ETV Bharat / state

वर्धा येथे 104 एकरवरील शंभर कोटींच्या मुरुमाची चोरी, समृद्धीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

author img

By

Published : Aug 28, 2019, 10:00 PM IST

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग भाग दोनचे काम हे अ‌ॅपकॉन कंपनीला दिले आहे. तसेच पेटी कंत्राटदाराच्या माध्यमातून सुद्धा काम सुरू आहे. यात सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत कोझी कंपनीची 1 हजार एकर जमीन आहे. यातील 64 एकर जमिनीवर अवैधरित्या कुठलीही परवानगी न घेता खोद काम करत मुरुम काढला.

शंभर कोटींच्या मुरुमाची चोरी

वर्धा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार आणि उपकंत्राटदारावर बेकायदेशीर मुरुम उत्खननाचा गुन्हा सेलू पोलिसांत दाखल करण्यात आला. यात कोझी कंपनी आणि शेतकऱ्यांची मिळून 104 एकर जमिनीवरील मुरुम ज्याची किंमत 100 कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.

104 एकरवरील शंभर कोटींच्या मुरुमाची चोरी प्रकरण
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग भाग दोनचे काम हे अ‌ॅपकॉन कंपनीला दिले आहे. तसेच पेटी कंत्राटदाराच्या माध्यमातून सुद्धा काम सुरू आहे. यात सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत कोझी कंपनीची 1 हजार एकर जमीन आहे. यातील 64 एकर जमिनीवर अवैधरित्या कुठलीही परवानगी न घेता खोद काम करत मुरुम काढला. यासह शेतकऱ्यांच्या जमिनीवरील ही मुरुम खोदण्यात आला, अशी तक्रार सेलू पोलिसांत देण्यात आली.ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे 59 किमी बांधकाम कंत्राट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळाले आहे. एकूण 3 हजार 220 कोटींचे हे काम असून 59 किमींचा टप्पा वर्धा जिल्ह्यात आहे. कोझी प्रॉपर्टीजची वर्धा जिल्ह्याच्या केळझर ते गणेशपूर येथे एक हजार एकर जमीन असून समृद्धी महामार्गाचा जवळपास 1.50 किमींचा भाग मालकीच्या जमिनीवरुन जातो. 63 एकर जमीन सेलू तर 40 एकर सिंदी पोलीस स्टेशन अंतर्गत येते. या चोरीची तक्रार कोझी प्रॉपर्टीजने जिल्हाधिकारी व ठाणेदार सेलू पोलीस ठाण्यात दिली आहे. या जमिनीतून 20 लाख ब्रास मुरुम चोरला असून त्याची किंमत जवळपास शंभर कोटी असल्याचे सांगितले जात आहे.


समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यामुळे या कामात हस्तक्षेत करू नका असा दम शेतकरी राजेश जयस्वाल यांना देण्यात आला. यावेळी माझ्या जमिनीवर उत्खनन करण्याचा अधिकार कोणी दिला, असे विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचे पत्र दाखवण्यात आले. या पत्रात केवळ नदीतील गाळ काढण्याचा परवाना दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री यांचा प्रोजेक्ट असल्याचे समोर करुन आपले कोण काय बिघडवणार, असा आभास दाखवत मोठ्या प्रमाणत उत्खनन केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित होत आहे.


कोझी प्रॉपर्टीचे व्यवस्थापक निलेश सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा अधिकारी, उपकंत्राटदार कंपनी एमपी कन्स्ट्रक्शन सेलू येथे अरुण कुमार आणि आशिष दफतरी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला असून या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती ठाणेदार काटकर यांनी दिली.


या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्यानंतर दोन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली. यामध्ये झालेले उत्खनन आणि कंपनीचे काम हे उपविभागीय अधिकारी आर्वी आणि वर्धा याच महसूल क्षेत्रात सुरू असल्याने अधिकारी चौकशी करुन अहवाल सादर करतील. यानंतर अहवालात काय निष्पन्न होईल यावरुन पुढील कारवाईची तरतूद केली जाईल, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान खान यांनीं ईटीव्ही भारत सोबत बोलतांना दिली.

