ETV Bharat / state

मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली उड्डाण पुलावर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम फत्ते

author img

By

Published : Jan 22, 2020, 9:32 AM IST

वाहतूक कोंडीतून वाहन चालक व नागरिकांची सुटका करण्यासाठी कंपनी प्रशासनाने सुरक्षिततेचे मापदंड लक्षात घेऊन अवघ्या दोन महिन्यातच डाव्या मार्गिकेवर ५० मीटर लांब व १७ मीटर रुंदीचे सहा लोखंडी गर्डर टाकण्यात यश मिळवले आहे.येत्या दोन महिन्यात स्लॅबचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने वाहन चालकांसह नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. लोखंडी गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव हे स्वतः घटनास्थळी आले होते.

मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली उड्डाण पुलावर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम पुर्ण
मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली उड्डाण पुलावर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम पुर्ण

ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली बायपास नाका येथील उड्डाणपुलाच्या डाव्या मार्गिकेवर ५० मीटर लांबीचे लोखंडी गर्डर एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे टाकण्यात आले. येत्या दोन महिन्यात या उड्डाण पुलाच्या डाव्या मार्गिकेवरूनही वाहनांची ये-जा सुरू होणार आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली उड्डाण पुलावर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम फत्ते

मुंबई-नाशिक महामार्गावर दररोज जीवघेणी वाहतूककोंडी होत आहे. या वाहतूक कोंडी विरोधात नागरिकांमधून ओरड वाढल्याने राज्य शासनाने एमएमआरडीए प्रशासनाकडून मागील आठ वर्षांपूर्वी भिवंडी तालुक्यातील माणकोली नाका, रांजणोली बायपास नाका आदी ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र येथील दोन्ही बायपास उड्डाण पुलाच्या ठेकेदार कंपनीने हलगर्जीपणा केल्यामुळे उड्डाण पुलाचे बांधकाम रखडले होते. त्याची दखल राज्य सरकारने घेऊन चार महिन्यांपूर्वी नवीन ठेकेदार कंपनी नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एमएमआरडीए प्रशासनाने बांधकाम क्षेत्रातील आर.पी.एस.इन्फ्रा.प्रोजेक्ट प्रा.लि.या बांधकाम कंपनीची नियुक्ती करून सल्लागार म्हणून टेक्नॉजेम कन्सल्टंट यांची नियुक्ती केली आहे. वाहतूक कोंडीतून वाहन चालक व नागरिकांची सुटका करण्यासाठी कंपनी प्रशासनाने सुरक्षिततेचे मापदंड लक्षात घेऊन अवघ्या दोन महिन्यातच डाव्या मार्गिकेवर ५० मीटर लांब व १७ मीटर रुंदीचे सहा लोखंडी गर्डर टाकण्यात यश मिळवले आहे.

हेही वाचा - भिवंडीत अवैध बांधकामांवर एमएमआरडीएचा हातोडा, २४ गोदामे जमीनदोस्त

येत्या दोन महिन्यात स्लॅबचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने वाहन चालकांसह नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. लोखंडी गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी एमएमआरडीए आयुक्त आर.ए.राजीव यांनी स्वतः घटनास्थळी आले होते. याबाबत त्यांनी ठेकेदार गणेश घोलप व अधिकाऱ्यांना कामाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी एमएमआरडीएचे सहआयुक्त बी.जी.पवार ,अधिक्षक अभियंता पी.एस.निमजे,कार्यकारी अभियंता विनय सूर्वे,उपअभियंता अमोल पगारे आदी अधिकारी कामकाजावर देखरेख करीत होते.

ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली बायपास नाका येथील उड्डाणपुलाच्या डाव्या मार्गिकेवर ५० मीटर लांबीचे लोखंडी गर्डर एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे टाकण्यात आले. येत्या दोन महिन्यात या उड्डाण पुलाच्या डाव्या मार्गिकेवरूनही वाहनांची ये-जा सुरू होणार आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली उड्डाण पुलावर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम फत्ते

