ETV Bharat / state

वर्ध्यात वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर पालकांना २८ लाखांना गंडा; हाय प्रोफाइल दलालांची टोळी सक्रिय

डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करतात. लहानपणापासून ठरलेले, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालकही जीवाचे रान करतात. मात्र, स्पर्धेच्या युगात मिळालेले कमी मार्क यामुळे निराशा येते. याच संधीचा फायदा घेत, दलाल सावज शोधतात. वैदकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो, असे म्हणून लाखो रुपयांची फसवणूक करतात.

author img

By

Published : Aug 26, 2019, 9:03 AM IST

Updated : Aug 27, 2019, 10:38 AM IST

वर्धामध्ये वैद्यकीय प्रवेश घोटाळा

वर्धा - वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो, असे सांगून पावकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार वर्ध्यात घडला आहे. या प्रकरणात दोन पालकांना तब्बल 28 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार केवळ शहरात किंवा राज्यात नाही तर, देशभरात अशी हाय प्रोफाइल दलालांची टोळी सक्रिय आहे.

वर्ध्यात वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर पालकांना २८ लाखांना गंडा; हाय प्रोफाइल दलालांची टोळी सक्रिय

वर्धा मेडीकल प्रवेश घोटाळा...

वैद्यकीय अभ्यासक्रमाला महाविद्यालयात प्रवेश मिळण्याकरीता नीटची परीक्षा द्यावी लागते. अशा परीक्षेत कमी गुण मिळाले की पालकवर्ग लाखो रुपये घेऊन खासगी कॉलेजच्या दारात उभे राहतात. अशा गरजू पालकांच्या मागावर हे दलाल असतात. वर्ध्यातही असेच प्रकरण घडले आणि 28 लाखांना गंडा घालण्यात दलाल यशस्वी झाले.

गणपती उत्सवापूर्वीच शिक्षकांच्या खात्यांवर होणार पगार जमा

नेमका हा प्रकार सुरू कसा होतो...

मध्यप्रदेशच्या अलीराजपुरचे डॉ. राजेश मिश्रा यांचा मुलगा गौरव आणि जबलपूरचे डॉ. राजेश्वरनाथ पांडे यांच्या मुलाने मेडीकल प्रवेशाकरीता परीक्षा दिली. शासकीय कोट्यातून प्रवेश मिळावे यासाठी लागणारे गुण त्यांना मिळाले नाहीत. पेशाने दोघेही स्वतः डॉक्टर असल्याने मुलांनीही वारसा चालवत डॉक्टर व्हावे यासाठी धडपड सुरू केली. कमी गुण मिळाल्याने आदित्य रॉय आणि तिवारी नामक दोघांचा फोन आले. सेवाग्रामला सेमी गव्हरमेंटमध्ये प्रवेश मिळवून देतो, यासाठी तगादा लावला. अखेर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने डॉ. राजेश मिश्रा यांनीही पैशांची जुळवाजुळव केली. मागील काही वर्षातील जमापुंजी 8 लाख आणि उर्वरित 10 लाख हे 2 टक्के व्याजाने काढले आणि ठरल्या प्रमाणे पैसे दिले. असाच प्रकार राजेश्वरनाथ पांडे यांच्या सोबतही घडला आहे. त्यांनीही 10 लाख रूपये दिले. अशाच प्रकारे तिसरा व्यक्तीही फसणार होता, मात्र या प्रकरणाचे बिंग फुटले.

पैसे दिल्यानंतर प्रवेश मिळणार म्हणून आनंदात असतानाच एक संदेश व्हॅटसअ‌ॅपवर आला. यात लिहिलेला संदेशही दुःखद होता. 16 ऑगस्टला आलेला संदेशात मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे मॉप अप राऊंड पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. मात्र, यानंतर जो फोन बंद झाला तो बंदच राहिला. रॉय आणि तिवारी यांचा यानंतर संपर्क झालाच नाही. अखेर संपर्क न होत असल्याने या पालकांनी सेवाग्राम पोलीस स्टेशनला येऊन फसवणुकीची तक्रार दिली.

सेवाग्रामचे कस्तुरबा हेल्थ सोसायटी अंतर्गत महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स येथे शासकीय कोट्यातून म्हणजेच नीट परीक्षेच्या गुणांकन आणि मेरिटच्या आधारावर प्रवेश दिला जातो. पालकांनी ऍडमिशन घेताना चौकशी केली असती तर ही फसवणूक झाली नसती. यामुळे पालकांनी यापुढे काळजी घ्यावी आणि अशा फसवणुकीला बळी पडू नये, असे आव्हान डॉ. नितीन गगणे यांनी केले आहे.

पैश्याचा व्यवहार कसा आणि कुठे झाला...

मिश्रा यांना सुरुवातीला नागपूरला बोलावण्यात आले. त्यांच्याकडून १० लाख रोख, कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या नावे २ लाख ९४ रुपयांचा चेक मागितला. त्यांना खासगी वाहनाने सेवाग्राम रुग्णालयाच्या परिसरात आणल्यानंतर एक दालनातून बाहेर आलेल्या २ जणांनी पैसे घेतले. त्यावेळी रक्कम घेतल्याबाबत एक साध्या कागदावर सही शिक्का देऊन पैसे मिळल्याचे लिहून देण्यात आले. त्यानंतर पुन्हा पैसे घेतले गेले. असाच प्रकारे या दोघांची फसवणूक करण्यात आली.

पोलिसांनी आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करत संबंधितांचा शोध सुरू केला आहे. यात हे नेमके हे कोण आहेत, यांना पालकांचे मोबाईल क्रमांक कसे मिळतात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. फसवणूक करणारे गुन्हेगार हे बाहेर राज्यातील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल, अशी माहिती सेवाग्रामचे ठाणेदार संजय बोठे यांना दिली आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी नीट ही परीक्षा घेतली जाते. या परिक्षेच्या माध्यमातून प्रकिया पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न होतो. पण या प्रकियेत पालक आणि विद्यार्थी यांचे दूरध्वनी क्रमांक अशा दलालांकडे जातातच कसे, हा प्रश्न आहे. हा प्रकार केवळ वर्ध्यात झाला असेही म्हणता येणार नाही, कारण याचा आवाका महाराष्ट्रसह इतर अनेक राज्यात असू शकतो.

वर्धा - वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो, असे सांगून पावकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार वर्ध्यात घडला आहे. या प्रकरणात दोन पालकांना तब्बल 28 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार केवळ शहरात किंवा राज्यात नाही तर, देशभरात अशी हाय प्रोफाइल दलालांची टोळी सक्रिय आहे.

वर्ध्यात वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर पालकांना २८ लाखांना गंडा; हाय प्रोफाइल दलालांची टोळी सक्रिय

वर्धा मेडीकल प्रवेश घोटाळा...

वैद्यकीय अभ्यासक्रमाला महाविद्यालयात प्रवेश मिळण्याकरीता नीटची परीक्षा द्यावी लागते. अशा परीक्षेत कमी गुण मिळाले की पालकवर्ग लाखो रुपये घेऊन खासगी कॉलेजच्या दारात उभे राहतात. अशा गरजू पालकांच्या मागावर हे दलाल असतात. वर्ध्यातही असेच प्रकरण घडले आणि 28 लाखांना गंडा घालण्यात दलाल यशस्वी झाले.

गणपती उत्सवापूर्वीच शिक्षकांच्या खात्यांवर होणार पगार जमा

नेमका हा प्रकार सुरू कसा होतो...

मध्यप्रदेशच्या अलीराजपुरचे डॉ. राजेश मिश्रा यांचा मुलगा गौरव आणि जबलपूरचे डॉ. राजेश्वरनाथ पांडे यांच्या मुलाने मेडीकल प्रवेशाकरीता परीक्षा दिली. शासकीय कोट्यातून प्रवेश मिळावे यासाठी लागणारे गुण त्यांना मिळाले नाहीत. पेशाने दोघेही स्वतः डॉक्टर असल्याने मुलांनीही वारसा चालवत डॉक्टर व्हावे यासाठी धडपड सुरू केली. कमी गुण मिळाल्याने आदित्य रॉय आणि तिवारी नामक दोघांचा फोन आले. सेवाग्रामला सेमी गव्हरमेंटमध्ये प्रवेश मिळवून देतो, यासाठी तगादा लावला. अखेर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने डॉ. राजेश मिश्रा यांनीही पैशांची जुळवाजुळव केली. मागील काही वर्षातील जमापुंजी 8 लाख आणि उर्वरित 10 लाख हे 2 टक्के व्याजाने काढले आणि ठरल्या प्रमाणे पैसे दिले. असाच प्रकार राजेश्वरनाथ पांडे यांच्या सोबतही घडला आहे. त्यांनीही 10 लाख रूपये दिले. अशाच प्रकारे तिसरा व्यक्तीही फसणार होता, मात्र या प्रकरणाचे बिंग फुटले.

पैसे दिल्यानंतर प्रवेश मिळणार म्हणून आनंदात असतानाच एक संदेश व्हॅटसअ‌ॅपवर आला. यात लिहिलेला संदेशही दुःखद होता. 16 ऑगस्टला आलेला संदेशात मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे मॉप अप राऊंड पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. मात्र, यानंतर जो फोन बंद झाला तो बंदच राहिला. रॉय आणि तिवारी यांचा यानंतर संपर्क झालाच नाही. अखेर संपर्क न होत असल्याने या पालकांनी सेवाग्राम पोलीस स्टेशनला येऊन फसवणुकीची तक्रार दिली.

