ETV Bharat / state

...अन सोयाबीनचे बियाणे ’अंकुर’लेच नाही, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

शेतकऱ्यांचे हक्काचे बोनस पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली जाते. पण, वर्धा जिल्ह्याच्या देवळी, समुद्रपूर तालुक्यात काही शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे ’अंकुर’लेच नसल्याने चिंता वाढली असून दुबार पेरणीचे संकट आले आहे.

author img

By

Published : Jul 12, 2019, 8:27 AM IST

...अन सोयाबीनचे बियाणे ’अंकुर’लेचं नाही

वर्धा - यावर्षी पावसाने सुरुवातीला दडी दिली आणि नंतर विलंबाने पाऊस पडला. पण जुलै महिन्याचा दुसरा आठवडा लागूनही दमदार पाऊस झाला नाही. यात कपाशीची लागवड घेतली. शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे मोर्चा वळवला. शेतकऱ्यांचे हक्काचे बोनस पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली जाते. पण, वर्धा जिल्ह्याच्या देवळी, समुद्रपूर तालुक्यात काही शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे ’अंकुर’लेच नसल्याने चिंता वाढली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

...अन सोयाबीनचे बियाणे ’अंकुर’लेचं नाही

यात देवळी तालुक्यातल्या बाभूळगाव या गावातील 20 ते 25 शेतकऱ्यांनी अंकुर कंपनीचे प्रभाकर वाणचे सोयाबीन खरेदी केले. सर्वात महाग आणि चांगले बियाणे असल्याचे सांगून कृषी विभागाने दिलेले बियाणे 20 दिवस लोटूनही उगवले नाही. आता बियाणे जमिनीतच कुजले. यामुळे या हंगामात पीकाची आशा आता जमिनीत कुजली म्हणण्याची वेळ आली. जीवन बोबडे यांनी साडे सात हजाराचे बियाणे आणून 4 हजार लागवडीसाठी खर्च केला. पण केवळ 10 टक्केच बियाणे उगवल्याने नुकसान झाल्याचे जीवन बोबडे सांगतात. त्यामुळे हंगाम जाणार असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

गावातील सचिन बिबडे यांनी 10 एकर कपाशीसोबत आंतरपीक म्हणून सोयाबीन लावले. 11 बॅग सोयाबीनसाठी 28 हजार रुपये लागले. लागवड खर्च मजुरी सगळं काही पाण्यात गेले. आता बियाणे कंपनीवाले येऊन म्हणतात तक्रार करू नका नवीन बियाणे देतो. पण पाऊस नसतांना आता दुसरे बियाणे पेरले तरी उगवणार नाही, असे ते सांगतात. यात मागील वर्षी दीडशे क्विंटल सोयाबीन झाले. यात हा हंगाम हातचा गेल्याने पूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्याची मागणी बिबडे यांनी केली आहे.

कृषी दुकानदारांकडून अंकुर प्रभाकर वाण सर्वात चांगले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिले जाते. 335 आणि 9305 वाणचा लॉट खराब निघाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे बियाणे बाजारातील इतर बियाण्यांच्या तुलनेत 300 ते 400 रुपयांनी महाग आहे. 30 किलोच्या बॅगसाठी शेतकऱ्यांनी 2480 रुपये मोजले असल्याचे सांगितले जात आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या तक्रारीची पाहणीसाठी एक समिती तयार करण्यात येते. तक्रारी आल्या की समिती विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जाऊन पाहणी करतात. हा अहवाल आला की त्याच्या आधारावर शेतकरी ग्राहक मंचात दादा मागू शकतो. यात न्यायालयाच्या आदेशाने नुकसान भरपाई मिळू शकते. तसेच शासन स्तरावर बियाण्याचे नमुने हे प्रयोग शाळेत पाठवले जाते. निर्धारित नियम आणि अटीच्या तुलनेत उगवण क्षमता नसल्याने पुढील कारवाई शासन स्तरावरून केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी अश्विनी भोपळे यांनी ईटीव्ही भारतला दिली.

शेतकरी वेगवेगळ्या कारणाने नेहमी अडचणीत अडकत असतो. हे दुष्टचक्र पिच्छा सोडत नसताना बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत चांगलीच भर पडली आहे. जर पावसाअभावी हंगाम गेला किंवा दुबार पेरणी करून बियाणे उगवले नाही तर काय करावे असा सवाल शेतकरी करत आहे. यामुळे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.

