यवतमाळ - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडून त्यांची बदनामी सुरू आहे. ही बदनामी थांबविण्याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून दिग्रस तहसीलदारांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले.
विरोधीपक्षाकडून केवळ राजकारण -
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोणतीही चौकशी न होता वनमंत्री संजय राठोड यांची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे राठोड यांना सरळ दोषी सिद्ध करून त्यांचे सामाजिक, राजकीय व कौटुंबिक जीवन उद्धवस्त होत आहे. तसेच राज्यातील विरोधीपक्ष या मुद्याचे राजकारण करून समाजाची दिशाभूल करत आहे. तपासाअंती दोषींवर कार्यवाही व्हावी, अशी मागणी यावेळी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण -
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली.
हेही वाचा - पूजा चव्हाण प्रकरणी वानवाडी पोलीस ठाण्याचे पथक यवतमाळ जिल्हा रुग्णालयात दाखल