ETV Bharat / state

शिक्षणासाठी दिघीतील विद्यार्थी करतात जीवघेणा प्रवास, पार करावी लागते नदी - यवतमाळ जिल्हा शिक्षण बातमी

उमरखेड तालुक्यात चातारी गावाजवळ पैनगंगा नदी वाहते. ही नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असल्याने नांदेड जिल्ह्यातील दिघी आणि लगतच्या ३-४ गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी चातारी येथे यावे लागते. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी या मुलांना तराफ्यात किंवा लाकडी नावेत बसून नदी ओलांडून जावे लागते.

दिघी गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास
author img

By

Published : Sep 16, 2019, 11:22 AM IST

Updated : Sep 16, 2019, 1:03 PM IST

यवतमाळ - उमरखेड तालुक्यातील सीमेवरील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी नागरिक करत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता काही उपाय योजण्याची मागणीही पालकांकडून करण्यात येत आहे.

शिक्षणासाठी दिघी गावातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात


उमरखेड तालुक्यात चातारी गावाजवळ पैनगंगा नदी वाहते. या नदीच्या पलीकडे नांदेड जिल्हा तर अलीकडे यवतमाळ जिल्हा आहे. ही पैनगंगा नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील दिघी आणि लगतच्या ३-४ गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी चातारी येथे यावे लागते. शाळेत जाण्यासाठी या मुलांना अशा तराफ्यात किंवा लाकडी नावेत बसून नदी ओलांडून जावे लागते. मागील अनेक वर्षापासून या नदीवर पूल व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी मात्र, याकडे कुणीच लक्ष दिले नाही असे गावकरी म्हणतात.

हेही वाचा - जिल्हा क्रीडा विभागाचा प्रताप, तालुकास्तरीय शालेय स्पर्धेसाठी दिले दगडांनी भरलेले मैदान


चातारीला येण्यासाठी दुसरीकडुन किलोमीटर अंतरावरून आणि शेतातून वाट काढत यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी या नदी पात्रातून येतात मात्र, त्यांचा प्रवास अडचणीचा असल्याचे पालक सांगतात. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा प्रवास अशाच प्रकारे सुरु असून रोज 35 ते 40 विद्यार्थी असा प्रवास करतात. त्यामुळे हा धोकादायक प्रवास सुखकर व्हावा यासाठी नदीवर पूल बांधण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - शासकीय वसतीगृहामुळे शिक्षणाचा मार्ग सुकर; वडिलांचा शिक्षणाचा आर्थिक भार झाला कमी

यवतमाळ - उमरखेड तालुक्यातील सीमेवरील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी नागरिक करत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता काही उपाय योजण्याची मागणीही पालकांकडून करण्यात येत आहे.

शिक्षणासाठी दिघी गावातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात


उमरखेड तालुक्यात चातारी गावाजवळ पैनगंगा नदी वाहते. या नदीच्या पलीकडे नांदेड जिल्हा तर अलीकडे यवतमाळ जिल्हा आहे. ही पैनगंगा नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील दिघी आणि लगतच्या ३-४ गावातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी चातारी येथे यावे लागते. शाळेत जाण्यासाठी या मुलांना अशा तराफ्यात किंवा लाकडी नावेत बसून नदी ओलांडून जावे लागते. मागील अनेक वर्षापासून या नदीवर पूल व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी मात्र, याकडे कुणीच लक्ष दिले नाही असे गावकरी म्हणतात.

हेही वाचा - जिल्हा क्रीडा विभागाचा प्रताप, तालुकास्तरीय शालेय स्पर्धेसाठी दिले दगडांनी भरलेले मैदान


चातारीला येण्यासाठी दुसरीकडुन किलोमीटर अंतरावरून आणि शेतातून वाट काढत यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी या नदी पात्रातून येतात मात्र, त्यांचा प्रवास अडचणीचा असल्याचे पालक सांगतात. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा प्रवास अशाच प्रकारे सुरु असून रोज 35 ते 40 विद्यार्थी असा प्रवास करतात. त्यामुळे हा धोकादायक प्रवास सुखकर व्हावा यासाठी नदीवर पूल बांधण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - शासकीय वसतीगृहामुळे शिक्षणाचा मार्ग सुकर; वडिलांचा शिक्षणाचा आर्थिक भार झाला कमी

Intro:nullBody:यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील सीमेवरील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
उमरखेड तालुक्यातील चातारी गाव जवळ पैनगंगा नदीच्या वाहते. याच नदीच्या पलीकडे नांदेड जिल्हा तर अलीकडे यवतमाळ जिल्हा आहे. हीच पैनगंगा नदी दोन जिल्ह्यामधून वाहते
पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील दिघी आणि लगतच्या तीन चार गावांतील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणच्या पुढच्या शिक्षणासाठी चातारी येथे यावे लागते. त्यासाठी ही शाळकरी मुलं अशा रूफ रपतट्यावर बसून शिक्षणासाठी त्यांना प्रवास करावा लागतो. मागील अनेक वर्षापासून या नदीवर पूल व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी मात्र, याकडे कुणीच लक्ष दिले नाही असे गावकरी म्हणतात.
दिघी आणि लगतच्या गावांतील विद्यार्थी चातारीला शिक्षणासाठी येतात.
दुसरी कडुन चातारीला येण्यासाठी दीड किलोमीटर अंतरावरून आणि शेतातून वाट काढत यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी या नदी पात्रातून येतात त्यांचा प्रवास अडचणीचा असल्याचे पालक सांगतात. मागील अनेक वर्षापासून असा प्रवास सुरु असून रोज 35 ते 40 विद्यार्थी असा प्रवास करतात त्यामुळे हा धोकादायक प्रवास सुखकर व्हावा अशी मागणी गावकऱ्यांची आहे.

बाईट - श्रद्धा तवर, विद्यार्थिनी
बाईट - वैष्णवी गुट्टे, विद्यार्थिनी
बाईट - संजय वानखेडे, पालक
बाईट - नथू देवगडे,नावाडी
Conclusion:null
Last Updated : Sep 16, 2019, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.