यवतमाळ - जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी होत असताना शेतकऱ्यांना रांगेत वाट पाहावी लागत आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोदामांची साठवण क्षमता कमी असल्याने जिल्हा प्रशासन थेट गोदामे भाड्याने घेणार आहे.
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी बाजार समित्यांचे व खाजगी गोदाम तूर व कापूस खरेदीकरीता भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने कापूस आणि तुरीचे उत्पादनही चांगले झाले आहे. मात्र, शेतकऱयांचा माल साठविण्यासाठी गोदामांची कमतरता जाणवत आहे. राज्य वखार महामंडळांचे गोदाम अपुरे पडत आहे. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले, येत्या दोन-तीन दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची तसेच खाजगी गोदाम भाड्याने करण्यात येणार आहे. मंगळवारपासून या गोदांमाचा वापरही सुरू होणार आहे.
हेही वाचा-चिंताजनक! केंद्र सरकारने मिळविलेल्या महसुलापैकी ८४.१ टक्के जानेवारीपर्यंत खर्च
तूर व कापूसाला किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे, अशी अपेक्षा आहे. गोदाम भाड्याने घेतल्याने शेतकऱ्यांना रांगेत त्रास कमी होणार आहे. हमीभावापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी जिल्हाप्रशासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, याचा विचार करूनच संबंधित यंत्रणेला गोदाम भाडेतत्वावर घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-कर्नाटकमधील ओवा उत्पादक शेतकऱ्यांना कोरोनाचा आर्थिक फटका
जिल्ह्यात जवळपास 9 लाख 7 हजार हेक्टरवर खरीप आणि 87 हजार हेक्टरवर रब्बीच्या पिकांची लागवड करण्यात येते. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांचे चांगले उत्पादन जिल्ह्यात होते. तुरीला 5,800 रुपये किमान आधारभूत किंमत आहे.