ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: मीरा भाईंदरमधील स्टील उद्योगाला कामगार मिळेना; उद्योजक अडचणीत

author img

By

Published : Jun 25, 2020, 5:05 PM IST

मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेही येथील परत गेलेले कामगार पुन्हा कामावर येण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे कारखानदारांनी स्वत:ला जेवढे जमते त्यावरच काम सुरू केले आहे.

steel-industry-in-mira-bhayander-open-but-workers-not-available
मीरा भाईंदरमधील स्टील उद्योगाला कामगार मिळेना

मीरा भाईंदर (ठाणे) - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्र सरकारने देशभरात लाॅकडाऊन लागू केले. त्यामुळे उद्योगधंदे बंद झाल्याने कामगार आपल्या गावी परत गेले आहेत. आता लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देत उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, काम करण्यासाठी कामगारच नाहीत. त्यामुळे उद्योजक अडचणीत सापडले आहेत.

मीरा भाईंदरमधील स्टील उद्योगाला कामगार मिळेना

आशिया खंडातील सर्वांत मोठी स्टील भांड्यांची वसाहत मीरा भाईंदरमध्ये आहे. भाईंदर पूर्व परिसरात रेल्वे फाटकाजवळ पांचाळ औद्योगिक वसाहत, कस्तुरी उद्योग, विकास इंडस्ट्रीज, स्वस्तिक औद्योगिक वसाहत, एम.आय. उद्योग, जय अंबे इंडस्ट्रीज अशा मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. याठीकाणी चमचा, कप, वाटी, ताट, मिक्सरसाठी लागणारी भांड्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. यात साधारण 50 हजार कामगारांना रोजगार मिळतो.

याठीकाणी काम करणारे बहुसंख्य कामगार उत्तरप्रदेश, बिहार, उत्तरांचल, पश्चिम बंगालमधील आहेत. लाॅकडाऊन दरम्यान हे कामगार आपल्या घरी परतले आहेत. आता येथील औद्यागिक वसाहत पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, कामगार घरी गेल्याने येथील कारखानदार अडचणीत सापडले आहेत.

मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेही येथील परत गेलेले कामगार पुन्हा कामावर येण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे कारखानदारांनी स्वत:ला जेवढे जमते त्यावरच काम सुरू केले आहे. मात्र, कामगार येणे कठीण असल्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर संपूर्ण स्टील क्षेत्र कायमचे बंद होईल, अशी प्रतिक्रीया श्रमिक कामगार युनियनचे अध्यक्ष अंकुश मालुसरे यांनी दिली.

मीरा भाईंदर (ठाणे) - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्र सरकारने देशभरात लाॅकडाऊन लागू केले. त्यामुळे उद्योगधंदे बंद झाल्याने कामगार आपल्या गावी परत गेले आहेत. आता लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देत उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, काम करण्यासाठी कामगारच नाहीत. त्यामुळे उद्योजक अडचणीत सापडले आहेत.

मीरा भाईंदरमधील स्टील उद्योगाला कामगार मिळेना

आशिया खंडातील सर्वांत मोठी स्टील भांड्यांची वसाहत मीरा भाईंदरमध्ये आहे. भाईंदर पूर्व परिसरात रेल्वे फाटकाजवळ पांचाळ औद्योगिक वसाहत, कस्तुरी उद्योग, विकास इंडस्ट्रीज, स्वस्तिक औद्योगिक वसाहत, एम.आय. उद्योग, जय अंबे इंडस्ट्रीज अशा मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. याठीकाणी चमचा, कप, वाटी, ताट, मिक्सरसाठी लागणारी भांड्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. यात साधारण 50 हजार कामगारांना रोजगार मिळतो.

याठीकाणी काम करणारे बहुसंख्य कामगार उत्तरप्रदेश, बिहार, उत्तरांचल, पश्चिम बंगालमधील आहेत. लाॅकडाऊन दरम्यान हे कामगार आपल्या घरी परतले आहेत. आता येथील औद्यागिक वसाहत पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, कामगार घरी गेल्याने येथील कारखानदार अडचणीत सापडले आहेत.

मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेही येथील परत गेलेले कामगार पुन्हा कामावर येण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे कारखानदारांनी स्वत:ला जेवढे जमते त्यावरच काम सुरू केले आहे. मात्र, कामगार येणे कठीण असल्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर संपूर्ण स्टील क्षेत्र कायमचे बंद होईल, अशी प्रतिक्रीया श्रमिक कामगार युनियनचे अध्यक्ष अंकुश मालुसरे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.