ETV Bharat / state

वनमंत्र्याचा फोन न उचलल्याने निवासी डॉक्टर निलंबित; तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

author img

By

Published : Feb 6, 2020, 7:01 PM IST

राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांचा फोन न घेतल्याने शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधीचा अवमान केला म्हणून आणि या पुढे अशा घटना टाळण्यासाठी डॉ. नरोटेंवर कारवाई करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.

वन मंत्री संजय राठोड
वन मंत्री संजय राठोड

यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा फोन न घेतल्याने शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणात तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

वनमंत्र्याचा फोन न उचलल्याने निवासी डॉक्टर निलंबित


वैद्यकीय पदव्युतर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. अच्युत नरोटे या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात ड्युटी होती. त्यावेळी एका विष बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एकाच वेळी सहा रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांची त्यांच्यावर उपचार करताना तारांबळ सुरू होती. विष बाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राठोड यांना फोन लावला. उपचारात व्यग्र असलेल्या डॉक्टरांना ‘तुमच्यासाठी भाऊंचा फोन आहे’ असे सांगितले. मात्र, ‘फोनपेक्षा मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. मी तुझ्या भाऊंसोबत दहा मिनिटांनंतर बोलतो किंवा शक्य असेल तर तुझ्या भाऊलाच येथे घेऊन ये,’ असे उत्तर डॉ. अच्युत नरोटे यांनी दिले.

हेही वाचा - 'काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर कलम ३७०, तिहेरी तलाक सारखे प्रश्न सुटले नसते

रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातील हे संभाषण फोनवर असलेल्या संजय रोठोड यांनी ऐकले. यानंतर डॉ. अच्युत नरोटे यांना दुसऱ्या दिवशी आठ दिवस निलंबन करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले. कुठलाही दोष नसताना केवळ मंत्र्याचा फोन घेतला नाही म्हणून इतकी मोठी शिक्षा का? असा प्रश्न त्यांनी आपल्या वरिष्ठांपुढे उपस्थित केला. लोकप्रतिनिधीचा अवमान केला म्हणून आणि या पुढे अशा घटना टाळण्यासाठी डॉ. नरोटेंवर कारवाई करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.

यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा फोन न घेतल्याने शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणात तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

वनमंत्र्याचा फोन न उचलल्याने निवासी डॉक्टर निलंबित


वैद्यकीय पदव्युतर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. अच्युत नरोटे या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात ड्युटी होती. त्यावेळी एका विष बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एकाच वेळी सहा रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांची त्यांच्यावर उपचार करताना तारांबळ सुरू होती. विष बाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राठोड यांना फोन लावला. उपचारात व्यग्र असलेल्या डॉक्टरांना ‘तुमच्यासाठी भाऊंचा फोन आहे’ असे सांगितले. मात्र, ‘फोनपेक्षा मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. मी तुझ्या भाऊंसोबत दहा मिनिटांनंतर बोलतो किंवा शक्य असेल तर तुझ्या भाऊलाच येथे घेऊन ये,’ असे उत्तर डॉ. अच्युत नरोटे यांनी दिले.

हेही वाचा - 'काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर कलम ३७०, तिहेरी तलाक सारखे प्रश्न सुटले नसते

रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातील हे संभाषण फोनवर असलेल्या संजय रोठोड यांनी ऐकले. यानंतर डॉ. अच्युत नरोटे यांना दुसऱ्या दिवशी आठ दिवस निलंबन करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले. कुठलाही दोष नसताना केवळ मंत्र्याचा फोन घेतला नाही म्हणून इतकी मोठी शिक्षा का? असा प्रश्न त्यांनी आपल्या वरिष्ठांपुढे उपस्थित केला. लोकप्रतिनिधीचा अवमान केला म्हणून आणि या पुढे अशा घटना टाळण्यासाठी डॉ. नरोटेंवर कारवाई करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले.

Intro:Body:यवतमाळ : ठाकरे सरकार मधील मंत्री तसेच यवतमाळ जिल्याचे पालकमंत्री राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांचा फोन न घेतल्याने शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टर ला निलंबित करण्यात आले. तर 3 कर्मचाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

वैद्यकीय पदव्युतर अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. अच्युत नरोटे या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात ड्युटी होती. त्यादरम्यान एकाच वेळी सहा रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांची त्यांच्यावर उपचार करताना तारांबळ सुरू होती. तेवढ्यात एका विष बाधित रुग्णासाठी राजकीय वशीला घेऊन आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने थेट जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना फोन लावला. उपचारात व्यस्त असलेल्या डॉक्टरला ‘तुमच्यासाठी भाऊंचा फोन आहे’ असे सांगितले. मात्र ‘फोनपेक्षा मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णावर उपचार करणे गरजेचे आहे. मी तुझ्या भाऊंसोबत दहा मिनिटांनंतर बोलतो अथवा शक्य असेल तर तुझ्या भाऊलाच येथे घेऊन ये’ असे उत्तर त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातले हे संभाषण फोनवर असलेल्या भाऊने ऐकले. यानंतर कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दुसऱ्या दिवशी थेट 8 दिवस निलंबन करण्यात आल्याचे पत्रच मिळाले. हा प्रकार पाहून या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला जबर धक्का बसला. कुठलाही दोष नसताना केवळ फोन घेतला नाही म्हणून इतकी मोठी शिक्षा का, असा प्रश्न त्याने आपल्या वरिष्ठांपुढे उपस्थित केला. या संदर्भात मार्ड संघटनेने अधिष्ठाता यांना निवेदन देऊन कारवाई मागे घेण्याची मागणी केली.


तर लोकप्रतिनिधीचा अवमान केला म्हणून आणी या पुढे अश्या घटना टाळण्यासाठी त्याच्या वर कारवाई करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले


बाईट:- डॉ मिलिंद कांबळे अधिष्ठाता Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.