ETV Bharat / state

पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना जनतेने लाथाडले पाहिजे - बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीकडून जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलानाची आंबेडकर पुतळ्यापासून सुरूवात झाली. त्यानंतर आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

author img

By

Published : Jul 31, 2019, 7:37 PM IST

Updated : Jul 31, 2019, 10:24 PM IST

पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना जनतेने लाधाडले पाहिजे

वर्धा - पक्षांतर करणारे लोक मोठ्या प्रमणात इकडून तिकडे जात आहेत. त्यांना मतदार जनतेने लाथाडले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील हे 5 वर्षे विरोधीपक्ष नेते राहिले. त्यानंतर जर काँग्रेसचा विरोधीपक्ष नेताच काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात असेल, तर आता काँग्रेस पक्ष संपवून मोदींच्या नेतृत्वात सामील करून टाकला पाहिजे. तसेच त्यामध्ये राहुल गांधींनासुद्धा घेतले पाहिजे, जेणेकरून दुसरा पक्षच राहणार नाही, अशी उपहासात्मक टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना जनतेने लाथाडले पाहिजे

प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडून वर्ध्यात शेतकऱ्यांसाठी आयोजित जेलभरो आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलत होते.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीकडून जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलाना आंबेडकर पुतळ्यापासून सुरूवात झाली. त्यानंतर आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी पुढे बोलताना कडू म्हणाले, की सरकारने जे कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. ते आता पुर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांनी दीड लाखाच्यावरील रक्कम भरली. मात्र, तरीही कर्जमाफीची रक्कम मिळाली नाही, याचे मुख्यंमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. सरकारने काही ठराविक तालुक्यांना दुष्काळ निधी दिला नाही. लोक अजूनही दुष्काळ निधीच्या प्रतिक्षेत आहेत. त्याबरोबरच ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था नाही, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.

यावेळी आंदोलनात प्रहार पक्षाचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे, जिल्हा प्रमुख विकास दांडगे, राजेश सावरकर, विवेक ठाकरे, संदीप उमक, मिलिंद गव्हाळे, भानुदास सोमानाथे, भूषण येलेकार, रोषण दाभाडे, आदित्य कोकडवार उपस्थित होते.

वर्धा - पक्षांतर करणारे लोक मोठ्या प्रमणात इकडून तिकडे जात आहेत. त्यांना मतदार जनतेने लाथाडले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील हे 5 वर्षे विरोधीपक्ष नेते राहिले. त्यानंतर जर काँग्रेसचा विरोधीपक्ष नेताच काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात असेल, तर आता काँग्रेस पक्ष संपवून मोदींच्या नेतृत्वात सामील करून टाकला पाहिजे. तसेच त्यामध्ये राहुल गांधींनासुद्धा घेतले पाहिजे, जेणेकरून दुसरा पक्षच राहणार नाही, अशी उपहासात्मक टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना जनतेने लाथाडले पाहिजे

प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडून वर्ध्यात शेतकऱ्यांसाठी आयोजित जेलभरो आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलत होते.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीकडून जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलाना आंबेडकर पुतळ्यापासून सुरूवात झाली. त्यानंतर आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी पुढे बोलताना कडू म्हणाले, की सरकारने जे कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. ते आता पुर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांनी दीड लाखाच्यावरील रक्कम भरली. मात्र, तरीही कर्जमाफीची रक्कम मिळाली नाही, याचे मुख्यंमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. सरकारने काही ठराविक तालुक्यांना दुष्काळ निधी दिला नाही. लोक अजूनही दुष्काळ निधीच्या प्रतिक्षेत आहेत. त्याबरोबरच ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था नाही, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.

यावेळी आंदोलनात प्रहार पक्षाचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे, जिल्हा प्रमुख विकास दांडगे, राजेश सावरकर, विवेक ठाकरे, संदीप उमक, मिलिंद गव्हाळे, भानुदास सोमानाथे, भूषण येलेकार, रोषण दाभाडे, आदित्य कोकडवार उपस्थित होते.

