ETV Bharat / state

वेठबिगारीच्या पाशातून बंधमुक्तीचा नवा श्वास; श्रमजीवीने सोडवले मोखाड्याचे 7 वेठबिगार

author img

By

Published : Dec 9, 2019, 8:18 AM IST

चंदर, मोतीराम, गणपत आणि राजू (सर्व रा. बोट्याच्या वाडी ता. मोखाडी) या 4 जणांना खरबाव येथील नरेश वैती नावाच्या व्यक्तीने बयाणा देऊन (ऍडव्हान्स) कामासाठी बांधून घेतले होते. गावात काम नसल्याने हतबल झालेले हे मजूरांना नरेश वैतीने नावाच्या त्यांच्या मालकाने जबरदस्तीने बयाणा दिला होता.

shramjivi sanghatana free 7 labours in bhiwandi thane
वेठबिगरीच्या पाशातून बंधमुक्तीचा नवा श्वास

ठाणे - भिवंडी तालुक्यातील खरबाव येथील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेठबिगारी पाशात अडकलेल्या 7 वीटभट्टी मजुरांना मुक्त केले आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मजुरांना भिवंडीच्या तहसीलदारांनी मुक्तीचे दाखले देत पुनर्वसनाबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.

वेठबिगरीच्या पाशातून बंधमुक्तीचा नवा श्वास

चंदर, मोतीराम, गणपत आणि राजू (सर्व रा. बोट्याच्या वाडी ता. मोखाडी) या 4 जणांना खरबाव येथील नरेश वैती नावाच्या व्यक्तीने पैसे देऊन कामासाठी बांधून घेतले होते. गावात काम नसल्याने हतबल झालेले या मजूरांना नरेश वैतीने नावाच्या त्यांच्या मालकाने जबरदस्तीने बयाणा दिला होता. त्यात चंदरला आधी 2 हजार, गणेशोत्सवा दरम्यान, 12 हजार आणि दिवाळीपूर्वी 2 हजार असे एकूण 16 हजार रुपये इतका बयाणा देण्यात आला होता. याचप्रमाणे इतर 3 कुटुंबांना देखील दिले होते. भिवंडीतील घारबाव गावात असलेल्या या 7 वेठबिगारांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुक्त केले आहे. यासंदर्भात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - दिल्ली अग्नितांडव: २८ मृतांची ओळख पटली, इमारतीचा मालक, मॅनेजरही अटकेत

मुक्त करण्यात आलेल्यांची नावे - चंदर बरफ याच्या सह पत्नी शेवंती बरफ, मोतीराम जाधव, काशी मोतीराम जाधव, राजू बुधा वाघ, भरती राजू वाघ आणि प्रकाश गणपत बरफ (सर्व रा. गोमघर बोट्याची वाडी)

सर्व मजुरांना भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी हे सर्व वेठबिगार मुक्त झाल्याचे शाश्वती दिली. तसेच पुनर्वसनाचे दाखले दिले. तर फिर्याद दाखल झाल्यानंतर मजूरांना आपल्या मूळ गावी मोखाड्यात बोट्याची वाडी येथे पोहोचवण्यात आले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस उल्हास भानुशाली, नम्रता भानुशाली, युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद पवार, तालुका सचिव मोतीराम नामकुडा उपस्थित होते.

वीटभट्टी, दगड खदान इत्यादी ठिकाणी कामावर येणाऱ्या मजुरांना 4-5 महिने आधीच बयाना द्यायचा आणि त्यांना बांधील बनवायचे. तसेच मजुरांची इच्छा असो नसो त्याला ठरलेल्या तारखेस घरातून उचलून गाडीत टाकून आणायचे आणि 14- 16 तास थंडी, उन्हाचा विचार न करता राबवून घ्यायचे. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी 1976 साली माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी एक कठोर कायदा केला होता. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा अंमल व्हावा या धर्तीवर "बंधबिगार पद्धत (उच्चाटन) अधिनियम-1976" हा कायदा पारित केला. मात्र, या घटनेमुळे आजही कायद्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.

हेही वाचा - कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर बॅगमध्ये महिलेचे डोके नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

....म्हणून ही बयाणा पद्धतच बंद करा - विवेक पंडित

वीटभट्टी किंवा अन्य मालकांना वाटत असेल आम्ही तर फक्त बयाणा देतो, मग ही कारवाई का? तर कायदाने असे बयाणा देऊन बांधून घेणे गुन्हा आहे. या मुळे आदिवासींना तात्पुरता गरजेचे पैसे मिळतात. मात्र, त्यातून त्यांची गुलामी सुरु होते. म्हणून ही पद्धत बंद करा, असे श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी सांगितले.

