ETV Bharat / state

वर्ध्यात गोठ्यात बांधलेल्या १० शेळ्याचा वाघाने पाडला फडशा

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या गोठ्यात १६ शेळ्या होत्या. त्यापैकी १० शेळ्यांचा वाघाने फडशा पाडला. या हल्ल्यात ५ शेळ्या वाचल्या. शेतकरी वसंतराव आडे यांचे १ लाख २० हजारांचे नुकसान झाले.

author img

By

Published : Feb 10, 2019, 3:26 PM IST

Updated : Feb 10, 2019, 7:31 PM IST

गोठ्यात मृत पडलेल्या शेळ्या

वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील धामणगाव (गाठे) येथे गावालगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांचा रात्री अंधारात वाघाने फडशा पाडला. या घटनेत शेतकरी वसंतराव आडे यांचे नुकसान झाले. वन विभागाने लवकरात लवकर आडे यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकरी करत आहे. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावलागतच्या गोठ्यात वाघ येऊन गेल्याच्या माहिती मिळताच गावकऱ्यांनी गोठ्याजवळ गर्दी केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या गोठ्यात १६ शेळ्या होत्या. त्यापैकी १० शेळ्यांचा वाघाने फडशा पाडला. या हल्ल्यात ५ शेळ्या वाचल्या. शेतकरी वसंतराव आडे यांचे १ लाख २० हजारांचे नुकसान झाले. मंगरूळचे सहवन परिक्षेत्र अधिकारी एच एन नरडंगे, वनरक्षक, जिल्हा परिषद सदस्य यांनी भेटी दिल्या. यावेळी लोकांनी शेतात जाताना मिळून एकत्र जावे, हातात गरजेनुसार लाठी सोबत ठेवावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.

वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील धामणगाव (गाठे) येथे गावालगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांचा रात्री अंधारात वाघाने फडशा पाडला. या घटनेत शेतकरी वसंतराव आडे यांचे नुकसान झाले. वन विभागाने लवकरात लवकर आडे यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकरी करत आहे. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावलागतच्या गोठ्यात वाघ येऊन गेल्याच्या माहिती मिळताच गावकऱ्यांनी गोठ्याजवळ गर्दी केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या गोठ्यात १६ शेळ्या होत्या. त्यापैकी १० शेळ्यांचा वाघाने फडशा पाडला. या हल्ल्यात ५ शेळ्या वाचल्या. शेतकरी वसंतराव आडे यांचे १ लाख २० हजारांचे नुकसान झाले. मंगरूळचे सहवन परिक्षेत्र अधिकारी एच एन नरडंगे, वनरक्षक, जिल्हा परिषद सदस्य यांनी भेटी दिल्या. यावेळी लोकांनी शेतात जाताना मिळून एकत्र जावे, हातात गरजेनुसार लाठी सोबत ठेवावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.

Intro:गोठ्यातील 10 शेंड्याचा वाघाने पडला फडशा, गावात भीतीचे वातावरण

समुद्रपूर तालुक्यातील धामणगाव(गाठे)येथे गावालगतच्या गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यांचा रात्रीच्या अंधारात वाघाने फडशा पाडला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शेतकरी वसंतराव आडे यांचे नुकसान झाले. वन विभागाने लवकरात लवकर नुकसान भरपाईची देण्याची मागणी करत आहे.

गावलागतच्या गोठ्यात वाघ येऊन गेल्याच्या माहिती मिळताच गावकऱ्यांनी गोठ्याजवळ गर्दी केली. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या गोठ्यात 16 शेळ्या होत्या. यातील 10 शेळ्यांच्या फडशा पाडला. या हल्ल्यात पाच शेळ्या वाचल्या असल्या तरी शेतकरी वसंतराव आडे यांचे 1 लाख 20 हजाराचे नुकसान झाले.

मंगरूळचे सहवन परिक्षेत्र अधिकारी एच एन नरडंगे, वनरक्षक, जिल्हा परिषद सदस्य यांनी भेटी दिल्या. यावेळी लोकांनी शेतात जातात पाच ते सहा जनांनी मिळून एकत्र जावे, हातात गरजेनुसार लाठी सोबत ठेवून काळजी घेण्याची आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.


Body:पराग ढोबळे, वर्धा.


Conclusion:
Last Updated : Feb 10, 2019, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.