Intro:काँग्रेस विसर्जीत करून राहुल गांधींसह मोदींच्या नेतृत्वात सामील करून घ्यावे - आमदार बच्चू कडू
-         पक्षाचे झेंडे शेतात रोवण्याची वेळ आली
-         वर्ध्यात आ मदार बच्चूकडूचे शेतकऱ्यांसाठी जेलभरो आंदोलन
-         वर्ध्यात जिलाधिकारी कार्याल्यावर मोर्चा काढून दिले निवेदन
-         शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन टायर जाळून मोदी सरकारच्या विरोधात धरणे
-         दुष्काळी परिस्थितीसाठी निधीची मागणी न केल्याचे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
- आमदार बच्चू कडू यांची टीका
हे संधी साधू लोक असून आज मोठ्या प्रमणात इकडून तिकडे जाणाऱ्याना मतदार जनतेने लाथाडले पाहिजे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील पाच वर्ष विरोधीपक्ष नेते राहिले. जर कॉंग्रेसचा विरोधीपक्ष नेताच कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये जात असेल तर आता कॉंग्रेस मोडून टाकून पूर्ण पक्ष मोदींच्या नेतृत्वात सामील करून टाकले पाहिजे. राहुल गांधीनासुद्धा घेतलं पाहिजे. जेणेकरून दुसरा पक्षचा राहणार नाही, अशी उपहासात्मक टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपवर केली. यापुढे शेतात पिक पिकवून काही होत नसल्याने पक्षाचे झेंडे पेराव लागेल असे आंदोलन येत्या काळात करावे लागेल, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडून महाले. ते वर्ध्यात शेतकऱ्यांसाठी आयोजित जेलभरो आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलत होते.

संपूर्ण कर्जमाफीची व्याख्या सांगा, मंडळांना दुष्काळी निधी केव्हा देता याचे उत्तर उद्या विदर्भात येत असतना दिले पाहिजे. कर्जमाफीचे जे आश्वासन दिले होते ते फेल ठरले आहे. दीडलाखाच्या वरील रक्कम भरली मात्र सरकारःचे पैसे न आल्याने कर्जमाफी मिळाली नाही, मुख्यंमंत्र्यांनी ते स्पष्ट करावे. दुष्काळ जाहीर केला २६८ महसूल मंडळ, ५४४९ गावे दुष्काळी जाहीर करून त्याचे पैसे दिले नाही. काही ठराविक तालुक्यांना दुष्काळ निधी दिला नाही लोक अजून प्रतीक्षेत आहे. तसेच ड वर्गात मोडणाऱ्या लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळाला नाही. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था नाही. सामाजिक न्याय विभागात दोन टक्के ओबीसीना जागा भेटते. त्याला वसतिगृह निधी दिला पाहिजे.
वर्ध्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडून यांनी जेलभरो आंदोलन केले. या आंदोलाना आंबेडकर पुतळ्याजवळून सुरवात करण्यात आली. यावेळी पायदळ मार्च हा जिल्हाधिकारी कार्यालाकडे पोलीस बंदोबस्तात जात असतना जिल्हाप्रमुख विकास दांडगे यांनी टायर जाळला. यावेळी मोदी सरकारचे शेतकरी विरोधी असल्याच्या घोषणा देण्यात आल्या. निवासी अपजिल्हाधिकारी यांना निवेदन देत विविध मागण्या लावून धरण्यात आल्या आहे. त्यानंतर जेलभरो आंदोलन करण्यात आले.
वर्ध्यात आज आमदार बच्चू यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शासनाच्या जीआर नुघून एक महिना झाला. यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी किती रकमेची मागणी केली यावर विचारणा केली असता अद्याप याबद्दल माहिती गोळा झाली नसल्याचे सांगण्यात आल्याने आमदार बच्चू कडून यांनी दुख व्यक्त केले. शाश्नाचा जीआर निघून एक महिना झाला असला तरी अद्याप मागणी करणायत आली नाही. त्यांनतर जेलभरो आंदोलन करत स्वताल पक्षाच्या पदाधिकार्यांसह अटक करून घेतली.
यावेळी आंदोलनात प्रहार पक्षाचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे, जिल्हा प्रमुख विकास दांडगे, राजेश सावरकर, विवेक ठाकरे, संदीप उमक, मिलिंद गव्हाळे, भानुदास सोमानाथे, भूषण येलेकार, रोषण दाभाडे, आदित्य कोकडवार.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Jul 31, 2019, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.