ETV Bharat / state

उन्हाळी पीक घेणाऱ्यांसाठी पाणी आरक्षित ठेवा, पालकमंत्री केदार यांच्या सूचना

author img

By

Published : Nov 10, 2020, 3:12 AM IST

वर्ध्याच्या जिल्हा परिषद सभागृत पालकमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बोर प्रकल्प कालवा सल्लागार समिती आणि जिल्हास्तरीय पाणी वाटप समितीची बैठक पार पडली. यात पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पाण्याच्या नियोजना संदर्भात सूचना केल्या.

Guardian Minister Sunil Kedar meet
बोर प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक

वर्धा - यंदा बोर प्रकल्प हा शंभर टक्के भरला असून त्यामध्ये सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. यामधून जवळपास साडेतेरा हजार हेक्टरवरील जमिनीचे सिंचन होणार आहे. या वर्षी गहू, हरभरा आणि उन्हाळी पीक घेणाऱ्यांसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी पाणी आरक्षित करून ठेवावे. तसेच, पाणी वाटप संस्थेच्या कार्यशाळा घेऊन त्यांचा सहभाग वाढवावा, अशा सूचना पशुसंवर्धन तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

वर्ध्याच्या जिल्हा परिषद सभागृत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बोर प्रकल्प कालवा सल्लागार समिती आणि जिल्हास्तरीय पाणी वाटप समितीची बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना पाण्याच्या नियोजना संदर्भात सूचना केल्या.

बोर प्रकल्पात सिंचन क्षमता, पण कृषी विभागाने लक्ष देणे महत्वाचे

बोर प्रकल्पात सध्या सिंचनासाठी ९८.७७७ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. यातून तेरा हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाऊ शकते. पण, याच्या नियोजनात कृषी विभागाचा सक्रिय सहभाग दिसत नसल्याने पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, नोव्हेंबर महिना लागला असताना कपाशीसाठी पन्नास टक्के पाणी शिल्लक का ठेवण्यात आले, असा सवाल उपस्थित केला आहे.

मागील तीन वर्षापासून बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव पाहाता फरतड घेऊ नये. कपाशीचे पीक हे एप्रिल महिन्यापर्यंत लांबल्यामुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे, असे असताना नोव्हेंबर महिन्यापर्यंत पन्नास टक्के पाणी का शिल्लक ठेवले, असा प्रश्न पालकमंत्री केदार यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

सिंचनासह पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे

सिंचनाचा प्रश्न हाताळत असताना पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामपंचायतींची पाण्यासाठी मागणी तर नाही ना, याबाबत खात्री करून घेण्याचे निर्देश सुद्धा पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. त्याचबरोबर, प्रकल्पाची मूळ सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमता यावर चर्चा करताना उद्दिष्टांपेक्षा सिंचन कमी होण्याच्या कारणावर अभ्यास करण्याचे सुद्धा पालकमंत्र्यांनी सांगितले.

कालवे पाटचऱ्या नादुरुस्त असतील तर दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. तसेच, पाणी वाटपात सहकारी संस्थेच्या सक्रीय सहभागासाठी प्रकल्पनिहाय कार्यशाळा घेऊन, सुक्ष्म सिंचनासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. थकीत बिल असल्यास वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असेही बैठकीत सांगण्यात आले.

निम्न वर्धा प्रकल्पाकडे पीक निहाय सूचनांच्या नियोजनाचा अभाव

निम्न वर्धा प्रकल्पातील यंदा २४२.५३७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. सिंचनासाठी धरण व इतर बॅरेज आणि सिंचन प्रकल्प मिळून ५१.४०६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. यातून ४५ हजार १६० हेक्‍टर सिंचन होऊ शकते. यात निम्न वर्धा प्रकल्पाकडून पीक निहाय पाण्याचे नियोजन न केल्याने पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. पिकानुसार पाण्याचे नियोजन करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. बैठकीला जिल्हाधिकारी भिमनवार, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता जेजी गवळी, कार्यकारी अभियंता लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे उपस्थित होते.

हेही वाचा- कोरोनाच्या काळातील वेतनाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह आक्रोश

वर्धा - यंदा बोर प्रकल्प हा शंभर टक्के भरला असून त्यामध्ये सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. यामधून जवळपास साडेतेरा हजार हेक्टरवरील जमिनीचे सिंचन होणार आहे. या वर्षी गहू, हरभरा आणि उन्हाळी पीक घेणाऱ्यांसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी पाणी आरक्षित करून ठेवावे. तसेच, पाणी वाटप संस्थेच्या कार्यशाळा घेऊन त्यांचा सहभाग वाढवावा, अशा सूचना पशुसंवर्धन तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

वर्ध्याच्या जिल्हा परिषद सभागृत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बोर प्रकल्प कालवा सल्लागार समिती आणि जिल्हास्तरीय पाणी वाटप समितीची बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना पाण्याच्या नियोजना संदर्भात सूचना केल्या.

बोर प्रकल्पात सिंचन क्षमता, पण कृषी विभागाने लक्ष देणे महत्वाचे

बोर प्रकल्पात सध्या सिंचनासाठी ९८.७७७ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. यातून तेरा हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाऊ शकते. पण, याच्या नियोजनात कृषी विभागाचा सक्रिय सहभाग दिसत नसल्याने पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, नोव्हेंबर महिना लागला असताना कपाशीसाठी पन्नास टक्के पाणी शिल्लक का ठेवण्यात आले, असा सवाल उपस्थित केला आहे.

मागील तीन वर्षापासून बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव पाहाता फरतड घेऊ नये. कपाशीचे पीक हे एप्रिल महिन्यापर्यंत लांबल्यामुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे, असे असताना नोव्हेंबर महिन्यापर्यंत पन्नास टक्के पाणी का शिल्लक ठेवले, असा प्रश्न पालकमंत्री केदार यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

सिंचनासह पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे

सिंचनाचा प्रश्न हाताळत असताना पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामपंचायतींची पाण्यासाठी मागणी तर नाही ना, याबाबत खात्री करून घेण्याचे निर्देश सुद्धा पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. त्याचबरोबर, प्रकल्पाची मूळ सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमता यावर चर्चा करताना उद्दिष्टांपेक्षा सिंचन कमी होण्याच्या कारणावर अभ्यास करण्याचे सुद्धा पालकमंत्र्यांनी सांगितले.

कालवे पाटचऱ्या नादुरुस्त असतील तर दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. तसेच, पाणी वाटपात सहकारी संस्थेच्या सक्रीय सहभागासाठी प्रकल्पनिहाय कार्यशाळा घेऊन, सुक्ष्म सिंचनासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. थकीत बिल असल्यास वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असेही बैठकीत सांगण्यात आले.

निम्न वर्धा प्रकल्पाकडे पीक निहाय सूचनांच्या नियोजनाचा अभाव

निम्न वर्धा प्रकल्पातील यंदा २४२.५३७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. सिंचनासाठी धरण व इतर बॅरेज आणि सिंचन प्रकल्प मिळून ५१.४०६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. यातून ४५ हजार १६० हेक्‍टर सिंचन होऊ शकते. यात निम्न वर्धा प्रकल्पाकडून पीक निहाय पाण्याचे नियोजन न केल्याने पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. पिकानुसार पाण्याचे नियोजन करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. बैठकीला जिल्हाधिकारी भिमनवार, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता जेजी गवळी, कार्यकारी अभियंता लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे उपस्थित होते.

हेही वाचा- कोरोनाच्या काळातील वेतनाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह आक्रोश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.