सेवाग्रामचे कस्तुरबा हेल्थ सोसायटी अंतर्गत महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स येथे शासकीय कोट्यातून म्हणजेच नीट परीक्षेच्या गुणांकन आणि मेरिटच्या आधारावर प्रवेश दिला जातो. पालकांनी ऍडमिशन घेताना चौकशी केली असती तर ही फसवणूक झाली नसती. यामुळे पालकांनी यापुढे काळजी घ्यावी आणि अशा फसवणुकीला बळी पडू नये, असे आव्हान डॉ. नितीन गगणे यांनी केले आहे.

पैश्याचा व्यवहार कसा आणि कुठे झाला...

मिश्रा यांना सुरुवातीला नागपूरला बोलावण्यात आले. त्यांच्याकडून १० लाख रोख, कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या नावे २ लाख ९४ रुपयांचा चेक मागितला. त्यांना खासगी वाहनाने सेवाग्राम रुग्णालयाच्या परिसरात आणल्यानंतर एक दालनातून बाहेर आलेल्या २ जणांनी पैसे घेतले. त्यावेळी रक्कम घेतल्याबाबत एक साध्या कागदावर सही शिक्का देऊन पैसे मिळल्याचे लिहून देण्यात आले. त्यानंतर पुन्हा पैसे घेतले गेले. असाच प्रकारे या दोघांची फसवणूक करण्यात आली.

पोलिसांनी आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करत संबंधितांचा शोध सुरू केला आहे. यात हे नेमके हे कोण आहेत, यांना पालकांचे मोबाईल क्रमांक कसे मिळतात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. फसवणूक करणारे गुन्हेगार हे बाहेर राज्यातील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल, अशी माहिती सेवाग्रामचे ठाणेदार संजय बोठे यांना दिली आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी नीट ही परीक्षा घेतली जाते. या परिक्षेच्या माध्यमातून प्रकिया पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न होतो. पण या प्रकियेत पालक आणि विद्यार्थी यांचे दूरध्वनी क्रमांक अशा दलालांकडे जातातच कसे, हा प्रश्न आहे. हा प्रकार केवळ वर्ध्यात झाला असेही म्हणता येणार नाही, कारण याचा आवाका महाराष्ट्रसह इतर अनेक राज्यात असू शकतो.

Intro:वर्धा स्टोरी मेडिकल कॉलेज ऍडमिशन

mh_war_medical_college_fraud_vis1_7204321

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर दलालांची नजर, विद्यार्थ्यांसह कुटुंबियाची आयुष्याची पुंजी दलालांच्या घशात


- वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली आर्थिक लुबाडणूक

- एमबीबीएसला प्रवेशाच्या नावाखाली २८ लाखांचा गंडा
- फसवणूक करणारे उत्तरप्रदेशचे असण्याची शक्यता

- या टोळीला पालकांचे नंबर मिळतात तरी कसे?

वर्धा - डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करतात. लहानपणा पासून ठरलेले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालकही पालकही जीवाचे रान करतात. मात्र स्पर्धेच्या युगात मिळालेले कमी मार्कने निराशा येते. याचं संधीचा फायदा घेत दलाल सावज शोधतात. वैदकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो म्हणून लाखो रुपयांची मागणी करत फसवणूक करतात. वर्ध्यातील घडलेल्या प्रकरणात दोन पालकांना 28 लाखाने गंडा घातला आहे. हा प्रकार जरी केवळ शहरात राज्यात नाही तर देशभरातील हाय प्रोफाइल दलालांची टोळी सक्रिय आहे.

वैदकीय अभ्यासक्रमाला महाविद्यालयात प्रवेश मिळण्याकरीता नीटची परीक्षा
द्यावी लागते. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच कमी गुण मिळाले की लाखो रुयये घेऊन खाजगी कॉलेजच्या दारात डोनेशनचा नावाने पैश्याचा बॅग घेऊन उभे होतात. अनेकदा पैसे भरून ऍडमिशन मिळवणाऱ्याचा शोध घेतात. या वर्ध्यातील प्रकरणी असेच घडले आणि 28 लाखाने गंडा घालण्यात हे फसवणूक करणारे यशस्वी झाले.

नेमका हा प्रकार सुरू कसा होतो...

