ETV Bharat / state

विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती; राजकीय नेतृत्वासाठी पडताळणी सुरू

author img

By

Published : Aug 30, 2019, 11:59 AM IST

2014 नंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यासाठी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी मुलाखतकाराची जबाबदारी सांभाळली आहे. जिल्ह्यातील विश्रामगृहात मुलाखत घेऊन त्यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली आहेत.

2014 नंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

वर्धा - 2014 नंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यासाठी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी मुलाखतकाराची जबाबदारी सांभाळली आहे. जिल्ह्यातील विश्रामगृहात मुलाखती घेऊन त्यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली आहेत. भाजपकडून जिल्ह्यात राजकीय नेतृत्वाची पडताळणी करण्यास सुरुवात झाली आहे.

2014 नंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

या मुलाखतींसाठी देवळी मतदार संघातून सर्वाधिक ७ इच्छुक उमेदवार उपस्थित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनीही इच्छुकांसोबत मुलाखत दिली. माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे, सुनील गफाट, वैभव काशीकर देखील मुलाखतींना हजर होते.

हेही वाचा: वर्धा येथे 104 एकरवरील शंभर कोटींच्या मुरुमाची चोरी, समृद्धीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

वर्धा मतदार संघात 2014 मध्ये पहिल्यांदा भाजपचे आमदार पंकज भोयर यांनी विजय मिळवला होता. यंदा इच्छुकांच्या यादीत नगराध्यक्ष अतुल तराळे, यांच्यासह सचिन अग्निहोत्रींचे नाव पुढे आले आहे. अर्चना वानखडे, माजी खासदार सुरेश वाघमारे हे देवळीसह वर्ध्यातूनही इच्छुक असल्याने मुलाखत दिली.

हिंगणघाट मतदार संघाचे आमदार समीर कुणावर यांविरुद्ध पक्षातून कोणीही इच्छुक उमेदवार नसल्याने या मतदारसंघात ते एकमेव उमेदवार आहेत. मात्र, युती झाल्यास शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्यासाठी हा मतदारसंघ राखीव ठेवला जाऊ शकतो.
हेही वाचा : आर्वी दहीहांडीच्या थरार; नागपूरचा संघ ठरला विजयी

आर्वी मतदारसंघात 2009 मध्ये दादाराव केचे हे विधानसभा निवडणूक जिंकले होते. 2014 मध्ये त्यांना थोड्या फरकाने अपयशाला सामोरे जावे लागले. मागील काही काळात पुन्हा जोमाने काम करून त्यांनी यंदा उमेदवारी मागितली आहे. तसेच नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय सुधीर दिवे यांसह सहकार क्षेत्रात काम करणारे राहुल ठाकरे यांनीही इच्छुक म्हणून मुलाखत दिली.

मुलाखतीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यांसह स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही विश्राम गृहात हजेरी लावली.

वर्धा - 2014 नंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यासाठी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी मुलाखतकाराची जबाबदारी सांभाळली आहे. जिल्ह्यातील विश्रामगृहात मुलाखती घेऊन त्यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली आहेत. भाजपकडून जिल्ह्यात राजकीय नेतृत्वाची पडताळणी करण्यास सुरुवात झाली आहे.

2014 नंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

या मुलाखतींसाठी देवळी मतदार संघातून सर्वाधिक ७ इच्छुक उमेदवार उपस्थित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनीही इच्छुकांसोबत मुलाखत दिली. माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे, सुनील गफाट, वैभव काशीकर देखील मुलाखतींना हजर होते.

हेही वाचा: वर्धा येथे 104 एकरवरील शंभर कोटींच्या मुरुमाची चोरी, समृद्धीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

वर्धा मतदार संघात 2014 मध्ये पहिल्यांदा भाजपचे आमदार पंकज भोयर यांनी विजय मिळवला होता. यंदा इच्छुकांच्या यादीत नगराध्यक्ष अतुल तराळे, यांच्यासह सचिन अग्निहोत्रींचे नाव पुढे आले आहे. अर्चना वानखडे, माजी खासदार सुरेश वाघमारे हे देवळीसह वर्ध्यातूनही इच्छुक असल्याने मुलाखत दिली.

