ETV Bharat / state

...अन् गिरडच्या राममंदिरात पार पडला 'महादेवाचा' लग्नसोहळा

वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्याच्या गिरड या गावात गरीब कुटुंबातील मुलाचा विवाह गावकऱ्यांनी धुमधड्यात करून दिला.

author img

By

Published : May 28, 2019, 11:32 AM IST

Updated : May 28, 2019, 3:30 PM IST

नव्या जोडप्यासमवेत महादेवच्या मातोश्री

वर्धा - लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे ज्येष्ठ मंडळी म्हणत असतात. लग्न केव्हा, कुठे आणि कसे हे ही अगोदरच ठरले असल्याचेही सांगतात. पण वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्याच्या गिरडच्या महादेवाचे लग्न असे झाले की याची प्रचिती सर्वानांच झाली. जोडप्यांचे लग्न अगोरदच ठरले असेल तर मग अडचणी कसल्या गावकऱ्यांनी ठरवले आणि धुम धडाक्यात लग्न करून देत सर्वांसमोर एक आदर्श ठेवले.

माहिती सांगताना

महादेव संतोष खंडरे कुटुंबीयांची परिस्थिती जेमतेम वडील अर्धांगवायूने अंथरूणार खिळले असल्यामुळे आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. मुलाचे लग्न व्हावे असा विचार त्यांच्या मनात आला. गावातील काही लोकांजवळ त्यांनी आपला विचार बोलून दाखवला. महादेव हा स्वभावाने मनमिळावू असल्याने गावकऱ्यांनी पुढाकार घेत वधूचा शोध सुरू केला. नागपूरच्या बोरगावात हा शोध संपला. मुळच्या गिरडच्या असणाऱ्या रंजना राऊत यांच्या घरचीही परिस्थीती जेमतेमच त्यांची मुलगी रूपालीशी महादेवचा विवाह ठरला. दोघांच्या घरची परिस्थीती अंत्यत हालाकीची असल्यामुळे केवळ दोन हार घालून विवाह करण्याचे ठरले.

मुलाचे लग्न धुमधडाक्यात व्हावे अशी महादेवच्या आईची इच्छा होती. पण, पती अंथरुणात पडून, राहायला चांगला घर नाही. मग लग्न कसे होणार, या विचारात त्या पडल्या होत्या. मग महादेवाच्या लग्नासाठी सर्वात पहिले राम मंदिरचे दार खुले झाले. श्रीराम मंदिर देवस्थान समितीने केवळ मंदिराचे दारच खुले केले नाही, तर गावकऱ्यांना आवाहन करून पैसा जमवला. गावकऱ्यांनीही हाकेला धावून येत एक नवा आदर्श घडवला. महादेवाचा संसार चांगला व्हावा म्हणून गावकऱ्यांनी पडके घर दुरुस्त केलेच आणि दुसरीकडे लग्नाची तयारी सुरू केली.

सोमवारी हा विवाह सोहळा गावाकऱ्यांच्या साक्षीने ठरला. बँड-बाजासह वरात आली. हे सगळे शक्य झाले ते गावकऱ्यांच्या मदतीने. सर्व पाहुणेमंडळी एकमेकांची काळजी घेत होते. लग्न लागले अक्षदा पडल्या मंडळीने जेवणाचा आस्वाद घेतला. जे लग्न दोन फुलांच्या हारावर होणार त्याला गावकऱ्यांनी धूम धडाक्यात साजरे केले.


गावकऱ्यांनी आई-वडिलांच्या भूमिकेत जाऊन आदर्श विवाह घडवून आणला. मनाचा मोठेपणा दाखवत सर्व लग्न संस्कार पार पाडत महादेव आणि रुपालीच्या संसाराची घडी बसवून दिली. गिरड सारखे संवेदनशील गावकरी महाराष्ट्रातील गावा गावाला लाभले पाहिजे. जेणेकरून शेतकरी कुटुंबातील मुलगी हुंड्यासाठी आत्महत्या करणार नाही. लग्नाला पैसे लावून कर्जबाजारी झालेला शेतकरी बाप गळ्याला फास लावणार नाही, अशी चर्चा परिसरात होती.