वर्धा - यावर्षी पावसाने सुरुवातीला दडी दिली आणि नंतर विलंबाने पाऊस पडला. पण जुलै महिन्याचा दुसरा आठवडा लागूनही दमदार पाऊस झाला नाही. यात कपाशीची लागवड घेतली. शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे मोर्चा वळवला. शेतकऱ्यांचे हक्काचे बोनस पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली जाते. पण, वर्धा जिल्ह्याच्या देवळी, समुद्रपूर तालुक्यात काही शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे ’अंकुर’लेच नसल्याने चिंता वाढली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

...अन सोयाबीनचे बियाणे ’अंकुर’लेचं नाही

यात देवळी तालुक्यातल्या बाभूळगाव या गावातील 20 ते 25 शेतकऱ्यांनी अंकुर कंपनीचे प्रभाकर वाणचे सोयाबीन खरेदी केले. सर्वात महाग आणि चांगले बियाणे असल्याचे सांगून कृषी विभागाने दिलेले बियाणे 20 दिवस लोटूनही उगवले नाही. आता बियाणे जमिनीतच कुजले. यामुळे या हंगामात पीकाची आशा आता जमिनीत कुजली म्हणण्याची वेळ आली. जीवन बोबडे यांनी साडे सात हजाराचे बियाणे आणून 4 हजार लागवडीसाठी खर्च केला. पण केवळ 10 टक्केच बियाणे उगवल्याने नुकसान झाल्याचे जीवन बोबडे सांगतात. त्यामुळे हंगाम जाणार असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

गावातील सचिन बिबडे यांनी 10 एकर कपाशीसोबत आंतरपीक म्हणून सोयाबीन लावले. 11 बॅग सोयाबीनसाठी 28 हजार रुपये लागले. लागवड खर्च मजुरी सगळं काही पाण्यात गेले. आता बियाणे कंपनीवाले येऊन म्हणतात तक्रार करू नका नवीन बियाणे देतो. पण पाऊस नसतांना आता दुसरे बियाणे पेरले तरी उगवणार नाही, असे ते सांगतात. यात मागील वर्षी दीडशे क्विंटल सोयाबीन झाले. यात हा हंगाम हातचा गेल्याने पूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्याची मागणी बिबडे यांनी केली आहे.

कृषी दुकानदारांकडून अंकुर प्रभाकर वाण सर्वात चांगले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिले जाते. 335 आणि 9305 वाणचा लॉट खराब निघाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे बियाणे बाजारातील इतर बियाण्यांच्या तुलनेत 300 ते 400 रुपयांनी महाग आहे. 30 किलोच्या बॅगसाठी शेतकऱ्यांनी 2480 रुपये मोजले असल्याचे सांगितले जात आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या तक्रारीची पाहणीसाठी एक समिती तयार करण्यात येते. तक्रारी आल्या की समिती विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जाऊन पाहणी करतात. हा अहवाल आला की त्याच्या आधारावर शेतकरी ग्राहक मंचात दादा मागू शकतो. यात न्यायालयाच्या आदेशाने नुकसान भरपाई मिळू शकते. तसेच शासन स्तरावर बियाण्याचे नमुने हे प्रयोग शाळेत पाठवले जाते. निर्धारित नियम आणि अटीच्या तुलनेत उगवण क्षमता नसल्याने पुढील कारवाई शासन स्तरावरून केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी अश्विनी भोपळे यांनी ईटीव्ही भारतला दिली.

शेतकरी वेगवेगळ्या कारणाने नेहमी अडचणीत अडकत असतो. हे दुष्टचक्र पिच्छा सोडत नसताना बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत चांगलीच भर पडली आहे. जर पावसाअभावी हंगाम गेला किंवा दुबार पेरणी करून बियाणे उगवले नाही तर काय करावे असा सवाल शेतकरी करत आहे. यामुळे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.

Intro:वर्धा स्टोरी
कृपया pkgमध्ये बाईटचे नाव जोडावे ही विनंती.
1)जीवन बोबडे, शेतकरी, बाभूळगाव, देवळी, वर्धा.
2) सचिन बोबडे, शेतकरी, बाभूळगाव, देवळी,वर्धा.
3) अश्विनी भोपळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद,वर्धा.

