ETV Bharat / state

खळबळजनक! शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना काढले वर्गाबाहेर - नारायणा स्कुल वसंत व्हॅली

काल काही विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने वर्गातून बाहेर बोलवून लायब्ररीमध्ये बसवले. याबाबत विद्यार्थ्यांनी सायंकाळी पालकांना सांगितले .घडल्या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला असता, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना न बसू दिल्याचे उत्तर दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना काढले वर्गाबाहेर
author img

By

Published : Nov 8, 2019, 9:30 AM IST

ठाणे - दिवसेंदिवस शिक्षणाचा प्रश्न जटील होत चालला आहे. त्यात पालक आणि विद्यार्थी भरडले जात असून सरकारने मात्र खासगी शाळांच्या फी वाढीस रान मोकळे करून दिल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. कल्याण येथील नारायणा स्कुल मध्ये शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोप पालकवर्गाने केला आहे. या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली आहे.

शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना काढले वर्गाबाहेर

कल्याण पश्चिम वसंत व्हॅली येथील नारायणा शाळेने अचानकपणे फी वाढविल्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. शाळेने केलेली फी वाढ अन्यायकारक असून ती कमी करण्याची मागणी पालक वर्गाने शाळा प्रशासनाकडे केली आहे. त्यातच काल काही विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने वर्गातून बाहेर बोलवून लायब्ररीमध्ये बसवले. याबाबत विद्यार्थ्यांनी सायंकाळी पालकांना सांगितले. घडल्या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला असता, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना न बसू दिल्याचे उत्तर दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

हेही वाचा - सीबीएसईच्या १० वी, १२ वीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ; जाणून घ्या किती भरावी लागणार 'फी'

प्रवेश घेताना, फी 3 वर्षे वाढणार नाही आणि वाढली तरी 5%च्या वर असणार नाही, असे शाळेच्या प्रशासनाने सांगितले होते. असे असताना 40% फी वाढवली गोली आहे. युनिफॉर्म, ट्रान्सपोर्ट, पुस्तके आणि इतर साहित्यातसुद्धा शाळा भरमसाठ लूट करते, असा आरोप पालकांनी केला आहे. याबाबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यात नकार दिला आहे.

ठाणे - दिवसेंदिवस शिक्षणाचा प्रश्न जटील होत चालला आहे. त्यात पालक आणि विद्यार्थी भरडले जात असून सरकारने मात्र खासगी शाळांच्या फी वाढीस रान मोकळे करून दिल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. कल्याण येथील नारायणा स्कुल मध्ये शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोप पालकवर्गाने केला आहे. या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली आहे.

शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना काढले वर्गाबाहेर

कल्याण पश्चिम वसंत व्हॅली येथील नारायणा शाळेने अचानकपणे फी वाढविल्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. शाळेने केलेली फी वाढ अन्यायकारक असून ती कमी करण्याची मागणी पालक वर्गाने शाळा प्रशासनाकडे केली आहे. त्यातच काल काही विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने वर्गातून बाहेर बोलवून लायब्ररीमध्ये बसवले. याबाबत विद्यार्थ्यांनी सायंकाळी पालकांना सांगितले. घडल्या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला असता, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना न बसू दिल्याचे उत्तर दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

हेही वाचा - सीबीएसईच्या १० वी, १२ वीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ; जाणून घ्या किती भरावी लागणार 'फी'

प्रवेश घेताना, फी 3 वर्षे वाढणार नाही आणि वाढली तरी 5%च्या वर असणार नाही, असे शाळेच्या प्रशासनाने सांगितले होते. असे असताना 40% फी वाढवली गोली आहे. युनिफॉर्म, ट्रान्सपोर्ट, पुस्तके आणि इतर साहित्यातसुद्धा शाळा भरमसाठ लूट करते, असा आरोप पालकांनी केला आहे. याबाबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यात नकार दिला आहे.

Intro:kit 319Body:खळबळजनक ! शाळेत फी न भरल्याने विद्यार्थ्यांना काढले वर्गा बाहेर

ठाणे : दिवसेंदिवस शिक्षणाचा प्रश्न हा जटील होत चालला आहे. त्यात पालक आणि विद्यार्थी भरडले जात असून सरकारने मात्र खाजगी शाळाच्या फिवाढीबाबत रान मोकळे दिल्याचे पुन्हा एकदा कल्याण येथील नारायणा स्कुल मध्ये घडलेल्या घटनेवरून दिसून आले. शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना वर्गातुन बाहेर काढल्याचा गंभीर आरोप पालकवर्गाने केल्याने एकच खळबळ उडली आहे.

कल्याण पश्चिम वसंत व्हॅली येथील नारायणा शाळेने अचानकपणे फी वाढविल्यामुळे पालक संतप्त आहेत. शाळेने केलेली फी वाढ अन्यायकारक असून ही फी वाढ कमी करण्याची मागणी पालक वर्गाने शाळा प्रशासनाकडे केली आहे. त्यातच काल काही विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने वर्गातुन बाहेर बोलावून लायब्ररी मध्ये बसवले. याबाबत विद्यार्थ्यांनी सायंकाळी पालकांना सांगितले .घडल्या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला असता फी न भरल्याने विद्यार्थ्यांना न बसू दिल्याचे उत्तर दिल्याचा आरोप पालकांनी केला. तसेच फी 3 वर्ष वाढणार नाही आणि वाढली तरी 5% वर असणार नाही असे प्रवेश घेताना शाळेच्या प्रशासनाने सांगितले असताना 40% फी का वाढवली. युनिफॉर्म, ट्रान्सपोर्ट, पुस्तके आणि इतर साहित्यात सुद्धा शाळा भरमसाठ लूट करते असा आरोप पालकांनी केला आहे .

याबाबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलण्यात नकार दिला. याबाबत पालक नितीन बोरसे यांनी शाळा प्रशासनाने केलेल्या फी वाढीबाबत आमची चर्चा सुरू आहे. त्यातच काल आमच्या पाल्याना क्लासरूम मधून बाहेर काढत लायब्ररी मध्ये बसवण्यात आले .हा एका प्रकारचा मानसिक छळ आहे. सायंकाळी मुलांनी आम्हाला सांगितल्यावर आम्ही शाळा प्रशासनाला जाब विचारला असता त्यांनी फी न भरल्याने बाहेर बसवल्याचे शाळा प्रशासनाने सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

bayet - पालक नितीन बोरसेConclusion:kalyan
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.