ETV Bharat / state

पोलिसांच्या घरांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार - गृहमंत्री एकनाथ शिंदे - गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाणे पोलीस वसाहतीचा पाहणी दौरा केला. यावेळी माध्यमांसोबत बोलताना शिंदे यांनी पोलिसांच्या घरांचे प्रश्न लवकर मार्गी लागणार असल्याचे म्हटले आहे.

eknath shinde
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Dec 16, 2019, 11:28 AM IST

ठाणे - गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरासह जिल्ह्यातील पोलीस वसाहतीचा प्रश्न प्रलंबित आहेत. ठाण्यातील अनेक इमारती तसेच पोलिसांच्या जुन्या बैठ्या चाळींना 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. पोलिसांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पोलीस वसाहतीची पाहणी केली. यावेळी पोलिस पत्नी आणि महिलांनी एकनाथ शिंदे यांच्याशी सवांद साधत पोलीस कुटूंबीयांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. दरम्यान शिंदे यांनी समस्या ऐकून घेत लवकरात लवकर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... चारा छावण्यातील गैरप्रकारावर सरकारला कारवाई करण्यास भाग पाडू - राजू शेट्टी

पोलिसांच्या शासकीय निवासाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. ठाण्यात सध्या हजारो पोलिसांची कुटूंब वास्तव्य करीत आहेत. 12 बैठ्या चाळी आणि 27 इमारती आहेत. काही इमारती सुसज्ज असून उर्वरित इमारतींचे पुनर्निर्माण होणे बाकी आहे. वर्तकनगर म्हाडा, जरीमरी पोलीस वसाहत जवळील इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. यावर कोणताही निर्णय अध्याप झाला नसल्याचे लक्ष वेधले. पोलिसांना घराचा प्रश्न गंभीर असून लवकरात लवकर युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सरकारकडून करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

हेही वाचा... '...तर शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे'

पोलीस वसाहतीच्या या भेटीत अनेक कुटूंबीयांशी त्यांनी सवांद साधला. इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल, तसेच इमारतींची पुनर्बांधणी केली जाईल, असे पोलीस वसाहतीमधील नागरिकांना त्यांनी सांगितले आहे. या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेर असतात. पोलिसांचे राहते घर सुरक्षित असले पाहिजे, हाच उद्देश समोर ठेवून हे सरकार वसाहतीचा प्रश्न मार्गी लावेल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

हेही वाचा... नागरिकत्व कायदा न्यायालयात टिकल्यानंतर राज्यात लागू करण्याविषयी विचार करू - उद्धव ठाकरे

पोलिसांच्या कामाची वेळ 12 तासाहून 8 तास करणार

मुंबई वगळता राज्यात पोलिसांच्या कामाची वेळ 12 तासांची आहे. पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. मुंबई पोलिसांना जशी 8 तासांची ड्युटी आहे, तशीच जिल्यातील पोलिसांचे देखील कामाचे 8 तास करण्याचा मानस सरकारचा आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे देखील गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सावरकर हे देशाचे दैवत

स्वातंत्रवीर सावरकर हे राज्याचा नव्हे देशाचे दैवत समान आहेत. त्यांनी देशासाठी त्याग केलेला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. सावरकर हे आम्हाला आदर स्थानी आहेत, असे शिंदे यावेळी म्हणाले. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत. हे राज्याच्या हितासाठीचे सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात कुठेही मतभेद नाहीत, असेही एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा... जागतिक चहा दिनादिवशी भाजपचा चहापानावर बहिष्कार; अशोक चव्हाणांचा टोला

ठाणे - गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरासह जिल्ह्यातील पोलीस वसाहतीचा प्रश्न प्रलंबित आहेत. ठाण्यातील अनेक इमारती तसेच पोलिसांच्या जुन्या बैठ्या चाळींना 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. पोलिसांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पोलीस वसाहतीची पाहणी केली. यावेळी पोलिस पत्नी आणि महिलांनी एकनाथ शिंदे यांच्याशी सवांद साधत पोलीस कुटूंबीयांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. दरम्यान शिंदे यांनी समस्या ऐकून घेत लवकरात लवकर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... चारा छावण्यातील गैरप्रकारावर सरकारला कारवाई करण्यास भाग पाडू - राजू शेट्टी

पोलिसांच्या शासकीय निवासाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. ठाण्यात सध्या हजारो पोलिसांची कुटूंब वास्तव्य करीत आहेत. 12 बैठ्या चाळी आणि 27 इमारती आहेत. काही इमारती सुसज्ज असून उर्वरित इमारतींचे पुनर्निर्माण होणे बाकी आहे. वर्तकनगर म्हाडा, जरीमरी पोलीस वसाहत जवळील इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. यावर कोणताही निर्णय अध्याप झाला नसल्याचे लक्ष वेधले. पोलिसांना घराचा प्रश्न गंभीर असून लवकरात लवकर युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सरकारकडून करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