हिंगणघाट मतदार संघाचे आमदार समीर कुणावर यांविरुद्ध पक्षातून कोणीही इच्छुक उमेदवार नसल्याने या मतदारसंघात ते एकमेव उमेदवार आहेत. मात्र, युती झाल्यास शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्यासाठी हा मतदारसंघ राखीव ठेवला जाऊ शकतो.
हेही वाचा : आर्वी दहीहांडीच्या थरार; नागपूरचा संघ ठरला विजयी

आर्वी मतदारसंघात 2009 मध्ये दादाराव केचे हे विधानसभा निवडणूक जिंकले होते. 2014 मध्ये त्यांना थोड्या फरकाने अपयशाला सामोरे जावे लागले. मागील काही काळात पुन्हा जोमाने काम करून त्यांनी यंदा उमेदवारी मागितली आहे. तसेच नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय सुधीर दिवे यांसह सहकार क्षेत्रात काम करणारे राहुल ठाकरे यांनीही इच्छुक म्हणून मुलाखत दिली.

मुलाखतीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यांसह स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनीही विश्राम गृहात हजेरी लावली.

Intro:वर्धा
विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती

- सर्वाधिक इच्छुकांची गर्दी देवळी मतदार संघातून
- हिंगणघाट मध्ये विद्यमान आमदार एकमेव
- आर्वी मतदार संघात तिघे तर वर्ध्यात चार नाव आली समोर

वर्धा - वर्धा जिल्हात सध्याच्या परिस्थिती पाहता भाजपचा बोल बाला आहे. ग्रामपंचयात पासून जिल्हापरिषद भाजपच्या ताब्यात आहे. वर्धा आणि हिंगणघाट येथे विद्यमान आमदार भाजपचे असून आर्वी देवळी आणि आर्वी मतदार संघात अवघ्या थोड्या फरकाने कमल फुलता फुलता राहिले. 2014 ननंतर बदलेली परिस्थिती पाहता आज इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यात. यासाठी निरीक्षक म्हणून ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी विश्राम गृहात एका एकाने मुलाखती घेत इच्छुकांच्या इच्छा जाणून घेतल्यात.

यावेळी सर्वाधिक सात इच्छुक हे देवळी मतदार संघातून उपस्थित राहिले. भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस हे देवळीचे आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने हे ही इच्छुकांच्या सोबत मुलाखत देऊन गेले. यावेळी यांच्यासह माजी खासदार सुरेश वाघमारे हे थोड्या फरकाने पराभूत झाले होते. यामुळे पुन्हा दावेदारी करत आहे. यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे, सुनील गफाट, वैभव काशीकर, इच्छुक म्हणून मुलाखती दिल्यात.

वर्धा मतदार संघात पहिल्यांदा 2014 मध्ये भाजपाला विजय आमदार पंकज भोयर यांना पाहिल्याच निवडणूकित विजय मिळाला होता. यावेळी इच्छुकांच्या यादीत नगराध्यक्ष अतुल तराळे, यांच्यासह सचिन अग्निहोत्री यांचेही नाव पुढे आले. अर्चना वानखडे, माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी देवळीसह वर्ध्यातून ही इच्छुक असल्याने मुलाखत दिलीत.


यावेळी हिंगणघाट मतदार संघातून 2014 मोठ्या संख्येने लीड घेऊन आलेले आमदार समीर कुणावर यांच्यासमोर भाजपातून उभे रहाण्यास कोणीही इच्छुक नसल्याने एकमेव उमेदवार आहे. मात्र युती झाल्यास सेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्यासाठी या जागेवर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भाजपातून कोणीही इच्छुक नसले तरी युती झाल्यास घडामोडी पाहायला मिळेल.



आर्वी मतदार संघात 2009 मध्ये दादाराव केचे यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी होत पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलवले. 2014 मध्ये मात्र थोड्या फरकाने अपयश पदरी पडले. मगिला काळात पुन्हा जोमाने काम करत यंदा उमेदवारी मागितली आहे. यावेळी नितीन गडकरी निकटवर्तीय सुधीर दिवे यांच्यासह युवा म्हणून सहकार क्षेत्रांत काम करणारे राहुल ठाकरे यांनीही इच्छुक म्हणून मुलाखत दिली.


आजच्या मुलाखतीच्या सोहळ्याल जिल्ह्यातील सर्वच इच्छुक उमेदवार हे उपस्थित होते. यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी विश्राम गृहात होते. बंद खोलीत प्रत्यक्ष एकाच इच्छुकांला बोलावून मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आले. यामुळे भाजपच्या वतीने इच्छुकांसह पक्षात असलेले अंतर्गरत हेवे दावे यामाध्यमातून जाणून घेतले. तसेच अंतर्गत कलह विरोध याची कारणेही यामाध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला असावा अशी शक्यता नाकारता येणार नाही. शेवटी निकडणुकीचे उमेदवार अधिकृत घोषित झाले नसले तरी अगोदरच ठरले आहे असे म्हणायला हरकत नाही.Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.