वर्धा - लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे ज्येष्ठ मंडळी म्हणत असतात. लग्न केव्हा, कुठे आणि कसे हे ही अगोदरच ठरले असल्याचेही सांगतात. पण वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्याच्या गिरडच्या महादेवाचे लग्न असे झाले की याची प्रचिती सर्वानांच झाली. जोडप्यांचे लग्न अगोरदच ठरले असेल तर मग अडचणी कसल्या गावकऱ्यांनी ठरवले आणि धुम धडाक्यात लग्न करून देत सर्वांसमोर एक आदर्श ठेवले.

माहिती सांगताना

महादेव संतोष खंडरे कुटुंबीयांची परिस्थिती जेमतेम वडील अर्धांगवायूने अंथरूणार खिळले असल्यामुळे आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. मुलाचे लग्न व्हावे असा विचार त्यांच्या मनात आला. गावातील काही लोकांजवळ त्यांनी आपला विचार बोलून दाखवला. महादेव हा स्वभावाने मनमिळावू असल्याने गावकऱ्यांनी पुढाकार घेत वधूचा शोध सुरू केला. नागपूरच्या बोरगावात हा शोध संपला. मुळच्या गिरडच्या असणाऱ्या रंजना राऊत यांच्या घरचीही परिस्थीती जेमतेमच त्यांची मुलगी रूपालीशी महादेवचा विवाह ठरला. दोघांच्या घरची परिस्थीती अंत्यत हालाकीची असल्यामुळे केवळ दोन हार घालून विवाह करण्याचे ठरले.

मुलाचे लग्न धुमधडाक्यात व्हावे अशी महादेवच्या आईची इच्छा होती. पण, पती अंथरुणात पडून, राहायला चांगला घर नाही. मग लग्न कसे होणार, या विचारात त्या पडल्या होत्या. मग महादेवाच्या लग्नासाठी सर्वात पहिले राम मंदिरचे दार खुले झाले. श्रीराम मंदिर देवस्थान समितीने केवळ मंदिराचे दारच खुले केले नाही, तर गावकऱ्यांना आवाहन करून पैसा जमवला. गावकऱ्यांनीही हाकेला धावून येत एक नवा आदर्श घडवला. महादेवाचा संसार चांगला व्हावा म्हणून गावकऱ्यांनी पडके घर दुरुस्त केलेच आणि दुसरीकडे लग्नाची तयारी सुरू केली.

सोमवारी हा विवाह सोहळा गावाकऱ्यांच्या साक्षीने ठरला. बँड-बाजासह वरात आली. हे सगळे शक्य झाले ते गावकऱ्यांच्या मदतीने. सर्व पाहुणेमंडळी एकमेकांची काळजी घेत होते. लग्न लागले अक्षदा पडल्या मंडळीने जेवणाचा आस्वाद घेतला. जे लग्न दोन फुलांच्या हारावर होणार त्याला गावकऱ्यांनी धूम धडाक्यात साजरे केले.


गावकऱ्यांनी आई-वडिलांच्या भूमिकेत जाऊन आदर्श विवाह घडवून आणला. मनाचा मोठेपणा दाखवत सर्व लग्न संस्कार पार पाडत महादेव आणि रुपालीच्या संसाराची घडी बसवून दिली. गिरड सारखे संवेदनशील गावकरी महाराष्ट्रातील गावा गावाला लाभले पाहिजे. जेणेकरून शेतकरी कुटुंबातील मुलगी हुंड्यासाठी आत्महत्या करणार नाही. लग्नाला पैसे लावून कर्जबाजारी झालेला शेतकरी बाप गळ्याला फास लावणार नाही, अशी चर्चा परिसरात होती.

