ETV Bharat / state

लोकांची काम करणे हाच मनसेचा अजेंडा - शर्मिला ठाकरे

author img

By

Published : Jan 31, 2021, 7:19 PM IST

Updated : Jan 31, 2021, 7:28 PM IST

मनसैनिक हा कायम काम करत असतो. त्यामुळे लोकांचा मनसेवर प्रचंड विश्वास आहे. कोरोना काळात जनता सत्ताधारी पक्षाकडे न जाता मनसेच्या ज्या शाखा होत्या तिथे जात होते. लोकांची कामे करणे हाच आमचा अजेंडा आहे. मनसे उगीचच आश्वासने देत नाही, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

agenda of MNS
agenda of MNS

नवी मुंबई - नवी मुंबईमध्ये तीन मनसे शाखांचा उदघाटन साेहळा आज पार पडला. हे कार्यक्रम शर्मिला ठाकरे, आमदार राजू पाटील आणि मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या हस्ते पार पडले.
कोरोना काळात जनतेला सत्ताधारी पक्षापेक्षा मनसेने लोकांची मदत केली आहे. मनसे करीत असलेल्या कामामुळे लोकांची मनसेकडून प्रचंड अपेक्षा आहे. काम हाच मनसेचा अजेंडा आहे. तसेच मनसेचे उमेदवार नवी मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून येतील, अशी आशा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली.

मनसे नेत्या शर्मिला ठाकरे
कोरोना काळात मनसेकडे जास्त लोकांचा कल-मनसैनिक हा कायम काम करत असतो. त्यामुळे लोकांचा मनसेवर प्रचंड विश्वास आहे. कोरोना काळात जनता सत्ताधारी पक्षाकडे न जाता मनसेच्या ज्या शाखा होत्या तिथे जात होते. कोरोना काळात मनसे इतके काम कोणत्याही पक्षाने केले नसल्याचे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी म्हटले. सत्ता व पैसे नसतानाही मनसेच्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत. लोकांची कामे करणे हाच आमचा अजेंडा आहे. मनसे उगीचच आश्वासने देत नाही, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

नवी मुंबई - नवी मुंबईमध्ये तीन मनसे शाखांचा उदघाटन साेहळा आज पार पडला. हे कार्यक्रम शर्मिला ठाकरे, आमदार राजू पाटील आणि मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या हस्ते पार पडले.
कोरोना काळात जनतेला सत्ताधारी पक्षापेक्षा मनसेने लोकांची मदत केली आहे. मनसे करीत असलेल्या कामामुळे लोकांची मनसेकडून प्रचंड अपेक्षा आहे. काम हाच मनसेचा अजेंडा आहे. तसेच मनसेचे उमेदवार नवी मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून येतील, अशी आशा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली.

मनसे नेत्या शर्मिला ठाकरे
कोरोना काळात मनसेकडे जास्त लोकांचा कल-मनसैनिक हा कायम काम करत असतो. त्यामुळे लोकांचा मनसेवर प्रचंड विश्वास आहे. कोरोना काळात जनता सत्ताधारी पक्षाकडे न जाता मनसेच्या ज्या शाखा होत्या तिथे जात होते. कोरोना काळात मनसे इतके काम कोणत्याही पक्षाने केले नसल्याचे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी म्हटले. सत्ता व पैसे नसतानाही मनसेच्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत. लोकांची कामे करणे हाच आमचा अजेंडा आहे. मनसे उगीचच आश्वासने देत नाही, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
Last Updated : Jan 31, 2021, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.