...अन सोयाबीनचे बियाणे ’अंकुर’लेचं नाही
- सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची कृषी विभागाकडं तक्रार

अँकर - यावर्षी आधीच पावसाला विलंब आणि दडी दिली. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा लागूनही दमदार पाऊस झाला नाही. यात कपाशीची लागवड घेतली. शेतकऱ्यांनी सोयाबीन कडे मोर्चा वळवला. शेतकर्‍याचे हक्काचे बोनस पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली जाते. पण, वर्धा जिल्ह्याच्या
देवळी, समुद्रपूर तालुक्यात काही शेतकर्‍यांच्या शेतातील सोयाबीनंच बियाणे ’अंकुर’लेच नसल्यानं चिंता वाढली असून दुबार पेरणीचे संकट आले.

यात देवळी तालुक्यातल्या बाभूळगाव बोबडे या गावातील 20 ते 25 शेतकऱ्यांनी अंकुर कंपनीचे प्रभाकर वाणचे सोयाबीन खरेदी केले. सर्वात महाग आणि चांगले बियाणे असल्याचे सांगून कृषी विभागाने दिलेले बियाणे 20 दिवस लोटूनही उगवले नाही. आता बियाणे जमिनीतच कुजले. यामुळे या हंगामात पीकाची आशा आता जमिनीत कुजली म्हणण्याची वेळ आली. जीवन बोबडे यांनी बॅग साडे सात हजाराचे बियाणे आणून 4 हजार लागवडीचा खर्च केला. पण केवळ 10 टक्केच बियाणे उगवल्याने नुकसान झाल्याचे जीवन बोबडे सांगतात. त्यामुळे हंगाम जाणार असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
गावातील सचिन बिबडे यांनी 10 एकर कपाशी सोबत आंतरपीक म्हणून सोयाबीन लावले. 11 बॅग सोयाबीन 28 हजार रुपये लागले. लागवड खर्च मजुरी सगळं काही पाण्यात गेले. आता कंपनिकगे येऊन म्हणतात तक्रार करू नका नवीन बियाणे देतो. पण पाऊस नसतांना आता दुसरे बियाणे पेरले तरी उगवणार नाही असे ते सांगतात. यात मागील वर्षी दीडशे क्विंटल सोयाबीन झाले. यात हा हंगाम हातचा गेल्याने पूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या तक्रारीची पाहणीसाठी एक समिती तयार करण्यात येते. तक्रारी आल्या की समिती विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जाऊन पाहणी करतात. हा अहवाल आला की त्याचा आधारावर शेतकरी ग्राहक मंचात दादा मागू शकतो. यात न्यालायच्या आदेशाने नुकसान भरपाई मिळू शकतो. तसेच शासन स्तरावर हे बियाण्याचे नमुने हे प्रयोग शाळेत पाठवले जाते. निर्धारित नियम आणि अटीच्या तुलनेत उगवण क्षमता नसल्याने पुढील कारवाई शासन स्तरावरून केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास आशिकरी अश्विनी भोपळे यांनी ईटीव्ही भारताला दिली.

अंकुरचे प्रभाकर हे महाग असल्याचा आरोप
कृषी दुकानदारांकडून प्रभाकर वाण सर्वात चांगले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिले जाते. 335 आणि9305 हे वाणचा लॉट खराब निघाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे बियाणे बाजारातील इतर बियाण्याचे तुलनेट 300 ते 400 रुपयांनी महाग असल्याचे सांगितले जात आहे. 30 किलोच्या बॅगसाठी शेतकऱ्यांनी 2480 रुपये मोजले असल्याचे सांगितले जात आहे.

शेतकरी वेग वेगळ्या कारणाने अडचणीत अडकत असतो. हे दुष्टचक्र पिच्छा सोडत नसताना बियाणे न उगवल्याने अर्थील अडचणीत चांगलीच भर पडली आहे. जर पावसा अभावी हंगाम गेला किंवा दुबार पेरणी करून बियाणे उगवले नाही तर काय करावे असा सवाल शेतकरी करत आहे. यामुळे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.