ETV Bharat / state

सरकारी अनास्थेमुळे धरणांच्या शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई

शहापूर तालुक्यात कोट्यवधीचा निधी पाणीपुरवठा योजनेवर खर्च करूनही अपूर्ण पाणी योजना, योजनेचा अपहार व बोगस कामांमुळे अनेक गावात योजना मिळूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत  आहे.  हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.

author img

By

Published : May 19, 2019, 6:21 PM IST

सरकारी अनस्थेमुळे धरणांच्या शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई  निर्माण झाली आहे.

ठाणे- राज्य शासनाने २००६ पासून शहापूर तालुक्यात मंजूर केलेल्या १९३ नळपाणी पुरवठा योजनांपैकी आजही २७ नळपाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. ३ योजनांमध्ये अपहार झाल्याने त्यांच्या अध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ४ योजना रद्द केल्याची माहिती उघड झाली आहे.

१९३ पैकी ९२ योजनांची कामे अंतिम असून ४९ योजना भौतिक दृष्ट्या पूर्ण तर १४ योजनांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. ४ नळ पाणी योजतील विहिरी कोरड्या आहेत. अशा एकूण १९३ नळपाणी पुरवठा योजनांपैकी १५५ योजना सुरू असून ३३ योजना मार्च अखेर सुरू नव्हत्या. सरकारी अनस्थेमुळेच दरवर्षी धरणांच्या तालुक्याला पाणी टंचाईचा सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे.

योजनांसाठीचे पाईप धूळखात पडलेले आहेत.

राष्ट्रीय पेयजल योजनेतील आदिवासी क्षेत्र, वर्धित वेग, महाजल कार्यक्रम, बिगर आदिवासी क्षेत्रात या नळ आणि पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील पाच शाखा अभियंत्यांमार्फत या योजनांचा कारभार व देखरेख सुरू आहे. या योजनांच्या ट्रेंच गॅलरी, जकवेल विहीर, पंप हाउस, वितरण व्यवस्था, वीज जोडणी, उंच टाकीचे कामे व्यवस्थित झालेले नाही. त्यामुळे योजना असूनही अनेक गावात नळाने पाणी पुरवठा होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

शासनाच्या २९ टँकरने तालुक्यातील २०० हुन अधिक गाव पाड्यात पाणीपुरवठा केला जात आहे. शहापूर तालुक्यात कोट्यवधीचा निधी पाणीपुरवठा योजनेवर खर्च करूनही अपूर्ण पाणी योजना, योजनेचा अपहार व बोगस कामांमुळे अनेक गावात योजना मिळूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ गावकऱयांवर आली आहे.

शहापूर तालुक्यात अनेक लहान मोठी धरणे असूनही धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था होऊन बसली आहे. नळ पाणीपुरवठा योजनां बाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. जेणेकरून आगामी काळात शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई समस्या उदभवणार नसल्याचे मत गावकरी व्यक्त करीत आहेत.

ठाणे- राज्य शासनाने २००६ पासून शहापूर तालुक्यात मंजूर केलेल्या १९३ नळपाणी पुरवठा योजनांपैकी आजही २७ नळपाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. ३ योजनांमध्ये अपहार झाल्याने त्यांच्या अध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ४ योजना रद्द केल्याची माहिती उघड झाली आहे.

१९३ पैकी ९२ योजनांची कामे अंतिम असून ४९ योजना भौतिक दृष्ट्या पूर्ण तर १४ योजनांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. ४ नळ पाणी योजतील विहिरी कोरड्या आहेत. अशा एकूण १९३ नळपाणी पुरवठा योजनांपैकी १५५ योजना सुरू असून ३३ योजना मार्च अखेर सुरू नव्हत्या. सरकारी अनस्थेमुळेच दरवर्षी धरणांच्या तालुक्याला पाणी टंचाईचा सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे.

योजनांसाठीचे पाईप धूळखात पडलेले आहेत.

