ETV Bharat / state

बांधकाम विकासकांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात

author img

By

Published : Nov 18, 2019, 9:40 AM IST

शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनींचे खोटे दस्तावेज बनविणे, खोट्या सह्या घेणे, काहींच्या नमूद सर्व्हे नंबरमध्ये परस्पर सर्वच्या सर्व सर्व्हे नंबरचा समावेश करणे असे प्रकार वाढले आहेत.

बांधकाम विकासकांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात

ठाणे- भिवंडी तालुक्यातील शेतजमिनीला सोन्याचा भाव आलेला असताना बांधकाम विकासकांकडून शेतकऱ्यांची, जमीन मालकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या शेतकऱ्यांनी आपली कैफियत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासमोर मांडली. त्यांनी भिवंडी तालुक्यातील पिंपळास येथे येऊन भूमीपुत्र व शेतकरी बचाव संघर्ष समिती पिंपळासच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून न्याय मिळून देण्याचा निर्धार केला आहे.

बांधकाम विकासकांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात

हेही वाचा- ...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार

पिंपळास व आसपासच्या गावामध्ये काही भूमाफिया ठाण मांडून बसले आहेत. शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनींचे खोटे दस्तावेज बनविणे, खोट्या सह्या घेणे, काहींच्या नमूद सर्वे नंबरमध्ये परस्पर सर्वच्या सर्व सर्वे नंबरचा समावेश करणे, मृत व्यक्तींच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तींना उभे करून खोट्या सह्या घेऊन खरेदीखत करणे, गोडाऊनचा ताबा न देणे, शेतकऱ्यांवर पोलिसांकडे खोट्या तक्रारी बिल्डरांकडून दाखल करणे, अशा तक्रारी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे आल्या आहेत. या सर्व प्रकरणांचा कायदेशीर अभ्यास करून योग्य त्या मार्गाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनसेचे अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या बिल्डर्स लॉबीचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे- भिवंडी तालुक्यातील शेतजमिनीला सोन्याचा भाव आलेला असताना बांधकाम विकासकांकडून शेतकऱ्यांची, जमीन मालकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या शेतकऱ्यांनी आपली कैफियत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासमोर मांडली. त्यांनी भिवंडी तालुक्यातील पिंपळास येथे येऊन भूमीपुत्र व शेतकरी बचाव संघर्ष समिती पिंपळासच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून न्याय मिळून देण्याचा निर्धार केला आहे.

बांधकाम विकासकांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात

हेही वाचा- ...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार

पिंपळास व आसपासच्या गावामध्ये काही भूमाफिया ठाण मांडून बसले आहेत. शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनींचे खोटे दस्तावेज बनविणे, खोट्या सह्या घेणे, काहींच्या नमूद सर्वे नंबरमध्ये परस्पर सर्वच्या सर्व सर्वे नंबरचा समावेश करणे, मृत व्यक्तींच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तींना उभे करून खोट्या सह्या घेऊन खरेदीखत करणे, गोडाऊनचा ताबा न देणे, शेतकऱ्यांवर पोलिसांकडे खोट्या तक्रारी बिल्डरांकडून दाखल करणे, अशा तक्रारी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे आल्या आहेत. या सर्व प्रकरणांचा कायदेशीर अभ्यास करून योग्य त्या मार्गाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनसेचे अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या बिल्डर्स लॉबीचे धाबे दणाणले आहेत.

Intro:kit 319Body:बांधकाम विकासकांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी मनसेचे मैदानात

ठाणे : भिवंडी तालुक्यातील शेतजमिनीला सोन्याचा भाव आलेला असताना शेतक-यांची, जमीन मालकांची मोठ्या प्रमाणावर बांधकाम विकासकांकडून फसवणूक होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. या शेतक-यांनी नुकताच आपली कैफियत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांनी भिवंडी तालुक्यातील पिंपळास येथे येऊन भुमिपुत्र व शेतकरी बचाव संघर्ष समिती पिंपळासच्या शेतक-यांशी चर्चा करून न्याय मिळून देण्याचा निर्धार केला आहे.

पिंपळास व आसपासच्या गावामध्ये काही भूमाफिया ठाण मांडून बसले असून शेतकऱ्यांना रगड पैश्याचे अमिश दाखवून त्यांची फसवणूक करून भुमिपुत्रांना भुमिहीन करीत असल्याचे सांगत काही शेतक-यांच्या जमिनींचे खोटे दस्तावेज बनविणे , खोट्या सह्या घेणे, काहींच्या नमूद सर्वे नंबर मध्ये परस्पर सर्वच्या सर्व सर्वे नंबरचा समावेश करणे, मयत व्यक्तींच्या जागेवर दुस-या व्यक्तींना उभे करुन खोट्या सह्या घेऊन खरेदीखत करणे, काहींना गोडाऊनचा ताबा न देणे, शेतक-यांवर पोलिसांकडे खोट्या तक्रारी बिल्डरांकडून दाखल करण्याचे सुरु असल्याच्या तक्रारी मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे केल्या. या सर्व प्रकरणांचा कायदेशीर अभ्यास करून योग्य त्या सनदशीर मार्गाने शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेचे अविनाश जाधव प्रयत्न करणार असल्याने फसवणूक करणाऱ्या बिल्डर्स लॉबीचे धाबे दणाणले आहेत.

Conclusion:mns
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.