ETV Bharat / state

भाजपच्या 240 पेक्षा जास्त जागा येतील - गिरिश महाजन

author img

By

Published : Sep 17, 2019, 5:53 PM IST

लोकांचा महाजनादेश यात्रेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसादाने 240 जागांच्या आकड्यांचा अंदाज वर्तविला आहे. हा आकडा चुकणार नाही आणि विरोधकांना 40 जागांवरच समाधान मानावे लागेल, असेही महाजन यांनी सांगितले.

गिरिश महाजन

नाशिक - विधानसभा निवडणुकीमध्ये 240 पेक्षा जास्त जागा आमच्या येतील. तसेच विरोधी पक्ष 40 च्या वर जाणार नाही, असे व्यक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची सांगता 18 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे. तर पंतप्रधान मोदी यांची 19 तारखेला सभा होणार आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्याचे नियोजन गिरीश महाजन हे स्वतः करत आहेत. त्यासाठी ते नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तळ ठोकून आहेत.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

लोकांचा महाजनादेश यात्रेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसादाने 240 जागांच्या आकड्यांचा अंदाज वर्तविला आहे. हा आकडा चुकणार नाही आणि विरोधकांना 40 जागांवरचं समाधान मानावे लागेल, असेही महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा - सेनेच्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचे सदस्यत्व रद्द; लाच घेतल्याने कारवाई

  • शरद पवारांनी स्वतःच्या मनाची समजूत घालावी -

शरद पवारांकडे आता स्वतःच्या मनाची समजूत घालण्यापलीकडे काहीही उरलेले नाही. यामुळे त्यांनी तेवढेच काम करून लवकर निवडणुकीच्या तयारीला लागावे. नाही तर आहे तेसुद्धा पक्षात राहणार नाहीत, अशी टीकाही महाजन यांनी केली आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीचा विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार? वाचा पवार काय म्हणाले..

  • पक्षांतर करणाऱ्यांनी पवारांना अंतःकरणात ठेवून आमच्याकडे यावे -

नाशिकमध्ये मेगा भरती होणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, आमच्याकडे उदयनराजे आले यापेक्षा आणखी मोठे कोण ? असा प्रतिप्रश्न महाजन यांनी केला. विरोधकांकडे आता कोणी मोठे उरलेले नाहीत. पक्षांतर करणायांनी पवारांना अंतःकरणात ठेवावे पण आमच्याकडे यावे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

नाशिक - विधानसभा निवडणुकीमध्ये 240 पेक्षा जास्त जागा आमच्या येतील. तसेच विरोधी पक्ष 40 च्या वर जाणार नाही, असे व्यक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची सांगता 18 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे. तर पंतप्रधान मोदी यांची 19 तारखेला सभा होणार आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्याचे नियोजन गिरीश महाजन हे स्वतः करत आहेत. त्यासाठी ते नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून तळ ठोकून आहेत.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

लोकांचा महाजनादेश यात्रेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसादाने 240 जागांच्या आकड्यांचा अंदाज वर्तविला आहे. हा आकडा चुकणार नाही आणि विरोधकांना 40 जागांवरचं समाधान मानावे लागेल, असेही महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा - सेनेच्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचे सदस्यत्व रद्द; लाच घेतल्याने कारवाई

  • शरद पवारांनी स्वतःच्या मनाची समजूत घालावी -

शरद पवारांकडे आता स्वतःच्या मनाची समजूत घालण्यापलीकडे काहीही उरलेले नाही. यामुळे त्यांनी तेवढेच काम करून लवकर निवडणुकीच्या तयारीला लागावे. नाही तर आहे तेसुद्धा पक्षात राहणार नाहीत, अशी टीकाही महाजन यांनी केली आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीचा विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार? वाचा पवार काय म्हणाले..

  • पक्षांतर करणाऱ्यांनी पवारांना अंतःकरणात ठेवून आमच्याकडे यावे -

नाशिकमध्ये मेगा भरती होणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, आमच्याकडे उदयनराजे आले यापेक्षा आणखी मोठे कोण ? असा प्रतिप्रश्न महाजन यांनी केला. विरोधकांकडे आता कोणी मोठे उरलेले नाहीत. पक्षांतर करणायांनी पवारांना अंतःकरणात ठेवावे पण आमच्याकडे यावे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Intro:240 पेक्षा जास्त जागा आमच्या येतील आणि विरोधी पक्ष 40 वर ही जाणार नाही असे व्यक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ह्यानी नाशिक मध्ये केले आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची महाजनादेश यात्रेचा सांगता 18 तारखेला नाशिक मध्ये होणार आहे तर पंतप्रधान मोदी ह्यांची सभा 189 तारखेला होणार आहे . ह्याच तयारी साठी नाशिक जिल्हयामध्ये भाजपा ने कम्बर कसलीय . ह्या दोन्ही दौरायनाचे नियोजन गिरीश महाजन हे स्वतः करत आहे त्यासाठी ते नाशिक मध्ये गेल्या दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत . लोकांचा महाजनादेश यात्रेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या 240 जागांच्या आकड्यांचा अदाज वर्तविला आहे हा आकडा चुकणार नाही आणि विरोधकांना 40 जागांवर च समाधान मानावे लागेलं असे गिरीश महाजन ह्यांनी विश्वास दर्शवलाBody:शरद पवारांकडे आता स्वतःच्या मनाची समजूत
घालण्यापलीकडे काहीही उरलेले नाही. यामुळे त्यांनी तेवढेच काम करून लवकर निवडणुकीच्या तयारीला लागावे. नाही तर आहे तेसुद्धा पक्षात राहणार नाहीत, अशी टीका पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केलीय...Conclusion:नाशिकमध्ये मेगा भरती होणार का असा प्रश्न त्यांना विचारला असता आमच्याकडे उदयनराजे आले यापेक्षा आणखी मोठे कोण आहे असा प्रतिप्रश्न केला. विरोधकांकडे आता कोणी मोठे उरलेले नाही. पक्षांतर करणायांनी पवारांना अंतःकरणात ठेवावे पण आमच्याकडे यावे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगत पवार आता स्वत:च्या मनाची समजूत करून घेत आहेत. यावरच त्यांनी समाधानी राहावे, असा सल्ला पालकमंत्री महाजन यांनी दिला. परंतु,
पक्ष प्रवेश केलेल्या व्यक्तीची त्या ठिकाणी ताकद
असेल तर अशा 15 ते 20 जागांवर बदल होऊ शकतो.आणि ते अपेक्षितही आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.