तर यापुढे वीटभट्टीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या नियमित भेटी होतील. मजुरांना शक्यतो गावातच रोजगार देण्यात येईल आणि बाहेर काम केले तरी किमान वेतन, त्यांचे हक्क आणि सन्मान, त्यांच्या मुलांचे आरोग्य, शिक्षण, पोटभर अन्न मिळावे, हा आमचा प्राधान्यक्रम असल्याचेही ते म्हणाले आहेत. तसेच जर यानंतरही कुणी मजुरांना गुलाम केले तर गुन्हा दाखल होणार, मग त्यासाठी कुणीही संघटनेला दोष देऊ नये असेही पंडित म्हणाले.

ठाणे - भिवंडी तालुक्यातील खरबाव येथील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेठबिगारी पाशात अडकलेल्या 7 वीटभट्टी मजुरांना मुक्त केले आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मजुरांना भिवंडीच्या तहसीलदारांनी मुक्तीचे दाखले देत पुनर्वसनाबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.

वेठबिगरीच्या पाशातून बंधमुक्तीचा नवा श्वास

चंदर, मोतीराम, गणपत आणि राजू (सर्व रा. बोट्याच्या वाडी ता. मोखाडी) या 4 जणांना खरबाव येथील नरेश वैती नावाच्या व्यक्तीने पैसे देऊन कामासाठी बांधून घेतले होते. गावात काम नसल्याने हतबल झालेले या मजूरांना नरेश वैतीने नावाच्या त्यांच्या मालकाने जबरदस्तीने बयाणा दिला होता. त्यात चंदरला आधी 2 हजार, गणेशोत्सवा दरम्यान, 12 हजार आणि दिवाळीपूर्वी 2 हजार असे एकूण 16 हजार रुपये इतका बयाणा देण्यात आला होता. याचप्रमाणे इतर 3 कुटुंबांना देखील दिले होते. भिवंडीतील घारबाव गावात असलेल्या या 7 वेठबिगारांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुक्त केले आहे. यासंदर्भात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - दिल्ली अग्नितांडव: २८ मृतांची ओळख पटली, इमारतीचा मालक, मॅनेजरही अटकेत

मुक्त करण्यात आलेल्यांची नावे - चंदर बरफ याच्या सह पत्नी शेवंती बरफ, मोतीराम जाधव, काशी मोतीराम जाधव, राजू बुधा वाघ, भरती राजू वाघ आणि प्रकाश गणपत बरफ (सर्व रा. गोमघर बोट्याची वाडी)

सर्व मजुरांना भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी हे सर्व वेठबिगार मुक्त झाल्याचे शाश्वती दिली. तसेच पुनर्वसनाचे दाखले दिले. तर फिर्याद दाखल झाल्यानंतर मजूरांना आपल्या मूळ गावी मोखाड्यात बोट्याची वाडी येथे पोहोचवण्यात आले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस उल्हास भानुशाली, नम्रता भानुशाली, युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद पवार, तालुका सचिव मोतीराम नामकुडा उपस्थित होते.

वीटभट्टी, दगड खदान इत्यादी ठिकाणी कामावर येणाऱ्या मजुरांना 4-5 महिने आधीच बयाना द्यायचा आणि त्यांना बांधील बनवायचे. तसेच मजुरांची इच्छा असो नसो त्याला ठरलेल्या तारखेस घरातून उचलून गाडीत टाकून आणायचे आणि 14- 16 तास थंडी, उन्हाचा विचार न करता राबवून घ्यायचे. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी 1976 साली माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी एक कठोर कायदा केला होता. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा अंमल व्हावा या धर्तीवर "बंधबिगार पद्धत (उच्चाटन) अधिनियम-1976" हा कायदा पारित केला. मात्र, या घटनेमुळे आजही कायद्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.

हेही वाचा - कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर बॅगमध्ये महिलेचे डोके नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

....म्हणून ही बयाणा पद्धतच बंद करा - विवेक पंडित

वीटभट्टी किंवा अन्य मालकांना वाटत असेल आम्ही तर फक्त बयाणा देतो, मग ही कारवाई का? तर कायदाने असे बयाणा देऊन बांधून घेणे गुन्हा आहे. या मुळे आदिवासींना तात्पुरता गरजेचे पैसे मिळतात. मात्र, त्यातून त्यांची गुलामी सुरु होते. म्हणून ही पद्धत बंद करा, असे श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी सांगितले.

तर यापुढे वीटभट्टीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या नियमित भेटी होतील. मजुरांना शक्यतो गावातच रोजगार देण्यात येईल आणि बाहेर काम केले तरी किमान वेतन, त्यांचे हक्क आणि सन्मान, त्यांच्या मुलांचे आरोग्य, शिक्षण, पोटभर अन्न मिळावे, हा आमचा प्राधान्यक्रम असल्याचेही ते म्हणाले आहेत. तसेच जर यानंतरही कुणी मजुरांना गुलाम केले तर गुन्हा दाखल होणार, मग त्यासाठी कुणीही संघटनेला दोष देऊ नये असेही पंडित म्हणाले.

