ETV Bharat / state

गांधी घराण्याची सुरक्षा काढणे, हा काळा दिवस - जितेंद्र आव्हाड

author img

By

Published : Nov 8, 2019, 9:14 PM IST

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष व खासदार राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारकडून कपात करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे सुडाचे राजकारण असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड

ठाणे - या देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी बलिदान देणार्‍या गांधी घराण्याची एसपीजी सुरक्षा काढण्यात आली आहे. सूड उगवण्यासाठी मोदी-शाह हे असे सुडाचे राजकारण करत आहेत. मात्र, सुडाच्या राजकारणाचा अंत हा नेहमीच वाईट असतो, हा जगाचा इतिहास सत्ताधार्‍यांनी तपासून पहावा. गांधी घराण्याची सुरक्षा काढणे, हा काळा दिवस, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी नेते

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष व खासदार राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारकडून कपात करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे सुडाचे राजकारण असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - नायलॉनच्या मांजात अडकून घुबड जखमी; मांजावर बंदी घालण्याची पक्षीप्रेमींची मागणी

या देशाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस आहे. ज्या सोनिया गांधींनी आपल्या सासूचे पार्थिव आपल्या मांडीवर घेतले. 46 गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या होत्या. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. तेव्हा राहुल आणि प्रियंका लहान होते. 6 वर्षानंतर आपल्या वडिलांचे छिन्न-विच्छीन्न चेहराही ते बघू शकले नाहीत. पतीच्या पार्थिवाचे दर्शनही सोनियांना झालं नाही. राजीव गांधी यांची एवढी निघृणपणे हत्या झाली होती. देशाच्या एकात्मतेसाठी गांधी घराण्याने 2 बलिदान दिली आहेत. त्याच गांधी घराण्याचे सुरक्षा कवच काढणे, हा निव्वळ माणुसकीला अपमानित करणारा संदेश आहे, असे आव्हाड म्हणाले.

हेही वाचा - ठाण्यात भररस्त्यावर टोळक्याच्या हल्ल्यात ४ जण जखमी

राजकारणात माणुसकी असावी, मानवी धर्म पाळला जावा. हे साधारण संकेत आहेत. पण, ज्या पद्धतीने भाजप आणि संघ वागते आहे. त्याकडे पाहिल्यावर हे संस्कार आणि संस्कृती नव्हे. अटल वाजपेयी जेव्हा आजारी पडले तेव्हा पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी अटल बिहारी यांची भेट घेऊन त्यांना मामा असे संबोधत संसदीय समितीचे प्रमुख बनविले अन् त्यांना अमेरिकेत पाठवून त्यांच्यावर उपचार करुन घेतले. ही संस्कृती ज्या घराण्याने रुजवली, पाळली. विद्वेष असला तरी मतमतांतरे बाजूला ठेवली. सुसंवाद कायम ठेवला. त्या भारताच्या राजकारणामध्ये इतका टोकाचा विद्वेष आणणे चांगले नाही. सुडाचे राजकारण अंतापर्यंत घेऊन जातो. अन्ं हा अंत चांगला नसतो, अशीही टीका आव्हाड यांनी केली आहे.

ठाणे - या देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी बलिदान देणार्‍या गांधी घराण्याची एसपीजी सुरक्षा काढण्यात आली आहे. सूड उगवण्यासाठी मोदी-शाह हे असे सुडाचे राजकारण करत आहेत. मात्र, सुडाच्या राजकारणाचा अंत हा नेहमीच वाईट असतो, हा जगाचा इतिहास सत्ताधार्‍यांनी तपासून पहावा. गांधी घराण्याची सुरक्षा काढणे, हा काळा दिवस, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी नेते

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष व खासदार राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारकडून कपात करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे सुडाचे राजकारण असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - नायलॉनच्या मांजात अडकून घुबड जखमी; मांजावर बंदी घालण्याची पक्षीप्रेमींची मागणी

या देशाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस आहे. ज्या सोनिया गांधींनी आपल्या सासूचे पार्थिव आपल्या मांडीवर घेतले. 46 गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या होत्या. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. तेव्हा राहुल आणि प्रियंका लहान होते. 6 वर्षानंतर आपल्या वडिलांचे छिन्न-विच्छीन्न चेहराही ते बघू शकले नाहीत. पतीच्या पार्थिवाचे दर्शनही सोनियांना झालं नाही. राजीव गांधी यांची एवढी निघृणपणे हत्या झाली होती. देशाच्या एकात्मतेसाठी गांधी घराण्याने 2 बलिदान दिली आहेत. त्याच गांधी घराण्याचे सुरक्षा कवच काढणे, हा निव्वळ माणुसकीला अपमानित करणारा संदेश आहे, असे आव्हाड म्हणाले.