राष्ट्रीय पेयजल योजनेतील आदिवासी क्षेत्र, वर्धित वेग, महाजल कार्यक्रम, बिगर आदिवासी क्षेत्रात या नळ आणि पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील पाच शाखा अभियंत्यांमार्फत या योजनांचा कारभार व देखरेख सुरू आहे. या योजनांच्या ट्रेंच गॅलरी, जकवेल विहीर, पंप हाउस, वितरण व्यवस्था, वीज जोडणी, उंच टाकीचे कामे व्यवस्थित झालेले नाही. त्यामुळे योजना असूनही अनेक गावात नळाने पाणी पुरवठा होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

शासनाच्या २९ टँकरने तालुक्यातील २०० हुन अधिक गाव पाड्यात पाणीपुरवठा केला जात आहे. शहापूर तालुक्यात कोट्यवधीचा निधी पाणीपुरवठा योजनेवर खर्च करूनही अपूर्ण पाणी योजना, योजनेचा अपहार व बोगस कामांमुळे अनेक गावात योजना मिळूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ गावकऱयांवर आली आहे.

शहापूर तालुक्यात अनेक लहान मोठी धरणे असूनही धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था होऊन बसली आहे. नळ पाणीपुरवठा योजनां बाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. जेणेकरून आगामी काळात शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई समस्या उदभवणार नसल्याचे मत गावकरी व्यक्त करीत आहेत.

सरकारी अनस्थेमुळे धरणांच्या शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई  

ठाणे :-राज्य शासनाने २००६ पासून शहापूर तालुक्यात मंजूर केलेल्या १९३ नळपाणी पुरवठा योजनेपैकी आजही २७ नळपाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. ३ योजनांमध्ये अपहार झाल्याने त्यांच्या अध्यक्षवर गुन्हे दाखल केले. तर ४ योजना रद्द केल्याची माहिती उघड झाली आहे. १९३ पैकी ९२ योजनांची कामे अंतिम असून ४९ योजना भौतिक दृष्टीनेपूर्ण तर १४ योजनामध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. ४ नळ पाणी योजतील विहिरी कोरड्या आहेत. अश्या एकूण १९३ नळपाणी पुरवठा योजनेपैकी १५५ योजना सुरू असून ३३ योजना मार्च अखेर सुरू नव्हत्या. यामुळे सरकारी अनस्थामुळेच दरवर्षीच धरणांच्या तालुक्याला पाणी टंचाईचा सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे.

राष्ट्रीय पेयजल योजनेतील आदिवासी क्षेत्र, वर्धित वेग, महाजल कार्यक्रम, बिगर आदिवासी क्षेत्रात ह्या नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे आणि  पाणी योजनाच्या कमिटीच्या हलगर्जीपणामुळे अनेक योजना रखडून पडल्या आहेत. शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील पाच शाखा अभियंता मार्फत या योजनांचा कारभार व देखरेख सुरू आहे. या योजनांच्या ट्रेंच गॅलरी, जकवेल विहीर, पंप हाउस, वितरण व्यवस्था, वीज जोडणी, उंच टाकीचे कामे व व्यवस्थित न झाल्याने योजना असूनही अनेक गावांत नळ पाणी पुरवठा होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. शहापूर तालुक्यात सद्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे शासनाच्या २९ टँकरने तालुक्यातील २०० हुन अधिक गाव पाड्यात पाणीपुरवठा केला जात आहे. अपुर्ण पाणी योजना, योजनेचा अपहार व बोगस कामामुळे अनेक गावांत योजना मिळूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शासनाने शहापूर तालुक्यात कोट्यावधींचा निधी पाणीपुरवठा योजनेवर खर्च करूनही तालुक्यातील बहुंताश गाव –पाडे भीषण पाणीटंचाईचा सामना करीत पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यातच अनेक लहान मोठी धरणे असूनही धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था शहापूर तालुक्यात दरवर्षीची अवस्था होवून बसली आहे. नळ पाणीपुरवठा योजना बाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. जेणेकरून आगामी काळात शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई समस्या उदभवणार नसल्याचे मत गावकरी व्यक्त करीत आहेत.

 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.