, कारण त्यांच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात, त्याचबरोबर ते इम्युनिटीला मजबूत ठेवण्यासोबतच पाचन क्रिया देखील चांगली करतात. इतकेच नव्हे तर, सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी किंवा गरम दुधाचे सेवन देखील शरीरासाठी फायदेशीर असते. परंतु, जर कोणाला सर्दी किंवा कफची समस्या असेल तर, रिकाम्या पोटी दूध घेणे टाळले पाहिजे. या व्यतिरिक्त इतरही काही पदार्थ आहेत ज्यांचे चहाच्या ऐवजी सेवन शरीराला फायदा पोहोचवू शकतात.

सकाळी चहा ऐवजी गव्हाच्या गवताचे पावडर (व्हीट ग्रास) मिसळलेल्या पाण्याने पाचन तंत्राला खूप लाभ मिळतो आणि बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळते. गव्हाच्या गवताच्या पावडरमध्ये अँटी - ऑक्सिडेंट्स व फ्री रॅडिकल्स असतात जे शरीराची सुरक्षा करतात.

रिकाम्या पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन देखील फायद्याचे असते. कोमट पाण्यात एक किंवा दोन चम्मच आवळ्याचे रस मिसळून पिल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

रिकाम्या पोटी अ‍ॅलोव्हेराचे ज्यूस पाण्यात मिसळून पिणे देखील आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते. अ‍ॅलोव्हेरामध्ये प्रोटीन आणि विटामिन मोठ्या प्रमाणात असतात जे शरीराला बळकट बनवून ठेवण्यासाठी मदत करतात. ते शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात.

सकाळी रिकाम्या पोटी ठंड कोल्ड्रिंक, दारू किंवा अन्य ठंड पेय पदार्थ घेऊ नये, असा सल्ला डॉ. मिताली यांनी दिला.

सकाळचा नाश्ता कसा असावा?

डॉ. मिताली सांगतात की, आपल्या दिवसाचा पहिला आहार हा नाश्ता आहे. सकाळी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. सकाळी दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी बदाम घेऊन केली जाऊ शकते. कारण, भिजलेल्या बदाममध्ये भरपूर पोषक तत्व आणि विटामिन असतात जे शरीराला बळकट ठेवतात. त्याचबरोबर सकाळी नाश्त्यात दलियाचे सेवन सर्वोत्तम मानले जाते. दलियामध्ये विद्रव्य फाइबर असतात जे बद्धकोष्ठता सारख्या समस्या होण्यास टाळतात. ते कोलेस्टेरॉल देखील कमी करण्यात मदत करते. या व्यतिरिक्त रिकाम्या पोटी सकाळी अंड खाणे देखील शरीरासाठी फायदेशीर असते. रिकाम्या पोटी अंड्याचे सेवन केल्याने पूर्ण दिवस पोट भरल्यासारखे वाटते. अंड्यात कमी प्रमाणात कॅलरी असते जी वजन घटवण्यात मदत करते.

सकाळी रिकाम्या पोटी तेलकट आणि मसालेदार नाश्ता देखील टाळला पाहिजे, कारण त्याने पूर्ण दिवस पोटात अ‍ॅसिडची समस्या, अपचन किंवा छातीत जळजळ आणि पोटात वेदना होऊ शकतात. नाशत्यात सफरचंद, केळी, डाळिंब, संत्री इत्यादी फळांचे सेवन खूप फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त नाश्त्यात या फळांची स्मुदी देखील फायद्याची मानली जाते. यामध्ये फळांबरोबरच सुखा मेवा देखील मिसळता येऊ शकतो.

नाश्त्यात ब्रेड जॅमसोबत पीनट बटर, ओट्स, उपमा, पोहा, व्हेजिटेबल ज्यूस आणि इतर लो कॅलरी आहाराचे सेवन देखील आरोग्यासाठी चांगले असते.

हेही वाचा - मुलांना कोरोना होण्याची भीती वाटतंय? रिसर्च म्हणते...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.