वर्धा - आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी लोकशाहीत आगळा वेगळा प्रयोग करत दहीहंडी फोडल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, असे विधान राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार Agriculture Minister Abdul Sattar यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या दहीहंडीवर बोलतांना 50 थर लावतात सर्वात मोठी दहीहंडी फोडल्याच्या वक्तव्यावर अब्दुल सत्तार यांनी शिवसेनला टोला लगावला. ते आज वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागात शेतजमिनीच्या नुकसानीची पाहणी दौऱ्यावर होते. सेलू तालुक्याच्या कोटंबा, कोल्ही शिवारात शेताची पाहणी करत नुकसानीची माहिती घेत माध्यमांशी बोलत होते.
'...म्हणून ते आज मुख्यमंत्री झाले' : लोकशाहीत अशा पद्धतीने निर्णय घेत वेगळा प्रयोग केला. गोव्यापासून तर गुवाहाटीपर्यंतचा प्रयोग सर्वांनी बघितला आहे. पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेत जी दहीहंडी फोडली त्याचा परिणाम म्हणून ते आज मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मुबंईमध्ये होत असलेल्या दहीहंडी गोविंदाना दहा लाखांचा संरक्षण कवच दिले. त्यामुळे या खेळाडूंना न्याय दिला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. दोन वर्षात कोरोना संकटात धार्मिक, सामाजिक कार्यक्रम झाले नव्हते. पण एकनाथ शिंदे सरकारने यावेळी खुल्या मनाने, खुल्या दिलाने मदतीची घोषणा केली. विशेषतः दहीहंडीचा सण फार मोठ्या उत्साहाने साजरा व्हावा. येणार्या काळात मुंबई, पुणे व्यतिरिक्त सगळीकडे हा सण मोठ्या उत्साहात साजरा होईल, अशी आशाही व्यक्त केली. दहीहंडीचा सराव करणार्यांचीही दक्षता मुख्यमंत्री यांनी घेतली आहे दहीहंडीच्या कार्यक्रमाला त्यांनी जे पन्नास लोकांचा, पन्नास फुटाचा आणि पन्नास थराचा रूप देणारे पहिले मुख्यमंत्री आहे. ते ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे, असेही सत्तार म्हणाले.
'लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील' : शेतकर्यांच्या पंचांनाम्याबाबत कर्मचारी अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल. शेतापर्यंत जाताना अडचणी आहे त्या ठिकाणी ड्रोन सर्वे आणि सटेलाईट सर्व्हेचे रिपोर्ट एकत्रित केले जाईल. बोगस पंचनामे होणार करत सत्य लपवल्या जाणार नाही. एकही शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहणार नाही. कोणत्याही अधिकार्याने पंचनाम्याबाबत पक्षपात करत असेल आणि लोकांची अडवणूक करत असेल तर त्याच्यावर कारवाईचे संकेतही कृषिमंत्री अब्दल सत्तार यांनी दिले आहे. तीन दिवस अधिवेशनाला सुट्टी असल्याने या तीन दिवसात तीन विभाग आणि सात जिल्ह्यांचा दौरा करत आहे. हवालदिल शेतकर्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांची अडचणी समजत आहे. सोमवारी यासंदर्भात मुख्यमंत्री यांना अहवाल सादर करत लवकरात लवकर शेतकर्यांच्या खात्यात पैसे कसे जाईल, यासाठी प्रयत्नरत असल्याचेही राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.
हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion महाराष्ट्रात सोडून या राज्यातील मंत्रिमंडळात महिला स्थान नाही