मध्यप्रदेशच्या अलीराजपुरचे डॉ राजेश मिश्रा यांना त्यांचा मुलगा गौरवच्या आणि जबलपुरचे डॉ राजेश्वरनाथ पांडे यांचा मुलाच्या प्रवेशाकरीता परीक्षा दिली. शासकीय कोट्यातून प्रवेश मिळावे यासाठी लागणारे गुण मिळाले नाही. पेशाने दोघेही स्वतः डॉक्टर असल्याने मुलांनीही वारसा चालवत डॉक्टर व्हावे यासाठी धडपड सुरू केली. कमी गुण मिळाल्याने आदित्य रॉय आणि तिवारी नामक दोघांचा फोन आले. सेवाग्रामला सेमी गव्हरमेन्ट मध्ये प्रवेश मिळवून देतो यासाठी तगादा लावला. अखेर डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार असल्याने डॉ राजेश मिश्रा यांनी असल्याने त्यांनीही पैश्याची जुळवा जुळवा केली. मागील काही वर्षातील जमा पुंजी 8 लाख आणि उर्वरित 10 लाख हे 2 टक्के व्याजाने काढले. ठरलेल्या प्रमाणे पैसे दिले.
असाच प्रकार राजेश्वरनाथ पांडे यांच्या सोबत घडला यांनीही 10 लाख दिले. तिसरा व्यक्ती फसणार होता मात्र याचे बिंग फुटले आणि थोडक्यात वाचला.

पैसे दिल्यानंतर प्रवेश मिळणार म्हणून आनंदात असतांना एक संदेश व्हॅटस अँपवर आला. यात लिहिलेला संदेशही दुःखद होता. 16 ऑगस्टला आलेला संदेशात मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे मॉप अप राऊंड पुढे ढकलण्यात आला. यानंतर जो फोन बंद झाला तो रॉय आणि तिवारी यांच्याशी संपर्क झालाच नाही. अखेर फोन संपर्क न होत असल्याने सेवाग्राम पोलीस स्टेशनला येऊन फसवणुकीची तक्रार दिली.


सेवाग्रामचे कस्तुरबा हेल्थ सोसायटी अंतर्गत महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स हे शासकीय कोट्यातून म्हणजेच नीट परीक्षेतून गुणांकन आणि मेरिटच्या आधारावर प्रवेश दिला जातो. साधी ऍडमिशन घेताना चौकशी करत असताना या चौकशी केली असती तर फसवणूक झाली नसती. यामुळे पालकांना आव्हान आहे अश्या फसवणुकीला बळी पडू नये असे आव्हान डिन डॉ. नितीन गगणे अधिष्ठाता सेवग्राम रुगणालय.


पैश्याचा व्यवहार कसा आणि कुठे झाला.....

मिश्रा यांना सुरूवातीला नागपूरला
बोलावण्यात आले. त्यांना सोबत दहा लाख रोख, कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या
नावे दोन लाख ९४ रुपयांचा चेक मागितला. त्यांना खासगी वाहनाने सेवाग्राम
रुग्णालयाच्या परिसरात आणल्यानंतर एक दालनातून बाहेर आलेल्या दोन जणांनी पैसे घेतले. त्यावेळी रक्कम घेतल्याबाबत एक साध्या कागदावर सही शिक्का देऊन पैसे मिळल्याचे लिहून देण्यात आले. त्यानंतर पुन्हा पैसे घेतल्या गेले. अश्याच प्रकारे दोघांचीही फसवणूक करण्यात आली.

पोलिसानी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत संबंधितांचा शोध सुरू केलाय. यात नेमके हे कोण आहे. तिसऱ्या माणसाला मोबाईल न कसे मिळतात. यश अनेक प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. यातील फसवणूक करणारे गुन्हेगार बाहेर राज्यातील असल्याचा अंदाज आहे. प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल अशी माहिती सेवाग्रामचे ठाणेदार संजय बोठे यांनाही दिली.

वैद्यकीय प्रवेशाची नीट या स्पर्धा परीक्षेची माध्यमातून पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न होतो. पण यातील भरण्यात येनारे दूरध्वनी क्रमांक अशा ठकबाजांकडे जातातच कसे, हा प्रश्नच आहे. शेवटी अनेक फसवणुकी होतात. पण पैश्याचा व्यवहार स्पष्ट करता येणे शक्य नसल्याने मुंग गिळून गप्प बसतात. पण हे प्रकार केवळ वर्ध्यात झाले म्हणून लाहान न
समजता याचा आवाका महाराष्ट्र सह अनेक राज्य सुद्धा असू शकतात.

एक बाईट फाईल अनुक्रम

बाईट- गौरव मिश्रा, विद्यार्थी.
बाईट- डॉ. राजेश मिश्रा, वडील.
बाईट- डॉ नितीन गगणे, अधिष्ठाता, सेवग्राम कॉलेज
पिटीसी - पराग ढोबळे, वर्धा

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Aug 27, 2019, 10:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.