ETV Bharat / state

विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा, प्रीमियमपेक्षा 94 रूपये जास्त मिळाला पीकविमा

एका शेतकऱ्याला भरलेल्या प्रीमियमपेक्षा फक्त 94 रुपये जास्त पीकविमा मिळाला आहे. त्यामुळे विमा कंपनीने पुन्हा भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

author img

By

Published : Jul 30, 2019, 10:01 PM IST

प्रीमियमपेक्षा 94 रूपये जास्त मिळाला पीकविमा

वाशिम - शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान झाल्यास त्यांना मोबदला मिळावा, यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली. मात्र, रिसोड तालुक्यातील हाराळ येथील एका शेतकऱ्याला भरलेल्या प्रीमियमपेक्षा फक्त 94 रुपये जास्त पीकविमा मिळाला आहे. त्यामुळे विमा कंपनीने पुन्हा भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

प्रीमियमपेक्षा 94 रूपये जास्त मिळाला पीकविमा

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानबा कलासरे या शेतकऱ्याने गेल्यावर्षी आपल्या 1 हेक्टर शेतीचा पीकविमा काढला. त्यासाठी त्यांनी 672 रुपये प्रीमियम भराला होता. मागील वर्षी शासनाने रिसोड तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतर त्यांना भरपाई मिळेल, अशी अशा होती. मात्र, बँकेत त्यांच्या खात्यावर 766 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे संबंधित विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली असून केवळ प्रीमियमपेक्षा फक्त 94 रुपये जास्त मिळाले आहेत.

रिसोड तालुक्यातील हाराळ येथील ज्ञानबा कलासरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी मागील वर्षी 1 हेक्टर सोयाबीनचा पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत प्रीमियम भरला होता. गेल्यावर्षी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला. त्यामुळे त्यांना चांगली रक्कम मिळेल, अशी अशा होती. मात्र , भरलेल्या रकमेपेक्षा केवळ 94 रुपयेच जास्त मिळाल्याने पीकविमा भरावा का नाही? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.

वाशिम - शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान झाल्यास त्यांना मोबदला मिळावा, यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली. मात्र, रिसोड तालुक्यातील हाराळ येथील एका शेतकऱ्याला भरलेल्या प्रीमियमपेक्षा फक्त 94 रुपये जास्त पीकविमा मिळाला आहे. त्यामुळे विमा कंपनीने पुन्हा भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

प्रीमियमपेक्षा 94 रूपये जास्त मिळाला पीकविमा

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानबा कलासरे या शेतकऱ्याने गेल्यावर्षी आपल्या 1 हेक्टर शेतीचा पीकविमा काढला. त्यासाठी त्यांनी 672 रुपये प्रीमियम भराला होता. मागील वर्षी शासनाने रिसोड तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतर त्यांना भरपाई मिळेल, अशी अशा होती. मात्र, बँकेत त्यांच्या खात्यावर 766 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे संबंधित विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली असून केवळ प्रीमियमपेक्षा फक्त 94 रुपये जास्त मिळाले आहेत.

रिसोड तालुक्यातील हाराळ येथील ज्ञानबा कलासरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी मागील वर्षी 1 हेक्टर सोयाबीनचा पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत प्रीमियम भरला होता. गेल्यावर्षी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला. त्यामुळे त्यांना चांगली रक्कम मिळेल, अशी अशा होती. मात्र , भरलेल्या रकमेपेक्षा केवळ 94 रुपयेच जास्त मिळाल्याने पीकविमा भरावा का नाही? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.

Intro:स्लग:- पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा पीकविमा प्रीमियम पेक्षा मिळाले 94 रुपये जास्त .....

अँकर:- शेतकऱ्यांच पीकाच नुकसान झाल्यास त्यांना मोबदला मिळावा यासाठी शासनाने पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली. मात्र रिसोड तालुक्यातील हाराळ येथील ज्ञानबा कलासरे या शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी आपल्या एक हेक्टर शेतीचा पीकविमा काढला त्यासाठी त्यांना 672 रुपये प्रीमियम भरावा लागला. मागील वर्षी शासनाने रिसोड तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतर त्यांना भरपाई मिळेल अशी अशा होती.मात्र बँकेत त्यांच्या खात्यावर 766 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळं संबंधित विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली असून केवळ प्रीमियम पेक्षा 94 रुपये जास्त मिळाले आहेत. त्यामुळं विमा कंपनीने पुन्हा भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.....

व्हीओ:- रिसोड तालुक्यातील हाराळ येथील ज्ञानबा कलासरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी मागील वर्षी एक हेक्टर सोयाबीन चा पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत प्रीमियम भरला आणि गेल्यावर्षी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला त्यामुळं त्यांना चांगली रक्कम मिळेल अशी अशा होती. मात्र भरलेल्या रकमेपेक्षा केवळ 94 रुपये च जास्त मिळाल्याने पीकविमा भरावा का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे......

बाईट:- ज्ञानबा कलासरे शेतकरीBody:फीड सोबत आहेConclusion:फीड सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.