ETV Bharat / state

वर्ध्यातून निवडणूक लढवण्याची सुप्रिया सुळेंची इच्छा

author img

By

Published : Dec 15, 2019, 12:52 AM IST

सुप्रिया सुळे वर्ध्यातील राज्यस्तरीय मुख्यध्यपकाच्या अधिवेशनात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी पवनार बद्दल बोलून दाखवले. सावंगी येथे हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

Supriya Sule
सुप्रिया सुळे

वर्धा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भविष्यात संधी मिळाली तर वर्ध्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचवेळी आपण सध्या तरी असा विचार करत नाही. तुम्ही चिंता करु नका, असे सुळेंनी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांना सांगितले.

सुप्रिया सुळे, खासदार

सुप्रिया सुळे वर्ध्यातील राज्यस्तरीय मुख्यध्यपकाच्या अधिवेशनात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी पवनार बद्दल बोलून दाखवले. सावंगी येथे हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा - वर्ध्याच्या वाघदऱ्यातून बिबट्याच्या शिकारप्रकरणी सात जणांना अटक

यावेळी सुळे म्हणाल्या, बारामतीकरांना आवडणार नाही मी बोललेले. कारण, माझी राजकारणात आणि समाजकारणात जी ओळख आहे ती बारामतीमुळे आहे. मला जर कधी चॉईस द्यायची वेळ आली आणि बारामतीमध्ये दुसरा खासदार उभा राहिला. तर, सर्वात जास्त आवडणारा मतदारसंघ मला वर्धा आहे. हा जिल्हा लहान वाटत असला तरी माझासाठी मोठा जिल्हा आहे. मात्र, मी काही आताच निवडणूक लढणार नाही, असे म्हणत त्यांनी खासदार तडस यांना चिमटा काढला.

हेही वाचा - महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर, सरकारने श्वेतपत्रिका काढावी - सुप्रिया सुळे

मी ज्या दिवशी 60 वर्षाची होईल त्या दिवशी महिन्यातले 10 दिवस पवनार आश्रमात राहील, असे मुलांना सांगत असल्याचे त्या म्हणाल्या. विनोबाजींचे संस्कार माझ्यावर झाले आहेत, पुढेही होत राहतील. दरवेळेस मी जाते तेव्हा ही वास्तू आणि विचार नवीन वाटत असते. हे विचार पुढल्या पिढीत पोहचविण्यात आपण कमी पडत आहोत, हा जिल्हा माझ्यासाठी इमोशनल जिल्हा आहे, असेही त्या म्हणाल्या. पवार घराण्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांच्याशी असलेल्या संबंधाचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला.

कार्यक्रमाला खासदार दत्ता मेघे, खासदार रामदास तडस, आमदार विक्रम काळे, आमदार पंकज भोयर आणि आमदार दीपकराव दौंदल उपस्थित होते.

वर्धा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भविष्यात संधी मिळाली तर वर्ध्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचवेळी आपण सध्या तरी असा विचार करत नाही. तुम्ही चिंता करु नका, असे सुळेंनी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांना सांगितले.

सुप्रिया सुळे, खासदार

सुप्रिया सुळे वर्ध्यातील राज्यस्तरीय मुख्यध्यपकाच्या अधिवेशनात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी पवनार बद्दल बोलून दाखवले. सावंगी येथे हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा - वर्ध्याच्या वाघदऱ्यातून बिबट्याच्या शिकारप्रकरणी सात जणांना अटक

यावेळी सुळे म्हणाल्या, बारामतीकरांना आवडणार नाही मी बोललेले. कारण, माझी राजकारणात आणि समाजकारणात जी ओळख आहे ती बारामतीमुळे आहे. मला जर कधी चॉईस द्यायची वेळ आली आणि बारामतीमध्ये दुसरा खासदार उभा राहिला. तर, सर्वात जास्त आवडणारा मतदारसंघ मला वर्धा आहे. हा जिल्हा लहान वाटत असला तरी माझासाठी मोठा जिल्हा आहे. मात्र, मी काही आताच निवडणूक लढणार नाही, असे म्हणत त्यांनी खासदार तडस यांना चिमटा काढला.

