ETV Bharat / state

अभिमानास्पद; गावी येऊन विलगीकरणात असलेल्या कष्टकऱ्यांनी केली शाळेची साफसफाई

author img

By

Published : May 16, 2020, 6:18 PM IST

Updated : May 16, 2020, 8:40 PM IST

विलगीकरणात असलेल्या या कष्टकऱ्यांकडून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीच्या डागडुजीसह सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. शाळेत राहताना ते शाळेची सफाई सुद्धा करत आहेत. झाडाला पाणी पण देत असल्याने हे सर्व सगळ्या समोर एक आदर्श ठरत आहेत.

Washim
शाळेची सफाई करताना विलगीकरणातील नागरिक

वाशिम - कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आल्याने, रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेला ग्रामीण भागातील मजूर वर्ग आपापल्या गावी परतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणी या स्थलांतरित मजुरांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र वाशिम जिल्ह्यात विलगीकरणात असलेल्या या कष्टकऱ्यांकडून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीच्या डागडुजीसह सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

अभिमानास्पद; गावी येऊन विलगीकरणात असलेल्या कष्टकऱ्यांनी केली शाळेची साफसफाई

पार्डी टकमोर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आलेल्या या कष्टकऱ्यांकडून एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आपणाकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळा, इमारत व परिसराची स्वच्छता हे मजूर करत आहेत.

पार्डी या गावातील नागरिकांनी स्वतः होऊन १४ दिवस शाळेत राहण्याचा निर्णय घेतला. शाळेत राहताना ते शाळेची सफाई सुद्धा करत आहेत. झाडाला पाणी पण देत असल्याने हे सर्व सगळ्या समोर एक आदर्श ठरत आहेत.

वर्ग खोल्यांची निघालेली फरशी बसविणे, शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती या मजुरांकडून कुठलाही मोबदल्याविना करण्यात येत आहे. शाळा प्रशासनाकडून रंग पुरवण्यात येणार असून शाळेच्या तब्बल 12 खोल्यांची रंगरंगोटी याच उपक्रमातून करण्यात येणार आहे. गावच्या शाळेप्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविल्या जात आहे.

वाशिम - कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आल्याने, रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेला ग्रामीण भागातील मजूर वर्ग आपापल्या गावी परतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बऱ्याच ठिकाणी या स्थलांतरित मजुरांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र वाशिम जिल्ह्यात विलगीकरणात असलेल्या या कष्टकऱ्यांकडून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीच्या डागडुजीसह सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

अभिमानास्पद; गावी येऊन विलगीकरणात असलेल्या कष्टकऱ्यांनी केली शाळेची साफसफाई

पार्डी टकमोर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आलेल्या या कष्टकऱ्यांकडून एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आपणाकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यांना ठेवण्यात आलेल्या शाळा, इमारत व परिसराची स्वच्छता हे मजूर करत आहेत.

पार्डी या गावातील नागरिकांनी स्वतः होऊन १४ दिवस शाळेत राहण्याचा निर्णय घेतला. शाळेत राहताना ते शाळेची सफाई सुद्धा करत आहेत. झाडाला पाणी पण देत असल्याने हे सर्व सगळ्या समोर एक आदर्श ठरत आहेत.

वर्ग खोल्यांची निघालेली फरशी बसविणे, शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती या मजुरांकडून कुठलाही मोबदल्याविना करण्यात येत आहे. शाळा प्रशासनाकडून रंग पुरवण्यात येणार असून शाळेच्या तब्बल 12 खोल्यांची रंगरंगोटी याच उपक्रमातून करण्यात येणार आहे. गावच्या शाळेप्रती असलेल्या आपुलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविल्या जात आहे.

Last Updated : May 16, 2020, 8:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.