ETV Bharat / state

'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या खेळाडूच्या गाडीला अपघात; वर्ध्याच्या दोन क्रिकेटपटूंचा अपघाती मृत्यू

author img

By

Published : Dec 29, 2019, 9:27 AM IST

Updated : Dec 29, 2019, 12:40 PM IST

हे खेळाडू यवतमाळला क्रिकेट सामना खेळण्यासाठी आले होते. सामना झाल्यानंतर ते आलेल्या वाहनाने आपल्या पालकांसोबत परत निघाले. दरम्यान, चापडोह पुनर्वसनजवळ त्यांचे वाहन दुभाजकावर आदळले. अपघातात दोन क्रिकेटपटूंचा  मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जयेश प्रविण लोहिया (वय 10) आणि अक्षद अभिषेक बैद (वय 11), अशी मृतांची नावे आहेत.

acci
अपघातग्रस्त वाहन

यवतमाळ - क्रिकेट सामना खेळून वर्धा येथे परतणाऱ्या क्रिकेटपटूंच्या गाडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर-तुळजापूर महामार्गावर घडली आहे. या अपघातात दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जयेश प्रविण लोहिया (वय 10) आणि अक्षद अभिषेक बैद (वय 11), अशी मृतांची नावे आहेत. हे खेळाडू वर्ध्याच्या 'ब्रदरहूड' क्रिकेट क्लबचे होते.

'पद्मविलास क्रिकेट क्लब'ने यवतमाळच्या गोधणी मार्गावर 'टी-ट्वेंटी' सामन्यांचे आयोजन केले होते. हे खेळाडू यवतमाळला क्रिकेट सामना खेळण्यासाठी आले होते. सामना झाल्यानंतर ते आलेल्या वाहनाने आपल्या पालकांसोबत परत निघाले. दरम्यान, चापडोह पुनर्वसनजवळ त्यांचे वाहन दुभाजकावर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की वाहनातील दोन क्रिकेटपटूंचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - पालघरमध्ये दुचाकीला अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी

तर, अन्य दोन खेळाडू दर्श सुमित आचलीया (वय ११) आणि रोमित अजय गलांडे (वय ११) तसेच, मृत जयेशचे वडील प्रविण लोहिया आणि अतुल प्रकाश केळकर हे चौघे जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातावेळी प्रविण लोहिया वाहन चालवत होते. अपघातापूर्वी पार पडलेल्या सामन्यात मृत जयेश ६ गडी बाद करून 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता.

यवतमाळ - क्रिकेट सामना खेळून वर्धा येथे परतणाऱ्या क्रिकेटपटूंच्या गाडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर-तुळजापूर महामार्गावर घडली आहे. या अपघातात दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जयेश प्रविण लोहिया (वय 10) आणि अक्षद अभिषेक बैद (वय 11), अशी मृतांची नावे आहेत. हे खेळाडू वर्ध्याच्या 'ब्रदरहूड' क्रिकेट क्लबचे होते.

'पद्मविलास क्रिकेट क्लब'ने यवतमाळच्या गोधणी मार्गावर 'टी-ट्वेंटी' सामन्यांचे आयोजन केले होते. हे खेळाडू यवतमाळला क्रिकेट सामना खेळण्यासाठी आले होते. सामना झाल्यानंतर ते आलेल्या वाहनाने आपल्या पालकांसोबत परत निघाले. दरम्यान, चापडोह पुनर्वसनजवळ त्यांचे वाहन दुभाजकावर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की वाहनातील दोन क्रिकेटपटूंचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - पालघरमध्ये दुचाकीला अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी

तर, अन्य दोन खेळाडू दर्श सुमित आचलीया (वय ११) आणि रोमित अजय गलांडे (वय ११) तसेच, मृत जयेशचे वडील प्रविण लोहिया आणि अतुल प्रकाश केळकर हे चौघे जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातावेळी प्रविण लोहिया वाहन चालवत होते. अपघातापूर्वी पार पडलेल्या सामन्यात मृत जयेश ६ गडी बाद करून 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता.

Intro:Body:यवतमाळ : वर्धेतून यवतमाळमध्ये क्रिकेट सामना खेळून परत जाणाऱ्या दोघा क्रिकेट खेळाडूंचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे. पद्मविलास क्रिकेट क्लबने यवतमाळच्या गोधणी मार्गावर ह्या टी ट्वेन्टी सामन्यांचे आयोजन केले होते. सामना झाल्यानंतर वर्धेतील क्रिकेट क्लबचे हे खेळाडू एस क्रॉस कार (एमएच ३२ ए एच ३७७७) ने पालकांसोबत वर्धेकरिता निघाले होते. दरम्यान चापडोह पुनर्वसन जवळ नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावर त्यांचे वाहन दुभाजकावर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की वाहनातील दोन क्रिकेट खेळाडू ठार झाले. जयेश प्रवीण लोहिया (१०,रा. रामनगर वर्धा) व अक्षद अभिषेक बैद (११ रा. वर्धा) हे अपघातातील मृतांचे नाव आहे. तर अन्य दोन खेळाडू दर्श सुमित आचलीया (११ वर्ष व रोमित अजय गलांडे ११ दोघेही रा. वर्धा) तसेच मृत जयेशचे वडील प्रवीण मोहन लोहिया ( ४० ) आणि अतुल प्रकाश केळकर ( ४० ) हे चौघे जण अपघातात गंभीर जखमी झाले आहे. प्रवीण लोहिया हे वाहन चालवीत होते. ब्रदर हूड क्रिकेट क्लब वर्धाचे हे खेळाडू सामना खेळून परत निघाले होते. त्यात मृत जयेश हा ६ बळी घेऊन मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्यानंतर गोधणी मार्गातून घाटंजी बायपास येथून नागपूर कडे जात असताना चापडोह गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघात होताच ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.Conclusion:
Last Updated : Dec 29, 2019, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.