हेही वाचा - ठाण्यात भररस्त्यावर टोळक्याच्या हल्ल्यात ४ जण जखमी

राजकारणात माणुसकी असावी, मानवी धर्म पाळला जावा. हे साधारण संकेत आहेत. पण, ज्या पद्धतीने भाजप आणि संघ वागते आहे. त्याकडे पाहिल्यावर हे संस्कार आणि संस्कृती नव्हे. अटल वाजपेयी जेव्हा आजारी पडले तेव्हा पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी अटल बिहारी यांची भेट घेऊन त्यांना मामा असे संबोधत संसदीय समितीचे प्रमुख बनविले अन् त्यांना अमेरिकेत पाठवून त्यांच्यावर उपचार करुन घेतले. ही संस्कृती ज्या घराण्याने रुजवली, पाळली. विद्वेष असला तरी मतमतांतरे बाजूला ठेवली. सुसंवाद कायम ठेवला. त्या भारताच्या राजकारणामध्ये इतका टोकाचा विद्वेष आणणे चांगले नाही. सुडाचे राजकारण अंतापर्यंत घेऊन जातो. अन्ं हा अंत चांगला नसतो, अशीही टीका आव्हाड यांनी केली आहे.

Intro:गांधी घराण्याची सुरक्षा काढणे, हा काळा दिवस- आ. आव्हाड Body:
या देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी बलिदान देणार्‍या गांधी घराण्याची एसपीजी सुरक्षा काढण्यात आली आहे. सूड उगवण्यासाठी मोदी- शहा हे असे सुडाचे राजकारण करीत आहेत. मात्र, सुडाच्या राजकारणाचा अंत हा नेहमीच वाईट असतो, हा जगाचा इतिहास सत्ताधार्‍यांनी तपासून पहावा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी यांनी केली आहे.
काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष व खासदार राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारकडून कपात करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे सुडाचे राजकारण असल्याचे आ. आव्हाड यांनी म्हटले आहे.
या देशाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस आहे. ज्या सोनिया गांधींनी आपल्या सासूचे पार्थिव आपल्या मांडीवर घेतले. 46 गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या होत्या. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. तेव्हा राहुल आणि प्रियांका लहान होते. सहा वर्षानंतर आपल्या वडिलांचे छिन्न-विच्छीन्न चेहराही ते बघू शकले नाहीत. पतीच्या पार्थिवाचे दर्शनही सोनियांना झालं नाही. राजीव गांधी यांची एवढी निघृणपणे हत्या झाली होती. देशाच्या एकात्मतेसाठी गांधी घराण्याने दोन बलिदान दिली आहेत. त्याच गांधी घराण्याचे सुरक्षा कवच काढणे, हा निव्वळ माणुसकीला अपमानित करणारा संदेश आहे. राजकारणात माणुसकी असावी, मानवी धर्म पाळला जावा; हे साधारण संकेत आहेत. पण, ज्या पद्धतीने भाजप आणि संघ वागतंय त्याकडे पाहिल्यावर हे संस्कार आणि संस्कृती नव्हे. अटल वाजपेयी जेव्हा आजारी पडले तेव्हा पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी अटल बिहारी यांची भेट घेऊन त्यांना मामा असे संबोधत संसदीय समितीचे प्रमुख बनविले अन् त्यांना अमेरिकेत पाठवून त्यांच्यावर उपचार करुन घेतले. ही संस्कृती ज्या घराण्याने रुजवली, पाळली; विद्वेष असला तरी मतमतांतरे बाजूला ठेवली. सुसंवाद कायम ठेवला. त्या भारताच्या राजकारणामध्ये इतका टोकाचा विद्वेष आणणे चांगले नाही. सुडाचे राजकारण अंतापर्यंत घेऊन जातो; अन् हा अंत चांगला नसतो. अशी टीका आ. आव्हाड यांनी केली आहे.
Byte जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.