Intro:kit 319Body:वेठबिगरीच्या पाशातून बंधमुक्तीचा नवा श्वास; श्रमजीवीने भिवंडीतून सोडवले मोखाड्याचे 7 वेठबिगार

ठाणे : भिवंडी तालुक्यातील खरबाव येथील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेठबिगारी पाशात अडकलेल्या 7 वीटभट्टी मजुरांना मुक्त केले. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात बंधबिगारी उच्चाटन अधिनिय 1076 आणि अट्रोसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या मजुरांना भिवंडी तहसीलदारांनी मुक्तीचे दाखले देत पुनर्वसनाबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.
1976 साली स्व इंदिरा गांधी यांनी एक कठोर कायदा केला, राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा अंमल व्हावा या धर्तीवर असें कायदे बनविण्यात आले, त्यातीलच एक कायदा म्हणजे "बंधबिगार पद्धत (उच्चाटन) अधिनियम-1976". हा कायदा पारित तर झालेला, मात्र अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. मात्र वीटभट्टी, दगड खदान इत्यादी ठिकाणी कामावर येणाऱ्या मजुरांना 4 -5 महिने आधीच बयाना द्यायचा आणि त्यांना बांधील बनवायचे, मग मजुरांची इच्छा असो नसो त्याला ठरलेल्या तारखेस घरातून उचलून गाडीत टाकून आणायचे आणि 14- 16 तास थंडी,उन्हाचा विचार न करता राबवून घ्यायचे. ही पद्धत सुरू असल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे.
मोखाडा बोट्याच्या वाडीतील येथील. चंदर, मोतीराम, गणपत आणि राजू यांच्या चार कुटुंबाना खरबाव येथील मालक नरेश वैती याने बयाणा देऊन (ऍडव्हान्स) कामासाठी बांधून घेतले होते. गावात काम नसल्याने हतबल झालेले हे मजूर शेठ आला की बयाणा घेतातच, नाही घेतले तरी शेठ जबरदस्ती करतो, चंदर ला आधी दोन हजार , गणपती दरम्यान 12 हजार आणि दिवाळीपूर्वी दोन हजार असे एकूण 16 हजार रुपये बयाणा देऊन गेला होता, असेच इतर तीन कुटुंबाना देखील दिले होते. चंदर बरफ याच्या सह पत्नी शेवंती चंदर बरफ, मोतीराम जाधव, काशी मोतीराम जाधव, राजू बुधा वाघ, भरती राजू वाघ आणि प्रकाश गणपत बरफ असे गोमघर बोट्याची वाडी या गावचे रहिवासी आणि भिवंडीतील खारबाव गावात मालकाकडे असेलेले सात वेठबिगार मुक्त करण्यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा बंधबिगार पध्दती (उच्चाटन) अधिनियम 1976 च्या कलम 15,16,17 आणि 18 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3 (1) (H) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस उल्हास भानुशाली, नम्रता भानुशाली, युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद पवार, तालुका सचिव मोतीराम नामकुडा यांच्या समक्ष सर्व मजुरांना भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी ते मुक्त झाल्याची शाश्वती देत मुक्ती आणि पुनर्वसनाचे दाखले प्रदान केले. फिर्याद दाखल झाल्यानंतर मजूरांना रात्री उशिरा आपल्या मूळ गावी मोखाड्यात बोट्याची वाडी येथे सुखरूप पोहचविण्यात आले.

म्हणून ही बयाणा पद्धतच बंद करा .. विवेक पंडित
वीटभट्टी किंवा अन्य मालकांना वाटत असेल आम्ही तर फक्त बयाणा देतो, मग ही कारवाई का? तर कायदाने असे बायणा देऊन बांधून घेणे गुन्हा आहे, या बायणा मुळे आदिवासींना तात्पुरता गरजेचे पैसे तर मिळतात मात्र त्यातून त्यांची गुलामी सुरु होते असे विवेक पंडित यांनी सांगितले. आमचे मालकांशी काहीही वैर नाही, मात्र आदिवासी मजुरांना गुलामगीरीमध्ये ढकलणे आम्ही उघड्या डोळ्याने नाही पाहू शकणार, त्याविरुद्ध कारवाई होणारच, यापुढे जो बयाना देऊन असे मजूर गुलाम करील त्याला तुरुंगात जावेच लागेल, म्हणून ही बयाणा पद्धतच बंद करा असे आवाहन पंडित यांनी केले,

यापुढे वीटभट्टीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या नियमित भेटी होतील, मजुरांना शक्यतो गावातच रोजगार आणि बाहेर काम केले तरी किमान वेतन, त्यांचे हक्क आणि सन्मान ,त्यांच्या मुलांचे आरोग्य, शिक्षण ,पोटभर अन्न मिळावे हा आमचा प्राधान्यक्रम असेल असेह त्यांनी सांगितले. जर यानंतरही कुणी असे करत मजुरांना गुलाम केले तर गुन्हा दाखल होणारच, मग त्यासाठी कुणीही संघटनेला दोष देऊ नये असेही पंडित म्हणाले.




Conclusion:bhiwnadi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.