Intro:mh_war_vivahsohala_vis1_7204321
राममंदिरात पार पडला 'महादेवाचा' लग्नसोहळा
- रुपाली झाली जीवसांगिनी
- लोकसहभागातून मदतीचे दार केले खुले, थाटात पार पडला विवाह सोहळा
- वर्ध्यातील गिरड गावाची एकजूट
- लग्नसाठी मंदिराचे दार खुले
- दोन फुलांचा हारावर होणारे लग्न गावकऱ्यांमुळे ठरले आदर्श

लग्न हे वरून ठरतात असे जुने लोक म्हणतात आणि केव्हा कुठे आणि कसे हे ही अगोदरच ठरले आल्याचेही सांगतात. पण वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्याच्या गिरडच्या महादेवाचे लग्न असे झाले की याची प्रचिती सर्वानाच झाली. अगोरदच ठरले असेल तर मग अडचणी कसल्या गावकऱ्यांनी ठरवले आणि धुम धडाक्यात लग्नसोहळा पार पडला. आदर्श ठरले ते वेगळेच


गिरड येथील महादेव संतोश खंडरे स्वभावाने अगदी साधा. परिस्थिती जेमतेम वडील अर्धांगवायूने चारपाईवर जडले. आई मोलमजुरी करत. मुलगा साधा असल्याने लग्न व्हावे असा विचार मनात आला. गावातील काही लोकांचा जवळ बोलून दाखवला. मग काय वधूचा शोध सूरु झाला.

शोध जाऊन पोहचला तो चक्क नागपूर जिल्ह्याच्या बोरगावत रुपाली रंजना राऊत हिच्या घरात. रंजनाचे पती मरण पावले. तीन मुली, यातील एकीचा विवाह पार पडला. रुपाली ही दुसरी मुलगी. घरची परिस्थिती हातावर आणून तव्यावर अशीच. तिचे माहेर गिरडचे असल्याने ती अगोदर तिथेच राहत. पण वडील गेले आणि गाव सुटले. महादेवाचा निरोप आला लग्न करण्याचे ठरले. मंदिरात दोन हार घालून विवाह करण्याचे ठरले.

मुलाचे लग्न चांगले व्हावे म्हणून आईची इच्छा पण काय करणार पती अंथरुणावर पडून राहायला घर नाही. मग लग्न कोण करणार. मग काय महादेवाच्या लग्नासाठी सर्वात पहिले राममंदिराचे दार खुले झाले. श्रीराम मंदिर देवस्थान कमेटिचे अध्यक्ष बलवंत गाठे, सचिव बबन दाबणे, व्यवस्थापक सुरेश गिरडे, अशोक हलवाई यांनी केवळ मंदिराचे दारच खुले केले नाही , तर गावकऱ्यांना आवाहन करून पैसा जमवला. गावकर्यांनीही हाकेला धावून येते एक नवा आदर्श घडवला. महादेवाचा संसार चांगला व्हावा म्हणून पडके घर दुरुस्ती केलेच आणि दुसरीकडे लग्नाची तयारी सुरू केली.

आज हा विवाह सोहळा सर्व गावाच्या साक्षीने ठरला. बँड बाजा बारात आली. वर्हाडी आले. सगळं काही गावकऱ्यांच्या मदतीने. हे लग्न होत मदतीचा हात खुला करणाऱ्या प्रत्येकाच्या कुटुंबातले. सर्व पाहुणे मंडळी एकमेकांची काळजी घेत होते. लग्न लागले अक्षदा पडल्या मंडळीने जेवणाचा आस्वाद घेतला. जे लग्न दोन फुलांच्या हारावर होणार त्याला गावकऱ्यांनी धूम धड्याक्यात साजरे केले. कधी विचार न केलेल्या महादेव आणि रुपालीसाठी राममंदिरात लाभलेले गावकरी देवासारखे धावून आले.

गावकर्यांनी आई वडिलांच्या भूमिकेत जाऊज आदर्श विवाह घडवून आणला. मनाचा मोठेपणा दाखवत सर्व लग्न संस्कार पार पाडत महादेव आणि रुपालीच्या संसाराची घडी बसवून दिली. गिरड सारखे संवेदनशील गावकरी महाराष्ट्रातील गावा गावाला लाभले पाहिजे. जेणेकरून शेतकरी कुटुंबातील मुलगी हुंड्यासाठी आत्महत्या करणार नाही. लग्नाला पैसे लावून कर्जबाजारी झालेला शेतकरी बाप गळ्याला फास लावणार नाही.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : May 28, 2019, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.