ETV Bharat / state

ऑनलाईन शिक्षण म्हणजे केवळ धूळफेक, प्रत्यक्ष शिक्षणाची गरज - विवेक पंडित

author img

By

Published : Sep 8, 2020, 7:24 PM IST

Updated : Sep 8, 2020, 9:21 PM IST

ऑनलाईन शिक्षण ही धूळफेक असल्याचे मत राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी व्यक्त केले. ते भिवंडी येथे आयोजित भिवंडी तालुकास्तरीय बैठकीत बोलत होते.

ठाणे
ठाणे

ठाणे - ऑनलाईन शिक्षण हे सर्वदूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही धूळफेक असल्याचे मत राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी व्यक्त केले. ते भिवंडी येथे आयोजित भिवंडी तालुकास्तरीय बैठकीत बोलत होते.

ठाणे

ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यंत पोहचत असते तर अमेरिका या शक्तिशाली राष्ट्राला शाळा सुरू करण्याची गरज भासली नसती, अशी कोपरखळी मारत विवेक पंडित यांनी महसूल, पुरवठा, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल कल्याण, वन या विभागांची झाडाझडती घेतली. आजही पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत तर ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क समस्या असल्याने शासन कितीही म्हणत असले तरीअसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना सकस पौष्टिक आहार पोहचविण्याची जबाबदारी असून कुपोषणाच्या समस्येवर मात करणे गरजेचे आहे. पुरवठा विभागाकडून आदिवासी कुटुंबांपर्यंत शासनाची मोफत व अल्प दरातील धान्य पोहचविण्याची जबाबदारी असून त्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केली.

हेही वाचा - 'महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ फक्त ९ हजार रुग्णांनाच कसा?'

या बैठकीस आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर. एच. किल्लेदार, उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया, तहसीलदार शशिकांत गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

ठाणे - ऑनलाईन शिक्षण हे सर्वदूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही धूळफेक असल्याचे मत राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी व्यक्त केले. ते भिवंडी येथे आयोजित भिवंडी तालुकास्तरीय बैठकीत बोलत होते.

ठाणे

ऑनलाईन शिक्षण सर्वांपर्यंत पोहचत असते तर अमेरिका या शक्तिशाली राष्ट्राला शाळा सुरू करण्याची गरज भासली नसती, अशी कोपरखळी मारत विवेक पंडित यांनी महसूल, पुरवठा, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल कल्याण, वन या विभागांची झाडाझडती घेतली. आजही पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत तर ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क समस्या असल्याने शासन कितीही म्हणत असले तरीअसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना सकस पौष्टिक आहार पोहचविण्याची जबाबदारी असून कुपोषणाच्या समस्येवर मात करणे गरजेचे आहे. पुरवठा विभागाकडून आदिवासी कुटुंबांपर्यंत शासनाची मोफत व अल्प दरातील धान्य पोहचविण्याची जबाबदारी असून त्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केली.

हेही वाचा - 'महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ फक्त ९ हजार रुग्णांनाच कसा?'

या बैठकीस आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर. एच. किल्लेदार, उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया, तहसीलदार शशिकांत गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Last Updated : Sep 8, 2020, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.