ETV Bharat / state

दिवाळी सुट्टीमुळे भात नुकसानीचे पंचनामे रखडले; भाजीपाला लागवड, वीटभट्टी व्यवसायही संकटात

author img

By

Published : Oct 30, 2019, 7:48 PM IST

जिल्ह्यात 10 दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसाने रविवार व सोमवार असे 2 दिवस काही भागात उसंत दिली होती. परंतु, मंगळवारी पहाटे पावसाने पुन्हा हजेरी लावून 2 दिवस शेतात कापून वाळण्यासाठी पसरवून ठेवलेले भातपिक भिजवून टाकले. त्यामुळे भातपिकांचे नुकसान तालुक्यात मंगळवारपर्यंत कायम आहे.

दिवाळी सुट्टीमुळे भात नुकसानीचे पंचनामे रखडले

ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या सरकारी यंत्रणेला अवकाळी पावसाने झालेल्या भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास आधीच विलंब लागला. पंचनाम्यांचे आदेश जारी झाल्यानंतर प्रत्यक्ष पंचनामे नोंदवण्याच्या प्रक्रियेला अवघे 2 दिवस उलटत नाही. तोच दिवाळी सुट्टी लागल्याने शनिवार ते मंगळवार या 4 दिवसांच्या दिवाळी सुट्टीमुळे शहापूर तालुक्यात भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे नोंदवण्याचे काम रखडले आहे. तर परतीच्या पावसामुळे दुबार भाजीपाला लागवडही लांबली आहे. तर वीटभट्टी व्यवसायही संकटात आला आहे.

दिवाळी सुट्टीमुळे भात नुकसानीचे पंचनामे रखडले

जिल्ह्यात 10 दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसाने रविवार व सोमवार असे 2 दिवस काही भागात उसंत दिली होती. परंतु, मंगळवारी पहाटे पावसाने पुन्हा हजेरी लावून 2 दिवस शेतात कापून वाळण्यासाठी पसरवून ठेवलेले भातपिक भिजवून टाकले. त्यामुळे भातपिकांचे नुकसान तालुक्यात मंगळवारपर्यंत कायम आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी संयुक्तपणे गावागावांत जाऊन सरपंच व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत आतापर्यंत काही तालुक्यातच कमी अधिक पंचनामे नोंदवले आहेत.

हेही वाचा - 'एक हात पोलीस दादाचा', वृद्ध नागरिकांसाठी विठ्ठलवाडी पोलिसांचा अनोखा उपक्रम

जिल्ह्यात अवकाळी पावसाने भाताच्या दाण्यांचे दाट पिवळे तुरे घेऊन उभ्या राहिलेल्या भातपिकांना जागीच मातीत मिळवले आहे. पिकलेल्या धान्याचा शेतातच चिखल झालेला पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. जिल्ह्यात आदिवासी तसेच डोंगरी विभागात मोठ्या प्रमाणात लागवड होत असलेल्या नागळी आणि वरईचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या नागळी, वरईच्या बोंडांनी जमिनीकडे मान झुकवली आहे. शहापूर तालुक्यातील टाकीपठार, डोळखांब आणि कसाऱ्याच्या माळपठार, वेळूक, वाशाळा, तळवाडा, गांडुळवाड, साकडबाव, बाबरवाडी, चिल्लारवाडी या भागातील डोंगरमाथ्यावरील गावांमध्ये वास्तव्य करून राहणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात नागळी आणि वरईची लागवड केली होती. मागील काही वर्षांच्या तुलनेने यंदाच्या हंगामात ही पिकेदेखील भरघोस पिकली होती. मात्र, अवकाळी पावसाच्या फटकाऱ्याचा फटका नागळी, वरईलादेखील बसला आहे.

हेही वाचा - खळबळजनक! सीएनजी गॅस भरताना पेट्रोल पंपावर रिक्षाचा स्फोट

ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या सरकारी यंत्रणेला अवकाळी पावसाने झालेल्या भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास आधीच विलंब लागला. पंचनाम्यांचे आदेश जारी झाल्यानंतर प्रत्यक्ष पंचनामे नोंदवण्याच्या प्रक्रियेला अवघे 2 दिवस उलटत नाही. तोच दिवाळी सुट्टी लागल्याने शनिवार ते मंगळवार या 4 दिवसांच्या दिवाळी सुट्टीमुळे शहापूर तालुक्यात भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे नोंदवण्याचे काम रखडले आहे. तर परतीच्या पावसामुळे दुबार भाजीपाला लागवडही लांबली आहे. तर वीटभट्टी व्यवसायही संकटात आला आहे.

दिवाळी सुट्टीमुळे भात नुकसानीचे पंचनामे रखडले

जिल्ह्यात 10 दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसाने रविवार व सोमवार असे 2 दिवस काही भागात उसंत दिली होती. परंतु, मंगळवारी पहाटे पावसाने पुन्हा हजेरी लावून 2 दिवस शेतात कापून वाळण्यासाठी पसरवून ठेवलेले भातपिक भिजवून टाकले. त्यामुळे भातपिकांचे नुकसान तालुक्यात मंगळवारपर्यंत कायम आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी संयुक्तपणे गावागावांत जाऊन सरपंच व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत आतापर्यंत काही तालुक्यातच कमी अधिक पंचनामे नोंदवले आहेत.

