ETV Bharat / state

माझ्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे प्रकाश आंबेडकरांना भीमा कोरेगाव आंदोलनात यश मिळाले - रामदास आठवले - Bhima koregaon agitation latest update

भीमा कोरेगाव प्रकरणात माझ्या गटाच्या 80 टक्के कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यानेच हे आंदोलन प्रकाश आंबेडकर यांना यशस्वी करण्यात सफलता मिळाली से खळबळजनक वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीने मते खाण्याचे राजकारण करण्यापेक्षा आपल्यासारखे सत्तेत सहभागी होऊन वंचितांचा विकास करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
author img

By

Published : Oct 17, 2019, 4:00 AM IST

Updated : Oct 17, 2019, 6:46 AM IST

ठाणे - भीमा कोरेगाव प्रकरणात माझ्या गटाच्या 80 टक्के कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यानेच हे आंदोलन प्रकाश आंबेडकर यांना यशस्वी करण्यात सफलता मिळाली. त्यामुळेच गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोठ्या प्रमाणात मते मिळवली, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या कल्याण येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

आठवले पुढे म्हणाले की, "मी केंद्रात मंत्री असल्याने भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात मला सहभागी होता आले नव्हते. मात्र, मी माझ्या कार्यकर्त्यांना सहभागी व्हायला सांगितल्याने भीमा कोरेगाव आंदोलन यशस्वी झाले. आजही आपण रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्नशील असून प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व मला मान्य आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, तसा मीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही"

हेही वाचा - मोदी हे आंतरराष्ट्रीय पंतप्रधान; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

वंचित बहुजन आघाडीने मते खाण्याचे राजकारण करण्यापेक्षा आपल्यासारखे सत्तेत सहभागी होऊन वंचितांचा विकास करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.

ठाणे - भीमा कोरेगाव प्रकरणात माझ्या गटाच्या 80 टक्के कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यानेच हे आंदोलन प्रकाश आंबेडकर यांना यशस्वी करण्यात सफलता मिळाली. त्यामुळेच गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोठ्या प्रमाणात मते मिळवली, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या कल्याण येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

आठवले पुढे म्हणाले की, "मी केंद्रात मंत्री असल्याने भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात मला सहभागी होता आले नव्हते. मात्र, मी माझ्या कार्यकर्त्यांना सहभागी व्हायला सांगितल्याने भीमा कोरेगाव आंदोलन यशस्वी झाले. आजही आपण रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्नशील असून प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व मला मान्य आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, तसा मीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही"

हेही वाचा - मोदी हे आंतरराष्ट्रीय पंतप्रधान; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

वंचित बहुजन आघाडीने मते खाण्याचे राजकारण करण्यापेक्षा आपल्यासारखे सत्तेत सहभागी होऊन वंचितांचा विकास करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.

Intro:kit 319


Body:भीमा कोरेगाव प्रकरणात माझ्या गटाच्या 80% कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे प्रकाश आंबेडकरांना आंदोलनात यश ,,, रामदास आठवले

ठाणे : भीमा कोरेगाव प्रकरणात माझ्या गटाच्या 80 टक्के कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यानेच हे आंदोलन बाळासाहेब आंबेडकर यांना यशस्वी करण्यात सफलता मिळाली. त्यामुळेच गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोठ्या प्रमाणात मते मिळवण्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याणात केले,

कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले कल्याण पूर्व आले होते, त्यावेळी दादासाहेब गायकवाड क्रीडांगणा वरील जाहीर सभेत त्यांनी वक्तव्य करून खळबळ उडवून दिली,
केंद्रीय राज्यमंत्री आठवले पुढे म्हणाले की, मी केंद्रात मंत्री असल्याने भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात सहभागी मला होता आले नाही, मात्र माझ्या कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे सांगितल्याने भीमा कोरेगाव आंदोलन यशस्वी झाले,
आजही आपण रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्नशील असून बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व आपल्याला मान्य आहे, मात्र प्रकाश आंबेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, तसा मीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. वंचित आघाडी ला जेवढे लोकसभेमध्ये मते मिळाली तेवढेच मते यापुढेही मिळणार आहे औरंगाबादचा खासदार हा जरी वंचित च्या पाठिंब्यावर निवडून आला तरी मात्र महाराष्ट्रात वंचित ला यश मिळाला नाही त्यामुळे वंचित आघाडीला मतं खाण्याचे राजकारणापेक्षा माझ्यासारखे सत्तेत सहभागी होऊन वंचिताचा विकास करावा असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाषणात बोलून प्रकाश आंबेडकर यांना सत्तेत सहभागी होण्याचा सल्ला दिला,


Conclusion:रामदास आठवले
Last Updated : Oct 17, 2019, 6:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.