ETV Bharat / state

भिवंडीमध्ये दोन भावांकडून बहिणीच्या प्रियकराची हत्या? पोलिसांनी दाखल केला आत्महत्येस प्रवृत्तचा गुन्हा

भिवंडीतील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध करत 2 भावांनी तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

author img

By

Published : Jun 11, 2019, 5:58 PM IST

भिवंडीमध्ये दोन भावांकडून बहिणीच्या प्रियकराची हत्या? पोलिसांनी दाखल केला आत्महत्येस प्रवृत्तचा गुन्हा

ठाणे - भिवंडीतील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध करत 2 भावांनी तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तसा आरोप मृताच्या आईने पोलीस ठाण्यात केला आहे. मात्र, नारपोली पोलिसांनी दोन भावांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नारपोली पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आप्पा किशोर पाटील (वय 21) असे मृत्त प्रियकराचे नाव आहे.

चंदन उपेंद्र प्रसादगौड (वय 25) आणि कुंदन उपेंद्र प्रसादगौड (वय 25) असे गुन्हा दाखल झालेल्या भावांची नावे आहेत. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खळबळजनक बाब म्हणजे प्रियकराच्या घरात घुसून या दोघांनी त्याला बहिणीबरोबरचे प्रेमसंबंध तोड, नाही तर ठार मारण्याची धमकी दिली होती. यानंतर तासाभरातच प्रियकराचा मृतदेह एका आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आप्पा हा आपली आई सुमनसोबत भिवंडीतील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात राहत होता. तो रंगारी कंत्राटदार होता. त्याचे काही महिन्यांपासून याच परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, प्रेमसंबंधाची कुणकुण तरुणीच्या घरच्यांना लागल्याने त्यांनी विरोध केला. तरीही दोघे लपून-छपून भेटत असल्याची माहिती मुलीच्या भावांना मिळताच त्यांनी 8 जून रोजी सकाळी 6 वाजता आप्पाच्या घरी जाऊन त्याला मोठा वाडा परिसरात आणले. त्यावेळी त्यांनी त्याला बहिणीबरोबर असलेले प्रेमसबंध तोड, नाही तर तुला ठार मारून टाकेन, अशी धमकी दिली.

त्यामुळेच त्याच दिवशी सकाळी साडेसात वाजता नैराश्येतून आप्पाने साठेनगरच्या मागे मोठा वाडामधील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गुन्हा नारपोली पोलिसांनी दाखल केला आहे. तर आप्पाची आई सुमन (वय 45) यांनी मात्र आप्पाची त्या दोन भावांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लोंढे करत आहेत.

ठाणे - भिवंडीतील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध करत 2 भावांनी तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तसा आरोप मृताच्या आईने पोलीस ठाण्यात केला आहे. मात्र, नारपोली पोलिसांनी दोन भावांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नारपोली पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आप्पा किशोर पाटील (वय 21) असे मृत्त प्रियकराचे नाव आहे.

चंदन उपेंद्र प्रसादगौड (वय 25) आणि कुंदन उपेंद्र प्रसादगौड (वय 25) असे गुन्हा दाखल झालेल्या भावांची नावे आहेत. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खळबळजनक बाब म्हणजे प्रियकराच्या घरात घुसून या दोघांनी त्याला बहिणीबरोबरचे प्रेमसंबंध तोड, नाही तर ठार मारण्याची धमकी दिली होती. यानंतर तासाभरातच प्रियकराचा मृतदेह एका आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आप्पा हा आपली आई सुमनसोबत भिवंडीतील अण्णाभाऊ साठेनगर परिसरात राहत होता. तो रंगारी कंत्राटदार होता. त्याचे काही महिन्यांपासून याच परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, प्रेमसंबंधाची कुणकुण तरुणीच्या घरच्यांना लागल्याने त्यांनी विरोध केला. तरीही दोघे लपून-छपून भेटत असल्याची माहिती मुलीच्या भावांना मिळताच त्यांनी 8 जून रोजी सकाळी 6 वाजता आप्पाच्या घरी जाऊन त्याला मोठा वाडा परिसरात आणले. त्यावेळी त्यांनी त्याला बहिणीबरोबर असलेले प्रेमसबंध तोड, नाही तर तुला ठार मारून टाकेन, अशी धमकी दिली.

त्यामुळेच त्याच दिवशी सकाळी साडेसात वाजता नैराश्येतून आप्पाने साठेनगरच्या मागे मोठा वाडामधील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गुन्हा नारपोली पोलिसांनी दाखल केला आहे. तर आप्पाची आई सुमन (वय 45) यांनी मात्र आप्पाची त्या दोन भावांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लोंढे करत आहेत.

Intro:किट नंबर 319
कल्याण


Body:बहिणीच्या प्रियकराची दोघा भावांकडून हत्या ? मात्र पोलिसांनी केला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

ठाणे:- बहिणी सोबत शेजारी राहणाऱ्या तरुणाशी असलेल्या प्रेमसंबंध याला विरोध करीत दोघा भावांनी प्रियकराची हत्या केल्याचा आरोप मृतकाचे आईने केला आहे, मात्र पोलिसांनी या दोघा भावांना वर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याने नारपोली पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे,

खळबळजनक बाब म्हणजे प्रियकराच्या घरात घुसून त्याला बहिणी सोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास ठार मारण्याची धमकी दिली होती, मात्र तासाभरातच यांचा मृतदेह एका आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती, ही धक्कादायक घटना भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात घडली आहे , आप्पा किशोर पाटील वय 21 असे वृत्त प्रियकराचे नाव आहे , तर चंदन उपेंद्र प्रसादगौड 25 आणि कुंदन उपेंद्र प्रसादगौड वय 25 असे गुन्हा दाखल झालेला भावांची नावे असून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे,

मिळालेल्या माहितीनुसार मृत अप्पा हा आपल्या आई सुमन सोबत भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात राहत होता, तो व्यवसाय रंगारी कंत्राटदार होता, काही महिन्यापासून ह्याच परिसरात पाण्याच्या टाकी शेजारी रोहिदास नगर मध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीची प्रेमसंबंध निर्माण झाले होते मात्र या दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण तरुणीच्या घरच्यांना लागल्याने त्यांनी विरोध केला, दोघे लपून-छपून भेटत असल्याची माहिती आरोपी भावांना मिळताच त्यांनी 8 जून रोजी सकाळी सहा वाजता मृतक आप्पाच्या घरी जाऊन त्याला मोठा वाडा परिसरात आणले वहिनीशी असलेले प्रेमसबंध तोड नाही तर तुला ठार मारून टाकेल अशी धमकी दिली, यामुळे त्याच दिवशी सकाळी साडेसात वाजता नैराश्यातून आप्पाने साठे नगरच्या मागे मोठा वाडा मधील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गुन्हा नारपोली पोलिसांनी दाखल केला,

फोटो, मृतक

दरम्यान, मृतकची आई सुमन वय 45 , यांनी मात्र माझ्या मुलाची त्या दोघा भावांनी हत्या केल्याचा आरोप केला आहे, याप्रकरणी चंदन आणि कुंदन या दोघा भावावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, या गुन्ह्याचा अधीक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लोंढे करीत आहेत,


Conclusion:प्रियकराची हत्या की आत्महत्या ? भिवंडीतील प्रकार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.