हेही वाचा - महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर, सरकारने श्वेतपत्रिका काढावी - सुप्रिया सुळे

मी ज्या दिवशी 60 वर्षाची होईल त्या दिवशी महिन्यातले 10 दिवस पवनार आश्रमात राहील, असे मुलांना सांगत असल्याचे त्या म्हणाल्या. विनोबाजींचे संस्कार माझ्यावर झाले आहेत, पुढेही होत राहतील. दरवेळेस मी जाते तेव्हा ही वास्तू आणि विचार नवीन वाटत असते. हे विचार पुढल्या पिढीत पोहचविण्यात आपण कमी पडत आहोत, हा जिल्हा माझ्यासाठी इमोशनल जिल्हा आहे, असेही त्या म्हणाल्या. पवार घराण्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांच्याशी असलेल्या संबंधाचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला.

कार्यक्रमाला खासदार दत्ता मेघे, खासदार रामदास तडस, आमदार विक्रम काळे, आमदार पंकज भोयर आणि आमदार दीपकराव दौंदल उपस्थित होते.

Intro:वर्धा

विनोबांच्या विचाराचा प्रभाव, वयाच्या साठीनंतर महिन्यातुन 10 दिवस राहणार पवनार आश्रमात- सुप्रिया सुळे.

- निवडणूक लढवण्यास दुसरे पसंतीचे ठिकाण म्हणून वर्ध्याला पसंती
- खासदार रामदास तडस यांना गमतीदार टोला

वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पावन झाला. त्याच्या जीवनावर प्रभावित होऊन अनेकांनी त्यांनी दिलेला मार्ग जीवनात अवलंबला आहे. याचाचा₹ प्रभाव महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या घराण्यातील मुलीवरही पडला. ते नाव आहे खासदार सुप्रिया सुळे. त्या प्रत्येकवेळी आल्यात की विनोबांच्या आश्रमात वेळ घालावतात मौन धारण करतात. आज जाहीर पाने त्यांना आवडणार ठिकाण म्हणून पवनारचा उल्लेख केला.

त्या वर्ध्यातील राज्यस्तरीय मुख्यध्यपकाच्या अधिवेशनात बोलताना त्यानी पवनार बद्दल बोलून दाखवले. हे राज्यस्तरीय अधिवेशन सावंगी येथील दत्ता मेघे येथील सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक लढण्यावरही बोलून अनेकांना आश्चर्यचकित केले.

बारामतीकरांना आवडणार नाही मी बोललेल. कारण माझी राजकारणात आणि समाजकारणात जी ओळख आहे ती बरमतीमुळे आहे. मला जर कधी चॉईस द्यायची वेळ आली आणि बारामतीमध्ये दुसरा खासदार उभा राहिला. सर्वात जास्त आवडणार मतदारसंघ मला वर्धा मतदारसंघ असले. हा जिल्हा लाहान वाटत असला तरी माझासाठी मोठा जिल्हा आहे. यावेळी मंचावर खासदार रामदास तडस हे ही उपस्थित होते. मिशीकिल पद्धतीने आताच काही निवडणून लढणार नाही असे म्हणत खासदार तडस यांना चिमटाही काढला.

पुढे बोलताना म्हणाल्या मी ज्या दिवशी साठ वर्षाची होईल त्या दिवशी महिन्यातले दहा दिवस पवनार आश्रमात राहील असे मुलांना सांगत असल्याच्या त्या म्हणालायत. विनोबाजींचे संस्कार माझ्यावर झाले आहे, पुढेही होत राहिल. दरवेळेस मी जाते तेव्हा ही वास्तू आणि विचार नवीन वाटत असते. हे विचार पुढल्या पिढीत पोहचविण्यात कमी पडतो आहे, हा जिल्हा माझ्यासाठी इमोशनल जिल्हा आहे अशाही त्या म्हणाल्यात.

पवार घराण्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांच्याशी असलेल्या संबंधाचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला. भविष्यातील चॉईस सांगून नवीन राजकीय खेळीचा तर नाही ना शिवाय निवडणूक लढवण्यासाठी पसंतीचा पर्याय देऊन नव नवीन चर्चाना आता पेव फुटला हेही विशेष.





Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.