ETV Bharat / state

कुणबी सेनेच्या प्रमुख कार्यकत्यांचा कल वंचित आघाडीकडे ,भिवंडीत रंगणार तिरंगी सामना

काँग्रेसने कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांना भिवंडीची उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

author img

By

Published : Apr 2, 2019, 10:41 PM IST

Updated : Apr 3, 2019, 12:18 AM IST

कुणबी सेनेचा मेळावा

ठाणे - काँग्रेसकडून कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांना भिवंडी लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे भिवंडी, शहापूर येथे झालेल्या कुणबी सेनेच्या मेळाव्यात पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा सूर कार्यकर्त्यांनी लावला आहे.

कुणबी सेनेचा मेळावा

शहापूरमधील आज कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो कुणबी समर्थकांनी काँग्रेसविरोधात रोष व्यक्त केला. तर दुसरीकडे भिवंडी, शहापूर येथे झालेल्या कुणबी सेनेच्या मेळाव्यात अजूनही वेळ गेलेली नाही पाटलांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र, भिवंडी लोकसभा मतदारसंघात या आधीच वंचित बहुजन आघाडीने डॉ. अरुण सावंत, हे कुणबी समाजाचे उमेदवार मैदानात उतरवले आहे. यामुळे भिवंडी लोकसभेत ३७ टक्के असलेल्या कुणबी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा सर्वाधिक फायदा वंचित आघाडीला होणार आहे. यामुळे भिवंडी मतदार संघात काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडी, अशी तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे

काँग्रेसने २००९ चे विद्यमान खासदार सुरेश टावरे यांचे तिकीट कापून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे मोदी लाटेतही त्यांनी ३ लाखांच्यावर मते मिळाली. मात्र, यावेळी काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले आणि २००९ मध्ये निवडून आलेले माजी खासदार टावरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर पाटील काँग्रेसवर आगपाखड करत कुणबी सेनेचे ठिक-ठिकाणी मेळावे आयोजित करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहेत.

भिवंडी, वाडा, शहापूर, मुरबाड तालुक्यात लाखोंच्या संख्येने कुणबी समाजाची मते आहेत, गेल्या महिन्याभरापासून पाटील साहेबांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल. या आशेवर कुणबी सेनेमधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते होते. मात्र, टावरे यांना तिकीट जाहीर झाल्याने कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांचा कल वंचित बहुजन आघाडीकडे असल्याचे समोर आले आहे.

ठाणे - काँग्रेसकडून कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांना भिवंडी लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे भिवंडी, शहापूर येथे झालेल्या कुणबी सेनेच्या मेळाव्यात पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा सूर कार्यकर्त्यांनी लावला आहे.

कुणबी सेनेचा मेळावा

शहापूरमधील आज कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो कुणबी समर्थकांनी काँग्रेसविरोधात रोष व्यक्त केला. तर दुसरीकडे भिवंडी, शहापूर येथे झालेल्या कुणबी सेनेच्या मेळाव्यात अजूनही वेळ गेलेली नाही पाटलांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र, भिवंडी लोकसभा मतदारसंघात या आधीच वंचित बहुजन आघाडीने डॉ. अरुण सावंत, हे कुणबी समाजाचे उमेदवार मैदानात उतरवले आहे. यामुळे भिवंडी लोकसभेत ३७ टक्के असलेल्या कुणबी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा सर्वाधिक फायदा वंचित आघाडीला होणार आहे. यामुळे भिवंडी मतदार संघात काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडी, अशी तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे

काँग्रेसने २००९ चे विद्यमान खासदार सुरेश टावरे यांचे तिकीट कापून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे मोदी लाटेतही त्यांनी ३ लाखांच्यावर मते मिळाली. मात्र, यावेळी काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले आणि २००९ मध्ये निवडून आलेले माजी खासदार टावरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यानंतर पाटील काँग्रेसवर आगपाखड करत कुणबी सेनेचे ठिक-ठिकाणी मेळावे आयोजित करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहेत.

भिवंडी, वाडा, शहापूर, मुरबाड तालुक्यात लाखोंच्या संख्येने कुणबी समाजाची मते आहेत, गेल्या महिन्याभरापासून पाटील साहेबांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल. या आशेवर कुणबी सेनेमधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते होते. मात्र, टावरे यांना तिकीट जाहीर झाल्याने कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांचा कल वंचित बहुजन आघाडीकडे असल्याचे समोर आले आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण


Body:कुणबी सेनेचे प्रमुख कार्यकर्त्यांचा कल वंचित आघाडीकडे, भिवंडीत रंगणार तिरंगी सामना

ठाणे :- कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली आहे यामुळे शहापूरमधील आयोजित केलेल्या मेळाव्यात हजारो कुणबी समर्थकांनी काँग्रेसविरोधात रोष व्यक्त केला, तर दुसरीकडे भिवंडी, शहापूर या ठिकाणी झालेल्या कुणबी सेनेच्या मेळाव्यात आता ही वेळ गेलेली नाही पाटील साहेबांनी वंचित बहुजन आघाडी कडून लोकसभेची निवडणूक लढवावी असा सूर कार्यकर्त्यांनी मेळाव्यात लावला आहे

मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वात आधी वंचित बहुजन आघाडी डॉक्टर अरुण सावंत हे कुणबी समाजाचे उमेदवार मैदानात उतरवले आहे यामुळे भिवंडी लोकसभेत 37 टक्के असलेल्या कुणबी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा सर्वाधिक फायदा वंचित दगडाला होणार असल्याचे दिसून येत आहे यामुळे भिवंडी मतदार संघात काँग्रेस, भाजप व वंचित आघाडी अशी तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे

काँग्रेसने 2009 चे विद्यमान खासदार सुरेश टावरे यांचे तिकीट कापून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली होती विशेष म्हणजे मोदी लाटेतही त्यांनी तीन लाखांच्या वर मतांचा आकडा कुणबी व मुस्लिम मतांच्या आधारे पार केला होता मात्र यंदाच्या लोकसभेचे तिकीट पाटील यांना नाकारल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे त्यांच्या जागी पुन्हा 2009 मध्ये निवडून आलेले माजी खासदार टावर यांना उमेदवारी जाहीर केली तेव्हापासूनच पाटील यांनी काँग्रेसवर आगपाखड करीत कुणबी सेनेचे ठिकाणी मेळावे आयोजित करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहे,
दरम्यान भिवंडी , वाडा , शहापूर , मुरबाड तालुक्यात लाखोंच्या संख्येने कुणबी समाजाची मते आहेत , गेल्या महिन्याभरापासून पाटील साहेबांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल या आशेवर कुणबी सेना मधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते होते मात्र टावरे यांना तिकीट जाहीर झाल्याने कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांचा कल वंचित बहुजन आघाडी कडे असल्याचे समोर आले आहे


Conclusion:कुनबी सेना
मेळावा
Last Updated : Apr 3, 2019, 12:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.