वर्धा - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निवडणूक जाहीरनाम्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच फिरकी उडवली. विरोधकांनी जाहीरनाम्यात जगातील अशी सर्व आश्वासने दिले जी कधीच पूर्ण करता येणार नाहीत. त्यात फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ आणि चंद्रावर एक प्लॉट देऊ हे दोनच मुद्दे सुटले असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या जाहिरनाम्याची फिरकी उडवली आहे. ते कारंजा येथे भाजप-महायुतीचे उमेदवार माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
आता फक्त प्रत्येकाला चंद्रावर एक-एक प्लॉट देणे बाकी आहे; फडणवीसांची आघाडीवर टीका
विरोधकांनी जाहीरनाम्यात जगातील अशी सर्व आश्वासने दिले जी कधीच पूर्ण करता येणार नाहीत. त्यात फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ आणि चंद्रावर एक प्लॉट देऊ हे दोनच मुद्दे सुटले असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या जाहीरनाम्याची फिरकी उडवली आहे. यावेळी, विरोधक आणि शरद पवार यांची परिस्थिती ही शोले चित्रपटातील जेलरसारखी झाल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.
![आता फक्त प्रत्येकाला चंद्रावर एक-एक प्लॉट देणे बाकी आहे; फडणवीसांची आघाडीवर टीका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4735248-1093-4735248-1570939845989.jpg?imwidth=3840)
हेही वाचा - औरंगाबाद शहराच्या नावाला हात लावला तर याद राखा - अबू आझमी
यावेळी, विरोधक आणि शरद पवार यांची परिस्थिती ही शोले चित्रपटातील जेलरसारखी झाल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, यंदा निवडणुकीत मजा नाही. त्याचे कारण म्हणजे विरोधकांनी पराभव स्वीकारला आहे. काँग्रेस नामशेष होत चालली आहे. मागील निकडणुकीत राहिलेले दोन आमदार यावेळी पराभूत होतील. यावेळी मंचावर माजी आमदार दादाराव केचे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रशांत शाहगडकर यांच्यासह अनेक भाजप-शिवसेना युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
वर्धा - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निवडणूक जाहीरनाम्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच फिरकी उडवली. विरोधकांनी जाहीरनाम्यात जगातील अशी सर्व आश्वासने दिले जी कधीच पूर्ण करता येणार नाहीत. त्यात फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ आणि चंद्रावर एक प्लॉट देऊ हे दोनच मुद्दे सुटले असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या जाहिरनाम्याची फिरकी उडवली आहे. ते कारंजा येथे भाजप-महायुतीचे उमेदवार माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
हेही वाचा - औरंगाबाद शहराच्या नावाला हात लावला तर याद राखा - अबू आझमी
यावेळी, विरोधक आणि शरद पवार यांची परिस्थिती ही शोले चित्रपटातील जेलरसारखी झाल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, यंदा निवडणुकीत मजा नाही. त्याचे कारण म्हणजे विरोधकांनी पराभव स्वीकारला आहे. काँग्रेस नामशेष होत चालली आहे. मागील निकडणुकीत राहिलेले दोन आमदार यावेळी पराभूत होतील. यावेळी मंचावर माजी आमदार दादाराव केचे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रशांत शाहगडकर यांच्यासह अनेक भाजप-शिवसेना युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येकाला एक ताजमहाल आणि चंद्रावर एक प्लॉट देणे बाकी राहिले- मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्रात निवडणूकीचे वातावरण तापले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनाम्याचा समाचार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच फिरकी उडवली. विरोधी पक्षाने अगोदरच हार स्वीकारली असल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. जाहीरनाम्यात जगातील सर्व आश्वासने दिले जी कधीच पूर्ण करण्याची गरज पडणार नाही, हे ध्यानात ठेवून सर्व जे आश्वासने देता येईल ते लिहिलेत. यात राहिले ते फक्त म्हणजे एक प्रत्येकाला ताजमहाल बांधून देतो. सरकार आले तर चंद्रावर प्रत्येकाला प्लॉट देतो एवढेच दोन मुद्दे सुटले असल्याचे म्हणत जाहिरनाम्याची फिरकी उडवली.
ते कारंजा येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. भाजप महायुतीचे उमेदवार माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी विरोधक आणि शरद पवार यांचे शोलेतील जेलर सारखी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले यंदा निवडणुकीत मजा येत नाही आहे, त्याचे कारण म्हणजे पाच वर्षांच्या मुलालाही विचारले तर तो सांगेल यंदा महाराष्ट्रात भाजप सेना महायुतीचे सरकार येणार आहे. राहुल गांधींना माहीत असल्याने निवडणून येणार नाही म्हणून बँकॉकला निघून गेले. प्रचाराला येऊन काही अर्थ नाही. सत्तेत भाजपचे सरकार येणार हे त्यांना माहीत असल्याचे ते म्हणाले. मात्र पक्षातील नेत्यांनी विनंती केली असल्याने आतांबते येणार असल्याचे सांगत आहे.
यावेळी भाजप सरकारने पाच वर्षात सिंचन, जलयुक्त शिवार याच्या माध्यमातून केलेल्या कामाचा पाढा वाचला. जलयुक्त शिवरच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल होत आहे. सिंचन प्रकल्प मार्गी लागल्याने सिंचन क्षमता वाढली. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. मागील 15 वर्षात आघाडीच्या सरकारने 20 हजार कोटी दिले. भाजप सरकार पाच वर्षात 50 हजार कोटींची निधी उपलब्ध केल्याचे ते म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादीने 15 वर्षात केलेल्याबकामाचा हिशोब द्यावा. पाच वर्षात दुप्पट काम केले असल्याचेही ते म्हणालेत.
यावेळी बोलतांना त्यांनी काँग्रेस नामशेष होत चालली आहे. मागील निकडणुकीत राहिलेले दोन आमदार यावेळी पराभूत होतील असलेही म्हणालेत 70 वर्षानंतर श्रीनगर जम्मू काश्मीर लददाख मध्ये तिरंगा फडकला.
यावेळी मंचावर माजी आमदार दादाराव केचे, शिवसेने जिल्हा प्रमुख प्रशांत शाहगडकर, यांच्यासह अनेक भाजप शिवसेना युतीचे पदाधिकारी होते. सहकार नेते दिलीप काळे यांचे चिरंजीव यांनी राष्ट्रवादीला राम राम करत भाजपाचे कमळाला पसंती देत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion: