ETV Bharat / state

भिवंडीत अवैध बांधकामांवर एमएमआरडीएचा हातोडा, २४ गोदामे जमीनदोस्त

मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडी तालुक्यातील वाणिज्यिक आणि रहिवाशी, अशी दीड लाख बांधकामे बेकायदेशीर ठरवली आहेत. या बांधकामांवर १५ फेब्रुवारीपर्यंत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार महसूल, पालिका आणि एमएमआरडीए प्रशासनाने तोडकाम कारवाई हाती घेतली आहे.

author img

By

Published : Jan 21, 2020, 9:56 PM IST

warehouse
२४ गोदामे जमीनदोस्त

ठाणे - भिवंडी तालुक्यातील ओवळी येथील पारसनाथ कंपाऊंडमधील २४ अवैध गोदामांचे बांधकाम सोमवारी पाडण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरडीए प्रशासनाने ही कारवाई केली. या तोडकामामुळे स्थानिक शेतकरी आणि गोदाम मालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

भिवंडीत अवैध बांधकामांवर एमएमआरडीएचा हातोडा, २४ गोदामे जमीनदोस्त

हेही वाचा - नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे, 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडी तालुक्यातील वाणिज्यिक आणि रहिवाशी, अशी दीड लाख बांधकामे बेकायदेशीर ठरवली आहेत. या बांधकामांवर १५ फेब्रुवारीपर्यंत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार महसूल, पालिका आणि एमएमआरडीए प्रशासनाने तोडकाम कारवाई हाती घेतली आहे. ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील स.नं. ३५ या जमिनीवर स्थानिक शेतकऱ्यांनी विकासकासोबत करार करून भागीदारीत २४ गोदामे बांधली होती. ही बांधकामे करताना शासन परवानगी घेतली नसल्याने बांधकामे तोडण्यात आली आहेत.

हेही वाचा - 'या' कंपनीकडून बँकांची ४ हजार कोटींची फसवणूक; सीबीआयने टाकले छापे

तोडकामाची माहिती मिळताच आमदार शांताराम मोरे, आमदार महेश चौघुले, माजी आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना जिल्हा परिषद गटनेता कुंदन पाटील, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी, हनुमान चौधरी आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी न्यायालयाची बाब असल्याचे सांगून निष्कासन कारवाई पार पाडली. या तोडकामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला होता. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा - अंगणवाडीच्या निकृष्ठ कामामुळे चिमुकल्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ

ठाणे - भिवंडी तालुक्यातील ओवळी येथील पारसनाथ कंपाऊंडमधील २४ अवैध गोदामांचे बांधकाम सोमवारी पाडण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरडीए प्रशासनाने ही कारवाई केली. या तोडकामामुळे स्थानिक शेतकरी आणि गोदाम मालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

भिवंडीत अवैध बांधकामांवर एमएमआरडीएचा हातोडा, २४ गोदामे जमीनदोस्त

हेही वाचा - नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे, 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडी तालुक्यातील वाणिज्यिक आणि रहिवाशी, अशी दीड लाख बांधकामे बेकायदेशीर ठरवली आहेत. या बांधकामांवर १५ फेब्रुवारीपर्यंत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार महसूल, पालिका आणि एमएमआरडीए प्रशासनाने तोडकाम कारवाई हाती घेतली आहे. ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील स.नं. ३५ या जमिनीवर स्थानिक शेतकऱ्यांनी विकासकासोबत करार करून भागीदारीत २४ गोदामे बांधली होती. ही बांधकामे करताना शासन परवानगी घेतली नसल्याने बांधकामे तोडण्यात आली आहेत.

हेही वाचा - 'या' कंपनीकडून बँकांची ४ हजार कोटींची फसवणूक; सीबीआयने टाकले छापे

तोडकामाची माहिती मिळताच आमदार शांताराम मोरे, आमदार महेश चौघुले, माजी आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना जिल्हा परिषद गटनेता कुंदन पाटील, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी, हनुमान चौधरी आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी न्यायालयाची बाब असल्याचे सांगून निष्कासन कारवाई पार पाडली. या तोडकामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला होता. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा - अंगणवाडीच्या निकृष्ठ कामामुळे चिमुकल्यांवर उघड्यावर बसण्याची वेळ

Intro:kit 319Body:भिवंडीत अवैध गोदामांवर एमएमआरडीएचा हातोडा

ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरडीए प्रशासनाने सोमवारी भिवंडी तालुक्यातील ओवळी येथील पारसनाथ कंपाऊंडमधील २४ अवैध गोदाम बांधकामावर दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. या तोडकामामुळे स्थानिक शेतकरी गोदाम धारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुबई उच्च न्यायालयाने भिवंडी तालुक्यातील वाणिज्यीक व रहिवाशी अशी दिड लाख बांधकामे बेकायदेशीर ठरवली आहेत.या बांधकामांवर १५ फेब्रुवारीपर्यंत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.त्यानूसार महसूल ,पालिका व एमएमआरडीए प्रशासनाने तोडकाम कारवाई हाती घेतली आहे. ओवळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स.नं.३५ या जमिनीवर स्थानिक शेतकऱ्यांनी विकासकासोबत करार करून भागीदारीत २४ गोदामांचे बांधकाम केले आहे.मात्र बांधकाम करताना शासन परवानगी घेतली नाही असा ठपका ठेवून बांधकाम तोडण्यात आली आहेत.
ओवळी येथील तोडकामाची माहिती मिळताच आमदार शांताराम मोरे ,आ.महेश चौघुले ,माजी आमदार रुपेश म्हात्रे ,शिवसेना जि.प.गटनेता कुंदन पाटील, भाजप ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी, हनुमान चौधरी आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन एमएमआरडीए अधिकाऱ्यांशी संपर्क करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी न्यायालयाची बाब असल्याचे सांगून निष्कासन कारवाई पार पाडली. तर या तोडकामादरम्यान ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्याने बंदोबस्तावरील पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना शांत करीत सदर ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.