ETV Bharat / state

वाघाच्या भीतीमुळे 'या' गावात झाले नाही मतदान...

author img

By

Published : Oct 22, 2019, 5:12 AM IST

Updated : Oct 22, 2019, 5:47 AM IST

4 ऑक्टोबर रोजी वाघाच्या हल्ल्यात आगरगावातील 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर शेजारच्या सावली खुर्द गावातील बऱ्याच लोकांनाही वाघ दिसल्याने त्या गावातही भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनतर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती. मागणी मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला होता.

town boycotted voting due to fear of Tiger

वर्धा - सोमवारी राज्यभरात उत्साहात मतदान पार पडले. मात्र, आर्वी मतदारसंघाच्या कारंजा तालुक्यातील आगरगावामध्ये चक्क वाघाच्या भीतीमुळे मतदान झाले नाही. या गावामधील लोकांनी आधीच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. गावकऱ्यांना समजावण्यात अधिकाऱ्यांना अपयश आल्यामुळे, या गावांमध्ये मतदान पार पडले नाही.

वाघाच्या भीतीमुळे 'या' गावात झाले नाही मतदान...

वर्ध्यातील कारंजा तालुक्याचा बराच भाग हा भोर अभयारण्यापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे येथील काही गावांसाठी वाघांचा वावर नवा नाही. मात्र, 4 ऑक्टोबर रोजी वाघाच्या हल्ल्यात आगरगावातील 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर शेजारच्या सावली खुर्द गावातील बऱ्याच लोकांनाही वाघ दिसल्याने त्या गावातही भीतीचे वातावरण निर्माण झाले.

7 ऑक्टोबरला वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई मिळावी अशी मागणीदेखील या निवेदनात करण्यात आली होती. या मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता.

यानंतर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच आर्वी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तहसीलदार, वन विभाग अधिकारी यांच्यासमवेत गावकऱ्यांची बैठक घेतली. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाला सावली खुर्द गावाचा बहिष्कार मागे घेण्यात यश आले.

याआधी केलेल्या मागणीनंतरही वाघाचा वावर तसाच सुरु राहिला. वाघाने काही पशूंवर हल्लादेखील केला. त्यामुळे 19 ऑक्टोबरला आगरगावच्या ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करण्यासह पिकांची नुकसानभरपाई मिळावी, शेताला कुंपण द्यावे, तसेच शेतीसाठी दुपारी वीजपुरवठा करावा अशा मागण्या केल्या होत्या. उपवनसंरक्षक शर्मा यांसोबत चर्चा करूनही यासंदर्भात कोणतीही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे, माजी सरपंच विलास किनकर यांनी सांगितले.

हेही वाचा : वर्ध्यात मेणबत्ती लावून पार पडले मतदान; वादळी वाऱ्याचा फटका

वर्धा - सोमवारी राज्यभरात उत्साहात मतदान पार पडले. मात्र, आर्वी मतदारसंघाच्या कारंजा तालुक्यातील आगरगावामध्ये चक्क वाघाच्या भीतीमुळे मतदान झाले नाही. या गावामधील लोकांनी आधीच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. गावकऱ्यांना समजावण्यात अधिकाऱ्यांना अपयश आल्यामुळे, या गावांमध्ये मतदान पार पडले नाही.

वाघाच्या भीतीमुळे 'या' गावात झाले नाही मतदान...

वर्ध्यातील कारंजा तालुक्याचा बराच भाग हा भोर अभयारण्यापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे येथील काही गावांसाठी वाघांचा वावर नवा नाही. मात्र, 4 ऑक्टोबर रोजी वाघाच्या हल्ल्यात आगरगावातील 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर शेजारच्या सावली खुर्द गावातील बऱ्याच लोकांनाही वाघ दिसल्याने त्या गावातही भीतीचे वातावरण निर्माण झाले.

7 ऑक्टोबरला वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई मिळावी अशी मागणीदेखील या निवेदनात करण्यात आली होती. या मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता.

यानंतर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच आर्वी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तहसीलदार, वन विभाग अधिकारी यांच्यासमवेत गावकऱ्यांची बैठक घेतली. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाला सावली खुर्द गावाचा बहिष्कार मागे घेण्यात यश आले.

याआधी केलेल्या मागणीनंतरही वाघाचा वावर तसाच सुरु राहिला. वाघाने काही पशूंवर हल्लादेखील केला. त्यामुळे 19 ऑक्टोबरला आगरगावच्या ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करण्यासह पिकांची नुकसानभरपाई मिळावी, शेताला कुंपण द्यावे, तसेच शेतीसाठी दुपारी वीजपुरवठा करावा अशा मागण्या केल्या होत्या. उपवनसंरक्षक शर्मा यांसोबत चर्चा करूनही यासंदर्भात कोणतीही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे, माजी सरपंच विलास किनकर यांनी सांगितले.