हेही वाचा... '...तर शिवसेनेने काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे'

पोलीस वसाहतीच्या या भेटीत अनेक कुटूंबीयांशी त्यांनी सवांद साधला. इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल, तसेच इमारतींची पुनर्बांधणी केली जाईल, असे पोलीस वसाहतीमधील नागरिकांना त्यांनी सांगितले आहे. या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेर असतात. पोलिसांचे राहते घर सुरक्षित असले पाहिजे, हाच उद्देश समोर ठेवून हे सरकार वसाहतीचा प्रश्न मार्गी लावेल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

हेही वाचा... नागरिकत्व कायदा न्यायालयात टिकल्यानंतर राज्यात लागू करण्याविषयी विचार करू - उद्धव ठाकरे

पोलिसांच्या कामाची वेळ 12 तासाहून 8 तास करणार

मुंबई वगळता राज्यात पोलिसांच्या कामाची वेळ 12 तासांची आहे. पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. मुंबई पोलिसांना जशी 8 तासांची ड्युटी आहे, तशीच जिल्यातील पोलिसांचे देखील कामाचे 8 तास करण्याचा मानस सरकारचा आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे देखील गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सावरकर हे देशाचे दैवत

स्वातंत्रवीर सावरकर हे राज्याचा नव्हे देशाचे दैवत समान आहेत. त्यांनी देशासाठी त्याग केलेला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. सावरकर हे आम्हाला आदर स्थानी आहेत, असे शिंदे यावेळी म्हणाले. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत. हे राज्याच्या हितासाठीचे सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात कुठेही मतभेद नाहीत, असेही एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा... जागतिक चहा दिनादिवशी भाजपचा चहापानावर बहिष्कार; अशोक चव्हाणांचा टोला

Intro:गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला ठाणे पोलीस वसाहतीचा पाहणी दौरा
पोलिसांच्या घराचा प्रश्न लवकर मार्गी लागणार एकनाथ शिंदेBody:



गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरासह जिल्ह्यातील पोलीस वसाहतीचा प्रश्न प्रलंबित आहेत. ठाण्यातील अनेक इमारती तसेच पोलिसांच्या जुन्या बैठ्या चाळीचा 100 वर्ष पूर्ण झाली असताना एकीकडे पोलिसांचा प्रश्न प्रलंबित असताना राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पोलीस वसाहतीची पाहणी केली. यावेळी पोलिस पत्नी आणि महिलांनी एकनाथ शिंदे यांच्याशी सवांद साधत पोलीस कुटूंबाना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी या दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते, दरम्यान शिंदे यांनी समस्या ऐकून घेत लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

पोलिसांच्या शासकीय निवासाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. ठाण्यात सद्या हजारो पोलिसांची कुटूंब वास्तव्य करीत असून 12 बैठ्या चाळी आणि 27 इमारती आहेत. काही इमारती सुसज्ज असून उर्वरित इमारतीचे पुनर्निर्माण होणे बाकी आहे. वर्तक नगर म्हाडा, जरीमरी पोलीस वसाहत जवळील इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. यावर कोणताही निर्णय अध्याप झाला नसल्याने गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर लक्ष वेधले आहे. पोलिसांना घराचा प्रश्न गंभीर असून लवकरात लवकर युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम महाविकास आघाडीकडून करण्यात येईल असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

पोलीस वसाहतीच्या या भेटीत अनेक कुटूंबाशी त्यानी सवांद साधला. इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाइल तसेच इमारतीची पुनर्बांधणी केली जाईल अस पोलीस वसाहतीमधील नागरिकांना सांगितलं आहे. या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर चर्चा केली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेर असतात. पोलिसांचे राहत घर सुरक्षित असले पाहिजे हाच उद्देशसमोर ठेवून हे सरकार वसाहतीचा प्रश्न मार्गी लावेल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली

पोलिसांच्या कामाची वेळ 12 तासाहून 8 तास करणार

मुंबई वगळता राज्यात पोलिसांच्या कामाची वेळ 12 तासांची असून पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. मुंबई पोलिसांना जशी 8 तासांची ड्युटी आहे, तशीच जिल्यातील पोलिसांच्या वर्किंग ड्युटी देखील 8 तास करण्याचा मानस सरकारचा असुन यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईन असे देखील गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सावरकर देशाचे दैवत

स्वातंत्रवीर सावरकर हे राज्याचा नव्हे देशाचे दैवत समान आहेत. त्यांनी देशासाठी त्याग केलेला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे सावरकर हे आम्हाला आदर स्थानी आहेत आणि महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारचे उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत या राज्याच्या हितासाठी हे सरकार आहे त्यामुळे तिन्ही पक्षात कुठेही मतभेद नाहीत असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Byte एकनाथ शिंदे गृहमन्त्रीConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.