मुंबई-नाशिक महामार्गावर दररोज जीवघेणी वाहतूककोंडी होत आहे. या वाहतूक कोंडी विरोधात नागरिकांमधून ओरड वाढल्याने राज्य शासनाने एमएमआरडीए प्रशासनाकडून मागील आठ वर्षांपूर्वी भिवंडी तालुक्यातील माणकोली नाका, रांजणोली बायपास नाका आदी ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र येथील दोन्ही बायपास उड्डाण पुलाच्या ठेकेदार कंपनीने हलगर्जीपणा केल्यामुळे उड्डाण पुलाचे बांधकाम रखडले होते. त्याची दखल राज्य सरकारने घेऊन चार महिन्यांपूर्वी नवीन ठेकेदार कंपनी नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एमएमआरडीए प्रशासनाने बांधकाम क्षेत्रातील आर.पी.एस.इन्फ्रा.प्रोजेक्ट प्रा.लि.या बांधकाम कंपनीची नियुक्ती करून सल्लागार म्हणून टेक्नॉजेम कन्सल्टंट यांची नियुक्ती केली आहे. वाहतूक कोंडीतून वाहन चालक व नागरिकांची सुटका करण्यासाठी कंपनी प्रशासनाने सुरक्षिततेचे मापदंड लक्षात घेऊन अवघ्या दोन महिन्यातच डाव्या मार्गिकेवर ५० मीटर लांब व १७ मीटर रुंदीचे सहा लोखंडी गर्डर टाकण्यात यश मिळवले आहे.

हेही वाचा - भिवंडीत अवैध बांधकामांवर एमएमआरडीएचा हातोडा, २४ गोदामे जमीनदोस्त

येत्या दोन महिन्यात स्लॅबचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने वाहन चालकांसह नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. लोखंडी गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी एमएमआरडीए आयुक्त आर.ए.राजीव यांनी स्वतः घटनास्थळी आले होते. याबाबत त्यांनी ठेकेदार गणेश घोलप व अधिकाऱ्यांना कामाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी एमएमआरडीएचे सहआयुक्त बी.जी.पवार ,अधिक्षक अभियंता पी.एस.निमजे,कार्यकारी अभियंता विनय सूर्वे,उपअभियंता अमोल पगारे आदी अधिकारी कामकाजावर देखरेख करीत होते.

Intro:kit 319Body: मुंबई - नाशिक महामार्गावरील माणकोली उड्डाण पुलावर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम फत्ते

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली बायपास नाका येथील उड्डाणपुलाच्या डाव्या मार्गिकेवर ५० मिटर लांबीचे लोखंडी गर्डर एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव ( आयएएस ) यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे टाकण्यात आले. त्यामुळे येत्या दोन महिन्यात या उड्डाण पुलाच्या डाव्या मार्गिकेवरूनही वाहनांची ये-जा सुरू होणार असल्याने रोजच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर दररोज जीवघेणी वाहतूककोंडी होत आहे. या वाहतूक कोंडी विरोधात नागरिकांमधून ओरड वाढल्याने राज्य शासनाने एमएमआरडीए प्रशासनाकडून मागील आठ वर्षांपूर्वी भिवंडी तालुक्यातील माणकोली नाका ,रांजणोली बायपास नाका आदी ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र येथील दोन्हीं बायपास उड्डाण पुलाच्या ठेकेदार कंपनीने हलगर्जीपणा केल्यामुळे उड्डाण पुलाचे बांधकाम रखडले होते याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागल्याने त्याची दखल राज्य शासनाने घेऊन चार महिन्यांपूर्वी नवीन ठेकेदार कंपनी नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एमएमआरडीए प्रशासनाने बांधकाम क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या आर.पी.एस.इन्फ्रा.प्रोजेक्ट प्रा.लि.या बांधकाम कंपनीची नियुक्ती करून सल्लागार म्हणून टेक्नॉजेम कन्सल्टंट यांची नियुक्ती केली आहे.वाहतूक कोंडीतून वाहन चालक व नागरिकांची सुटका करण्यासाठी आर.पी.एस.इन्फ्रा.प्रोजेक्ट प्रा.लि.कंपनी प्रशासनाने सुरक्षिततेचे मापदंड लक्षात घेऊन अवघ्या दोन महिन्यातच डाव्या मार्गिकेवर ५० मिटर लांब व १७ मीटर रुंदीचे सहा लोखंडी गर्डर टाकण्यात यश मिळवले आहे.
येत्या दोन महिन्यात स्लॅबचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने वाहन चालकांसह नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. लोखंडी गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी एमएमआरडीए आयुक्त आर.ए.राजीव यांनी स्वतः घटनास्थळी आले होते. याबाबत त्यांनी ठेकेदार गणेश घोलप व अधिकाऱ्यांना कामाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी एमएमआरडीएचे सहआयुक्त बी.जी.पवार ,अधिक्षक अभियंता पी.एस.निमजे,कार्यकारी अभियंता विनय सूर्वे,उपअभियंता अमोल पगारे आदी अधिकारी कामकाजावर देखरेख करीत होते.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.