हेही वाचा : वर्ध्यात मेणबत्ती लावून पार पडले मतदान; वादळी वाऱ्याचा फटका

Intro:वर्धा
mh_war_06_gavavr_bahishkar_121_7204321

वाघाच्या भितीमुळे आर्वी मतदारसंघातील आगरगावात मतदानावर बहिष्कार

- कारंजा तालुक्यातील प्रकार
- वाघाचा बंदोबस्त करण्यात उपवनसंरक्षक अधिकारी असफल
- गावकऱ्यांच्या समजवण्यात आले अपयश
-

वर्धा - वर्ध्यातील आर्वी मतदार संघाच्या कारंजा तालुक्यातील आगरगाव आणि सावली खुर्द या गावांना वाघोबाच्या भीतीमुळे मतदानावर बहिष्कार टाकला. वन विभागाचे उपवनसंरक्षक याच्या चर्चेतून मागण्या मान्य न झाल्याने गावकऱ्यांनी दूर ठेवत मतदानावर आगरगाव वासीयांनी पूर्णतः बहिष्कार टाकला. जिल्हा प्रशासनाने मतदानाच्या शेवटच्या वेळेपर्यंत प्रयत्न केले पण वन विभागावर असलेला रोष कायम राहिल्याने बहिष्कार टाकला.

तालुक्यातील कारंजा तालुक्याचा बराच शेतीलगतचा भाग बोर अभयारण्य पासून जवळ आहे. यामुळे वाघाचा वावराने हे काही नवीन नाही. पण 4 ऑक्टोम्बरला वाघाच्या हल्ल्यात गावातील 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर बऱ्याच जणांना वाघ दिसल्याने याची भीती लगतच्या सावली खुर्द या गावात सुद्धा पोहचली. वाघ अनकेनी पाहिल्याचे सांगितले हात आहे. तेच काही दिवसांपूर्वी शिक्षकांना वाघोबाच्या चक्क दर्शन घडले.

यासाठी गावात झालेल्या घटनेने गावावर शोककळा पसरली. मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. सध्याची परिस्थिती पाहता या भागात शेतात कोणी मजूर जाण्यास तयार नाही. वाघाच्या भीतीने काय करावे असा प्रश्न असतांना 7 ऑक्टोबरला जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावर वाघाचा बंदोबस्त करावा आणि वन्य प्राण्यामुळे झालेल्या शेतीची नुकसान भरपाई करावी अशी मागणी करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच आर्वी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तहसीलदार, वन विभाग आणि अधिकाऱ्यांची बैठक लावली. यात तब्बल दीड तास बैठक चालली. यात जिल्हा प्रशासनाला सावली खुर्द गावाचा बहिष्कार मागे घेण्यात यश आले.

यात 19 ऑक्टोबला गावकाऱ्यांसोबत उपवनसंरक्षक शर्मा यांच्या सोबत वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी करण्यात यावी. यासह पिकांची नुकसान भरपाई मिळावी, शेताला कुंपण द्यावे, शेतीसाठी दुपारी वीज पुरवठा करावा या मागण्या करण्यात आले. यावेळी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे, वाघ हा गावाच्या परिसरातून गेला असे सांगितले. मात्र त्याच रात्री काही भागात लोकांना वाघ दर्शन आणि त्याचा आवाज आल्याचे सांगण्यात येते आहे. यांसह गावातील पशुवर हल्ला करत फडशा पाठवला. यामुळे गावातील लोकांचा विश्वास उडाला यामुळे गावकऱ्यांनी मागण्या पूर्ण न झाल्याने बहिष्कार टाकला असल्याचे विलास किनकर माजी सरपंच यांनी सांगितले.

मागील 15 दिवस मिळून वन विभागाचे उपवनसंरक्षक शर्मा यांनी योग्य नियोजन केले असते तर अशी वेळ जिल्हा प्रशासनावर आली नसती. पण एवढे असले तरी आज दिवसभर निवडणूक विभागातील डीएसओ यांनीही भेट देत येत्या दोन दिवसात मागण्यांनवर सकारात्मक विचार केला जाईल असे सांगूनही गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेली माहिती चुकीची निघाल्याने अविश्वास कायम राहिला आणि त्यांनी बहिष्कार कायम ठेवल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

Body:पराग ढोबळे वर्धा.Conclusion:
Last Updated : Oct 22, 2019, 5:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.