हेही वाचा - 'एक हात पोलीस दादाचा', वृद्ध नागरिकांसाठी विठ्ठलवाडी पोलिसांचा अनोखा उपक्रम

जिल्ह्यात अवकाळी पावसाने भाताच्या दाण्यांचे दाट पिवळे तुरे घेऊन उभ्या राहिलेल्या भातपिकांना जागीच मातीत मिळवले आहे. पिकलेल्या धान्याचा शेतातच चिखल झालेला पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. जिल्ह्यात आदिवासी तसेच डोंगरी विभागात मोठ्या प्रमाणात लागवड होत असलेल्या नागळी आणि वरईचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या नागळी, वरईच्या बोंडांनी जमिनीकडे मान झुकवली आहे. शहापूर तालुक्यातील टाकीपठार, डोळखांब आणि कसाऱ्याच्या माळपठार, वेळूक, वाशाळा, तळवाडा, गांडुळवाड, साकडबाव, बाबरवाडी, चिल्लारवाडी या भागातील डोंगरमाथ्यावरील गावांमध्ये वास्तव्य करून राहणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात नागळी आणि वरईची लागवड केली होती. मागील काही वर्षांच्या तुलनेने यंदाच्या हंगामात ही पिकेदेखील भरघोस पिकली होती. मात्र, अवकाळी पावसाच्या फटकाऱ्याचा फटका नागळी, वरईलादेखील बसला आहे.

हेही वाचा - खळबळजनक! सीएनजी गॅस भरताना पेट्रोल पंपावर रिक्षाचा स्फोट

Intro:kit 319Body:दिवाळी सुट्टीमुळे भात नुकसानीचे पंचनामे रखडले; तर दुबार भाजीपाला लागवड व वीटभट्टी व्यवसायही संकटात

ठाणे ; विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या सरकारी यंत्रणेला अवकाळी पावसाने भातपिकांच्या केलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास आधीच विलंब लागला. पंचनाम्यांचे आदेश जारी झाल्यानंतर प्रत्यक्ष पंचनामे नोंदवण्याच्या प्रक्रियेला अवघे दोन दिवस उलटत नाही, तोच दिवाळी सुट्टी लागल्याने शनिवार ते मंगळवार या चार दिवसांच्या दिवाळी सुट्टीमुळे शहापूर तालुक्यात भातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे नोंदवण्याचे काम रखडले आहे. तर परतीच्या पावसामुळे दुबार भाजीपाला लागवडही लांबली तर वीटभट्टी व्यवसायही संकटात आला आहे.
जिल्ह्यात दहा दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसाने रविवार व सोमवार असे दोन दिवस काही भागात उसंत दिली होती. परंतु मंगळवारी पहाटे पुन्हा हजेरी लावून दोन दिवस शेतात कापून वाळण्यासाठी पसरवून ठेवलेले भातपिक भिजवून टाकले. त्यामुळे भातपिकांचे नुकसान तालुक्यात मंगळवारपर्यंत कायम आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी संयुक्तपणे गावागावांत जाऊन सरपंच व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत आतापर्यंत काही तालुक्यातच कमी अधिक पंचनामे नोंदवले आहेत.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने भाताच्या दाण्यांचे दाट पिवळे तुरे घेऊन उभ्या राहिल्या. भातपिकांना शेतात उभ्या राहिलेल्या जागीच मातीत मिळवले आहे. पिकलेल्या धान्याचा शेतातच चिखल झालेले पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. जिल्ह्यात आदिवासी तसेच डोंगरी विभागात मोठ्या प्रमाणात लागवड होत असलेल्या नागळी आणि वरईचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या नागळी, वरईच्या बोंडांनी जमिनीला मान झुकवली आहे. शहापूर तालुक्यातील टाकीपठार, डोळखांब आणि कसाऱ्याच्या माळपठार, वेळूक, वाशाळा, तळवाडा, गांडुळवाड, साकडबाव, बाबरवाडी, चिल्लारवाडी या भागातील डोंगरमाथ्यावरील गावांमध्ये वास्तव्य करून राहणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात नागळी आणि वरईची लागवड केली होती. मागील काही वर्षांच्या तुलनेने यंदाच्या हंगामात ही पिकेदेखील भरघोस पिकली होती. मात्र अवकाळी पावसाच्या फटकाऱ्याचा फटका नागळी, वरईलादेखील बसला आहे.

दुबार भाजीपाला लागवड लांबली
अवकाळी पावसाच्या पाण्याने शेतजमीन चिखलाने भरून राहिली. तसेच हंगाम उलटून चालला असताना अद्यापि भातपिकांची काढणी झाली नसल्याने तालुक्यात भेंडी, मिरची, सिमला मिरची, काकडी, चवळी, घोसाळी, शिरवळ, दुधी, मुळ्याची लागवड लांबण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोथिंबीर, हरभरा, मूग, वालाची पेरणीदेखील लांबण्याची भीती आहे. दुबार कडधान्य, भाजीपाला पिकांच्या लागवडीचा हंगाम उलटून चालला आहे. पावसामुळे ओल्या जमिनीत काही ठिकाणी कापलेल्या भाताच्या बुंध्यांना पुन्हा हिरवी पाती फुटली आहे..

वीटभट्टी व्यावसाय संकटात
गेल्या काही वर्षांपासून बांधकाम व्यवसायात मंदीचे सावट सुरू असल्याने त्याचा परिणाम वीटभट्टी व्यवसायावर झाला आहे. खप घटल्याने व्यवसाय संकटात असताना सततच्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी सुरू करण्याचा हंगाम उलटून चालला आहे. भातकापणीनंतर मोकळ्या शेतात, तसेच वरकस क्षेत्रात काहीजण वीटभट्टीचा व्यवसाय करतात. अवकाळी पावसामुळे भातपिकेच शेतात अडकल्याने त्यामुळे वीटभट्ट्यांचा प्रारंभ रखडला आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय उशिराने सुरू केलाच, तर वीटभट्टी मालकांसमोर उत्पादित विटांच्या खपाचे आव्हान उभे राहणार आहे.



Conclusion:bhatpik
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.