वर्धा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार आणि उपकंत्राटदारावर बेकायदेशीर मुरुम उत्खननाचा गुन्हा सेलू पोलिसांत दाखल करण्यात आला. यात कोझी कंपनी आणि शेतकऱ्यांची मिळून 104 एकर जमिनीवरील मुरुम ज्याची किंमत 100 कोटींच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.

104 एकरवरील शंभर कोटींच्या मुरुमाची चोरी प्रकरण
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग भाग दोनचे काम हे अ‌ॅपकॉन कंपनीला दिले आहे. तसेच पेटी कंत्राटदाराच्या माध्यमातून सुद्धा काम सुरू आहे. यात सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत कोझी कंपनीची 1 हजार एकर जमीन आहे. यातील 64 एकर जमिनीवर अवैधरित्या कुठलीही परवानगी न घेता खोद काम करत मुरुम काढला. यासह शेतकऱ्यांच्या जमिनीवरील ही मुरुम खोदण्यात आला, अशी तक्रार सेलू पोलिसांत देण्यात आली.ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे 59 किमी बांधकाम कंत्राट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळाले आहे. एकूण 3 हजार 220 कोटींचे हे काम असून 59 किमींचा टप्पा वर्धा जिल्ह्यात आहे. कोझी प्रॉपर्टीजची वर्धा जिल्ह्याच्या केळझर ते गणेशपूर येथे एक हजार एकर जमीन असून समृद्धी महामार्गाचा जवळपास 1.50 किमींचा भाग मालकीच्या जमिनीवरुन जातो. 63 एकर जमीन सेलू तर 40 एकर सिंदी पोलीस स्टेशन अंतर्गत येते. या चोरीची तक्रार कोझी प्रॉपर्टीजने जिल्हाधिकारी व ठाणेदार सेलू पोलीस ठाण्यात दिली आहे. या जमिनीतून 20 लाख ब्रास मुरुम चोरला असून त्याची किंमत जवळपास शंभर कोटी असल्याचे सांगितले जात आहे.


समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यामुळे या कामात हस्तक्षेत करू नका असा दम शेतकरी राजेश जयस्वाल यांना देण्यात आला. यावेळी माझ्या जमिनीवर उत्खनन करण्याचा अधिकार कोणी दिला, असे विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचे पत्र दाखवण्यात आले. या पत्रात केवळ नदीतील गाळ काढण्याचा परवाना दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री यांचा प्रोजेक्ट असल्याचे समोर करुन आपले कोण काय बिघडवणार, असा आभास दाखवत मोठ्या प्रमाणत उत्खनन केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित होत आहे.


कोझी प्रॉपर्टीचे व्यवस्थापक निलेश सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा अधिकारी, उपकंत्राटदार कंपनी एमपी कन्स्ट्रक्शन सेलू येथे अरुण कुमार आणि आशिष दफतरी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला असून या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती ठाणेदार काटकर यांनी दिली.


या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्यानंतर दोन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली. यामध्ये झालेले उत्खनन आणि कंपनीचे काम हे उपविभागीय अधिकारी आर्वी आणि वर्धा याच महसूल क्षेत्रात सुरू असल्याने अधिकारी चौकशी करुन अहवाल सादर करतील. यानंतर अहवालात काय निष्पन्न होईल यावरुन पुढील कारवाईची तरतूद केली जाईल, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान खान यांनीं ईटीव्ही भारत सोबत बोलतांना दिली.

Intro:mh_war_01_excavation_vis1_7204321

एकशेचार एकरातील शंभर कोटीच्या मुरुमाची चोरी, समृद्धीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल

- मुख्यमंत्र्याच्या नावाने कंत्राटदाराचे चांगभल
- नावाचा दुरुपयोग करत करतात अवैध उत्खनन
- जिल्हा प्रशासननातील अनेकनाचे आशीर्वाद
- दर्डा परिवाराशी संबंधित जागेवर केले उत्खनन


# ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा अधिकारी, उपकंत्राटदाराविरुद्ध एफआयआर दाखल

वर्धा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार आणि उपकंत्राटदारावर बेकायदेशीर मुरूम उत्खननाचा गुन्हा सेलू पोलिसात दाखल करण्यात आला. यात कोझी कंपनीची आणि शेतकऱ्यांची अशी मिळून 104 एकर शेतातली मुरून ज्याची किंमत 100 कोटीच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग भाग दोनचे काम हे अँपकॉन कंपनीला दिला आहे. तसेच पेटी कंत्रातदाराच्या माध्यमातून सुद्धा काम सुरू आहे. यात सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत कोझी कंपनीची 1 हजार एकर जमीन आहे. यातील 64 एकर जमिनीवर अविधरित्या कुठलीही परवानगी न घेता खोद काम करत मुरून काढला. यासह शेतकऱ्यांच्या जमिनीवरील ही मुरून खोदण्यातला आला अशी तक्रार सेलू पोलिसात देण्यात आली.

ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे 59 किमी बांधकाम कंत्राट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळाले आहे. एकूण 3 हजार 220 कोटीचे हे काम असून 59 किमीचा टप्पा वर्धा जिल्ह्यात आहे. कोझी प्रॉपर्टीजची वर्धा जिल्ह्याच्या केळझर ते गणेशपूर येथे एक हजार एकर जमीन असून समृद्धी महामार्गाचा जवळपास 1.50 किमीचा भाग मालकीच्या जमिनीवरून जातो. 63 एकर जमीन सेलू तर 40 एकर सिंदी पोलिस स्टेशन अंतर्गत येते. या चोरीची तक्रार कोझी प्रॉपर्टीजने जिल्हाधिकारी व ठाणेदार सेलू पोलिस स्टेशनला या जमिनीतून 20 लाख ब्रास मुरूम चोरला असून त्याची किंमत जवळ्पास शंभर कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

बाईट - निलेश सिंग, कोझी कंपनीचे तक्रारकर्ता

समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट यामुळे या कामात हस्तक्षेत करू नका असा दम शेतकरी राजेश जयस्वाल यांना देण्यात आला. यावेळी माझा जमिनीवर उत्खनन करण्याचा अधिकार कोणी दिला असे विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचे पत्र दाखवण्यात आले. या पत्रात केवळ नदीतील गाळ काढण्याचा परवाना दिला आहे. मात्र मुख्यमंत्री यांचा प्रोजेक्त असल्याचे समीर करून आपलं कोण काय बिघडवणार असा आभास दाखवत मोठ्या प्रमाणत उत्खनन केले आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान करून करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल उपस्थित होत आहे.

बाईट - राजेश जयस्वाल, शेतकरी,

कोझी प्रॉपर्टीचे व्यवस्थापक निलेश सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा अधिकारी, उपकंत्राटदार कंपनी एमपी कन्स्ट्रक्शन सेलू येथे अरुण कुमार आणि आशिष दफतरी या दोघां विरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला असून या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही नसल्याची माहिती ठाणेदार काटकर यांनी दिली.

बाईट - प्रल्हाद काटकर, ठणेदार, सेलू पोलिस स्टेशन

या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे आल्यानंतर दोन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली. यामध्ये झालेले उत्खनन आणि कंपनीचे काम हे उपविभागीय अधिकारी आर्वी आणि वर्धा याचा महसूल क्षेत्रात सुरू असल्याने दोन्ही अधिकारी चौकशी करून अहवाल सादर करतील. यानंतर अहवालात काय निष्पन्न होईल यावरून पुढील कारवाईची तरतूद केल्या जाईल अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान खान यांनीं ईटीव्ही भारत सोबत बोलतांना दिली.
बाईट - डॉ. इम्रान खान, जिल्हा खनिकर्म अधिकारी.

समृद्धी महामार्गच्या कामात कुठलाही अरथडा येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाला तोंडी आदेश प्राप्त आहे. यामुळे प्रशासन कंत्राटदाराच्या हातचे कातपुटली तर नाही न असा प्रश्न आहे. 100 एकरातील मुरून अवैध उत्खनन करत असताना शेतकऱ्यांनाच्या जमिनीतील काढलेल्या मुरुम माती चोरीच्या गुन्ह्यातील प्रकरणात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.